शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

ठाण्यात कचऱ्याच्या डब्यात चहाचे कप करतात साफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 05:21 IST

व्हिडीओ व्हायरल : कॅन्टीनधारकाला रेल्वेने ठोठावला एक लाखाचा दंड

ठाणे : ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी ठेवलेल्या एका डब्यात ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-६च्या कॅन्टीनवरील एक कर्मचारी चहाचे क प धूत असल्याचा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला. या घटनेची ठाणे रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन संबंधित कॅन्टीनधारकाकडून लेखी खुलासा मागितला असून एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

दुसरीकडे या संतापजनक प्रकारामुळे प्रवाशांनीही नाराजी व्यक्त करून लिंबूसरबतपाठोपाठ रेल्वे स्थानकातील चहावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सात ते आठ लाखांच्या जवळपास प्रवासी ये-जा करतात. त्यातच, या रेल्वे स्थानकात १ ते १० या फलाटांवर एकूण १८ उपाहारगृहे (कॅन्टीन) आणि एक फूड प्लाझा आहे. यामध्ये फलाट क्रमांक-५ आणि ६ या ठिकाणी तीन कॅन्टीन असून ते गुप्ता ब्रदर्स नामक ठेकेदाराला चालविण्यासाठी दिले आहेत.

त्यातील एका कॅन्टीनवरील कर्मचारी विजयकुमार कौल हा शुक्रवारी सकाळच्या सुमारास कचºयाच्या डब्यात चहाचे कप आणि कॅन्टीनमधील कपडे धुतानाचा प्रकार मंदार अभ्यंकर नामक एका प्रवाशाने मोबाइलमध्ये चित्रित केला. त्यानंतर तो व्हिडीओ काही क्षणांत व्हायरल झाल्यावर रेल्वे प्रशासन झोपेतून खडबडून जागे झाले.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे रेल्वे प्रशासनाने त्या फलाटावर जाऊन तेथे पाहणी केली. त्या वेळी कॅन्टीनधारकाने कचºयाचा तो डबा चांगला धुऊन घेतला होता. तसेच त्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन ते चहाचे कप धुतले जात होते, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही रेल्वेने त्याला पत्र देऊन झाल्या प्रकाराचा तातडीने खुलासा मागितला आहे. त्यातच, मुंबई रेल्वे प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयाने दिली. या घटनेमुळे लोकलने प्रवास करणा-या लाखो प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.लिंबूसरबतापाठोपाठ आता चहाचे कप कचºयाच्या डब्यात धुतल्याने कॅन्टीनमध्ये प्रवाशांच्या जीवाशी रेल्वे प्रशासन खेळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने योग्य ती कारवाई लवकर करावी.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष,ठाणे रेल्वे प्रवासी संघटना

असे प्रकार वारंवार होत असतील, तर ते हानिकारक आणि धोकादायक आहे. एकीकडे रेल्वे प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. त्याचप्रमाणे या कॅन्टीनधारकांना स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कॅन्टीनवर काम करणारे बहुतांश कर्मचारी हे परराज्यांतील असल्याने हे प्रकार घातक आहेत. त्यामुळे त्यालाही वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.- हिरालाल सोनावले, प्रवासी, ठाणे

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे