शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

डोंबिवलीत गणेशोत्सवात ४० टन निर्माल्याचे संकलन; निर्मल युथ फाउंडेशनची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:09 IST

प्लास्टिक आणि घनकचऱ्याचेही केले वर्गीकरण, निर्माल्यापासून बनवणार खत

डोंबिवली : गणेशोत्सवात होणाºया जलप्रदूषणाला आळा बसावा, यासाठी शहरातील निर्मल युथ फाउंडेशनने पुढाकार घेतला. गणेशमूर्तींबरोबर निर्माल्य, सजावटीचे साहित्य व घनकचरा जलाशयांमध्ये जाऊ नये, यासाठी फाउंडेशनने सर्व विसर्जनांच्या दिवशी निर्माल्य संकलित केले. त्यानुसार, विविध ठिकाणांहून एकूण ४० टन २६० किलो निर्माल्य, २० टन १९५ किलो प्लास्टिक आणि १२ टन घनकचरा संकलित करण्यात आला. दरम्यान, निर्माल्यापासून श्री गणेश मंदिराच्या गांडूळखत प्रकल्पात खतनिर्मिती केली जाणार आहे.वाहत्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. परंतु, डोंबिवली शहर व त्यालगतच्या ग्रामीण भागांमध्ये विहिरी, तलाव आणि खाडीकिनारी विसर्जन सोहळा पार पडतो. यावेळी गणेशमूर्तींबरोबर निर्माल्य आणि सजावटीचे साहित्य पाण्यात विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण वाढते. शिवाय, जलचरांचा अधिवास आणि जैवविविधता धोक्यात येण्याची भीती असते. त्यामुळे विसर्जनावेळी निर्माल्य पाण्यात विसर्जित न करता ते कार्यकर्त्यांकडे द्यावे, असे आवाहन फाउंडेशनने केले होते.

गणेशोत्सवात दीड ते ११ दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी पूर्वेतील आयरेगाव तलाव तर, पश्चिमेतील कोपर तलाव, जुनी डोंबिवली गणेशघाट, रेतीबंदर गणेशघाट, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा येथे फाउंडेशनने विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांच्या ३५० हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्य संकलित केले.

साउथ इंडियन असोसिएशन आणि प्रगती महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे स्वयंसेवक, जी.आर. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी, पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेच्या रूपाली शाईवाले, केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी विलास जोशी, पूर्व विभागाचे स्वच्छता निरीक्षक अधिकारी विलास गायकवाड, पश्चिम विभागाचे राजेंद्र खैरे आदींचे सहकार्य त्यासाठी मिळाले, असे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.