शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

क्लस्टरचा नारळ फुटलाच नाही; गावठाण कोळीवाड्यांच्या विरोधामुळे योजना लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:09 IST

ठाणे शहरासाठी महत्त्वाची ठरणाऱ्या क्लस्टर योजनेचा पहिला नारळ आॅक्टोबर महिन्यात फोडणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला. परंतु,नोव्हेंबर महिना संपत आला तरी क्लस्टरचे कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच झाले नसल्याचे उघड झाले आहे.

ठाणे : ठाणे शहरासाठी महत्त्वाची ठरणाऱ्या क्लस्टर योजनेचा पहिला नारळ आॅक्टोबर महिन्यात फोडणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला. परंतु,नोव्हेंबर महिना संपत आला तरी क्लस्टरचे कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच झाले नसल्याचे उघड झाले आहे. पहिल्या टप्प्यात चार भागांत ही योजना सुरू केली जाणार होती. परंतु, पालिकेकडे आलेल्या हरकती आणि सूचनांमुळे विलंब होत असून गावठाण आणि कोळीवाड्यांना यातून वगळण्यात येत असल्याने त्याचा सर्व्हेसुद्धा सुरू असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच क्लस्टरला विलंब होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.क्लस्टर योजना ही शहरातील ४३ सेक्टरमध्ये राबविली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात ती ४ सेक्टरमध्ये राबविली जाणार असून त्या अतंर्गत तब्बल २३ टक्के जागा विकसित केली जाणार आहे. परंतु, या योजनेअंतर्गत केवळ घरेच उभारली जाणार नसून बाहेरून येणाºया सामावून घेतले जाणार आहे. तसेच प्रत्येक सेक्टरमध्ये कर्मशिअल हब म्हणजेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येणार असून, कम्युनिटी सेंटर, सिटी सेंटर, टाऊन सेंटरचीदेखील उभारणी करण्यात येणार आहे. शहरातील बुजलेल्या तलावांना पुनर्जीवन देतांनाच, सीआरझेड, वनविभागाच्या जागा या माध्यमातून मोकळ्या करण्याची ग्वाही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मे २०१८ मध्ये दिली होती. त्यानुसार आॅक्टोबरअखेर पहिल्या टप्यातील कामाचा श्रीगणेशा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. यासंदर्भातील सादरीकरणसुद्धा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केले होते.पहिल्या टप्यात चार सेक्टरमध्ये कोपरी, राबोडी, लोकमान्य नगर आणि किसनगर या भागांचा समावेश आहे. त्यानुसार या सेक्टरचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्यामध्ये लोकसंख्येच्या मानाने रुग्णालये, पोलीस ठाणे, गार्डन, आदींसह इतर सुविधा उपलब्ध आहेत. पहिल्या टप्यात २३ टक्के क्षेत्र क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केले जाणार असले तरी पुढील दोन वर्षांत ७० टक्के क्षेत्र हे क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केले जाणार आहे.हरकतींचा निपटारा होईपर्यंत क्लस्टरचा शुभारंभ अशक्य३० दिवसात नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविल्या जाणार होत्या. त्यानुसार यामध्ये गावठाण आणि कोळीवाड्यांचा समावेश करण्यात आल्याने येथील नागरिकांनी या योजनेला कडाडून विरोध केला. तसेच याच भागातून हजोरांच्या संख्येने हरकती आणि सुचनांचा पाऊस पडला. अखेर पालिकेने क्लस्टरमधून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार आॅक्टोबरमध्ये पहिल्या टप्याचा नारळ वाढविला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. परंतु आता त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. पालिकेकडे आलेल्या सूचना आणि हरकती निकाली काढण्यातच पालिकेचा आता नोव्हेंबर महिनासुद्धा संपणार आहे. पालिकेकडे सुमारे १८ हजार हरकती आल्या आहेत. त्यांचा निपटारा लावण्याचे काम सध्या सुरू आहे.या हरकती निकाली काढल्या नाहीत. तर भविष्यात क्लस्टरला न्यायालयाच्या पायºयाही चढाव्या लागू शकतात, अशी भीती पालिकेच्या मनात आहे. त्यामुळेच जोपर्यंत सूचना आणि हरकतींचा निपटारा होत नाही, तोपर्यंत क्लस्टरचे पुढचे पाऊल टाकणे शक्य नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये काहीही करून पहिल्या टप्यातील चार भागांचा युआरपी प्रसिद्ध केला जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु, प्रत्यक्षात नारळ केव्हा वाढविला जाणार याचे उत्तर मात्र पालिकेकडे नाही.शुभारंभावरूनही राजकीय संघर्ष होण्याची शक्यताआगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून क्लस्टरचा नारळ वाढविण्याची तयारी सत्ताधाºयांनी आखली आहे. त्यानुसार किसननगर भागात पहिला नारळ फुटणार अशी चर्चाही जोर धरत आहे. परंतु, येथील क्लस्टर किचकट असून नागरिकांच्या हरकती सूचनासुद्धा जास्त असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील नारळ हा कोणतीही अडचण नसलेल्या राबोडी या भागाचा वाढविला जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे यावरूनसुद्धा येत्या काळात राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे