शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

अंबरनाथमध्ये ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 23:57 IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरूवात शिवाजीनगर परिसरातून झाली. नागरिकांनीही आपल्या प्रभागातील समस्यांचा पाढा नगराध्यक्षांसमोर मांडला.प्रभाग क्रमांक ५३ शिवाजीनगर परिसरातून या संकल्पनेची सुरूवात करण्यात आली. स्थानिक शिवसेना नगरसेविका रेश्मा गुडेकर यांच्या प्रभागातील नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला. पालिकेचे अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या समवेत नगराध्यक्षा वाळेकर यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या, सूचना व विचार जाणून घेतले.वाळेकर यांनी या विभागातील गणपती मंदिर, मधली आळी, म्हाडा कॉलनी आदी परिसराची पाहाणी करून येथील रहिवाशांशी संवाद साधला. पालिकेचे उपमुख्याधिकारी व मुख्य स्वच्छता अधिकारी सुरेश पाटील, अभियंता राजेश तडवी, सुनील जाधव, नगरसेवक अ‍ॅड. निखिल वाळेकर, पद्माकर दिघे, उप शहर संघटक चंदा गान हे वाळेकर यांच्या समवेत होते.शहरातील प्रत्येक नागरिकांना इच्छा असूनही पालिकेत येणे शक्य नसते. पालिकेत ज्यांना येणे अशक्य असते त्यांच्या अडचणी समजून घेता येतात. त्यांच्या अडचणी फार मोठया नसतात. मात्र त्यांना प्रत्यक्ष भेटल्याने नागरिकांना विशेष समाधान होते. त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला आहे असे मत वाळेकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे