शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

Maharashtra Karnataka Border Dispute: “याआधीच्या सरकारने सीमावादावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही”; CM एकनाथ शिंदेंनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 18:24 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पु्न्हा एकदा सीमावादासंदर्भात भाष्य करताना यापूर्वीच्या सरकारवर टीका केली आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावर भाष्य करताना आधीच्या सरकारवर निशाणा साधला. यापूर्वीच्या सरकारने सीमावादावर कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी अप्रत्यक्ष टीका एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. 

एकनाथ शिंदे ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच सीमावादप्रश्नावर हस्तक्षेप केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तोपर्यंत नागरिकांना त्रास होऊ नये, मराठी बांधवांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका आम्ही आग्रहाने मांडली, याचा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच एवढे वर्ष कुणाचे सरकार होते. केंद्रात होते, राज्यात होते आणि कर्नाटकातही होते. असे असूनही तो निर्णय त्यांना घेता आलेला नाही. हस्तक्षेप करावा. न्यायाची बाजू मांडावी, अशी भूमिका घ्यावीशी वाटली नाही, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडले.

सीमावादाचा मुद्दा राजकीय मुद्दा करू नये

सीमावादा मुद्दा राजकीय मुद्दा करू नये. राजकारण सोडून मराठी जनतेसाठी उभे राहावे. आम्हाला सामंजस्याने यावर तोडगा काढायचा आहे. वाद वाढवायचा नाही. दोन्ही राज्यात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. एकाही नागरिकाला याचा त्रास होता कामा नये. आमचे विरोधकांनाही आवाहन आहे की, हा सामाजिक बांधिलकीचा प्रश्न आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

दरम्यान, कोस्टल रोड शहरासाठी महत्वाचा पायाभूत प्रकल्प असला तरी हे सरकार भूमिपुत्रांचे सरकार आहे. ज्या ठिकाणी प्रकल्प राबवतोय तिथे लोकांवर अन्याय होऊ नये अशी बाळासाहेबांचीही भूमिका राहिली आहे. प्रकल्पातील दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ऐवजी १२० मीटर असावं अशी मागणी होती. पण प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाल्याने अडचण निर्माण झाली होती. यात काय तोडगा काढता येईल यासाठी इकबाल सिंह चहल यांना लक्ष घालण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी यासंबंधीची सर्व माहिती घेत अखेर या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. जास्तीचे पैसे खर्च झाले तरी चालतील. लेटेस्ट तंत्रज्ञान वापरावे लागले, मागवावे लागले तरी चालेल. पण स्थानिकांचे प्रश्न सोडवूनच पुढे जाता येईल अशी आमची भूमिका राहिली आहे. आता आम्ही कोस्टल रोडमधील दोन पिलरचे अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन मच्छीमारांच्या बोटी सहजपणे समुद्रात ये-जा करु शकतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेborder disputeसीमा वाद