शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लोकसहभागातून वडवली तलावाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:07 IST

गाळ काढण्याचे काम सुरू; प्रतिष्ठित व्यक्तींचाही पुढाकार, अंबरनाथ पालिकेकडून दुर्लक्ष

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्यावर असलेल्या वडवली शिव मंदिर तलावात गाळ साचल्याने या तलावाचे सुशोभीकरण रखडले होते. या तलावातील गाळ काढण्यासाठी अंबरनाथ पालिका पुढाकार घेत नसल्याने आता या भागातील सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन तलावाचे काम हाती घेतली आहे. लोकसहभागातून आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे.अंबरनाथ नगरपालिका हद्दीत असलेल्या आणि बदलापूरच्या सीमेवरील वडवली तलाव हे निसर्गरम्य परिसरात आहे. या तलावाच्या परिसरात अनेक पक्ष्यांचा वावर असल्याने या तलावाशेजारी बसून निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. मात्र, या तलावात अनेक वर्षांपासून गाळ साचला होता. तो गाळ काढण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे वडवली गावातील तरुण आणि जीबीके ग्रुपच्या पुढाकाराने या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करून तो तलाव अर्धा स्वच्छ केला होता. दोन महिन्यांत ते काम करणे शक्य नसल्याने निम्मे काम यावर्षी करण्यात येत आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी लागणारी सामग्री शहरातील सेवाभावी संस्था, संघटना आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्त करत आहेत. अनेकांच्या मदतीमुळे हे काम अविरतपणे सुरू आहे.नैसर्गिक झरे जिवंत करण्याचे प्रयत्न : मे महिन्याच्या शेवटपर्यंत तलावातील सर्व गाळ काढून या तलावाचे खोलीकरण करण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक झरे जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी तुकाराम म्हात्रे आणि त्यांचे सहकारी दिवसरात्र काम करत आहेत. तलाव स्वच्छ झाल्यावर पावसाळ्यात पुन्हा या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हा परिसर स्वच्छ करून नागरिकांची चांगली सोय या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :badlapurबदलापूर