शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

लोकसहभागातून वडवली तलावाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:07 IST

गाळ काढण्याचे काम सुरू; प्रतिष्ठित व्यक्तींचाही पुढाकार, अंबरनाथ पालिकेकडून दुर्लक्ष

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्यावर असलेल्या वडवली शिव मंदिर तलावात गाळ साचल्याने या तलावाचे सुशोभीकरण रखडले होते. या तलावातील गाळ काढण्यासाठी अंबरनाथ पालिका पुढाकार घेत नसल्याने आता या भागातील सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन तलावाचे काम हाती घेतली आहे. लोकसहभागातून आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे.अंबरनाथ नगरपालिका हद्दीत असलेल्या आणि बदलापूरच्या सीमेवरील वडवली तलाव हे निसर्गरम्य परिसरात आहे. या तलावाच्या परिसरात अनेक पक्ष्यांचा वावर असल्याने या तलावाशेजारी बसून निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. मात्र, या तलावात अनेक वर्षांपासून गाळ साचला होता. तो गाळ काढण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे वडवली गावातील तरुण आणि जीबीके ग्रुपच्या पुढाकाराने या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करून तो तलाव अर्धा स्वच्छ केला होता. दोन महिन्यांत ते काम करणे शक्य नसल्याने निम्मे काम यावर्षी करण्यात येत आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी लागणारी सामग्री शहरातील सेवाभावी संस्था, संघटना आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्त करत आहेत. अनेकांच्या मदतीमुळे हे काम अविरतपणे सुरू आहे.नैसर्गिक झरे जिवंत करण्याचे प्रयत्न : मे महिन्याच्या शेवटपर्यंत तलावातील सर्व गाळ काढून या तलावाचे खोलीकरण करण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक झरे जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी तुकाराम म्हात्रे आणि त्यांचे सहकारी दिवसरात्र काम करत आहेत. तलाव स्वच्छ झाल्यावर पावसाळ्यात पुन्हा या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हा परिसर स्वच्छ करून नागरिकांची चांगली सोय या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :badlapurबदलापूर