शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

Maharashtra Karnataka Border Dispute: “याआधीच्या सरकारने सीमावादावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही”; CM एकनाथ शिंदेंनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 18:24 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पु्न्हा एकदा सीमावादासंदर्भात भाष्य करताना यापूर्वीच्या सरकारवर टीका केली आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावर भाष्य करताना आधीच्या सरकारवर निशाणा साधला. यापूर्वीच्या सरकारने सीमावादावर कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी अप्रत्यक्ष टीका एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. 

एकनाथ शिंदे ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच सीमावादप्रश्नावर हस्तक्षेप केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तोपर्यंत नागरिकांना त्रास होऊ नये, मराठी बांधवांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका आम्ही आग्रहाने मांडली, याचा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच एवढे वर्ष कुणाचे सरकार होते. केंद्रात होते, राज्यात होते आणि कर्नाटकातही होते. असे असूनही तो निर्णय त्यांना घेता आलेला नाही. हस्तक्षेप करावा. न्यायाची बाजू मांडावी, अशी भूमिका घ्यावीशी वाटली नाही, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडले.

सीमावादाचा मुद्दा राजकीय मुद्दा करू नये

सीमावादा मुद्दा राजकीय मुद्दा करू नये. राजकारण सोडून मराठी जनतेसाठी उभे राहावे. आम्हाला सामंजस्याने यावर तोडगा काढायचा आहे. वाद वाढवायचा नाही. दोन्ही राज्यात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. एकाही नागरिकाला याचा त्रास होता कामा नये. आमचे विरोधकांनाही आवाहन आहे की, हा सामाजिक बांधिलकीचा प्रश्न आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

दरम्यान, कोस्टल रोड शहरासाठी महत्वाचा पायाभूत प्रकल्प असला तरी हे सरकार भूमिपुत्रांचे सरकार आहे. ज्या ठिकाणी प्रकल्प राबवतोय तिथे लोकांवर अन्याय होऊ नये अशी बाळासाहेबांचीही भूमिका राहिली आहे. प्रकल्पातील दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ऐवजी १२० मीटर असावं अशी मागणी होती. पण प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाल्याने अडचण निर्माण झाली होती. यात काय तोडगा काढता येईल यासाठी इकबाल सिंह चहल यांना लक्ष घालण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी यासंबंधीची सर्व माहिती घेत अखेर या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. जास्तीचे पैसे खर्च झाले तरी चालतील. लेटेस्ट तंत्रज्ञान वापरावे लागले, मागवावे लागले तरी चालेल. पण स्थानिकांचे प्रश्न सोडवूनच पुढे जाता येईल अशी आमची भूमिका राहिली आहे. आता आम्ही कोस्टल रोडमधील दोन पिलरचे अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन मच्छीमारांच्या बोटी सहजपणे समुद्रात ये-जा करु शकतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेborder disputeसीमा वाद