शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पूल कोसळण्याच्या भीतीने नागरिक चिंतातूर, उल्हासनगरातील धोकादायक पुलाची दुरस्ती कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 18:13 IST

उल्हासनगर कॅम्प नं-४ व ५ मधून जाणाऱ्या कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी मुख्य रस्त्यावरील समतानगर नाल्यावरचा पूल एका बाजूने सप्टेंबर महिन्यात खचला आहे

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ व ५ मधून जाणाऱ्या कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी मुख्य रस्त्यावरील समतानगर नाल्यावरचा पूल एका बाजूने सप्टेंबर महिन्यात खचला आहे

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी मुख्य रस्त्यावरील पूल दोन महिन्यापूर्वी खचला असून पूल कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुलावर लोखंडी बॅरेकेट्स लावल्या असल्या तरी लवकरात लवकर पूल दुरस्तीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ व ५ मधून जाणाऱ्या कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी मुख्य रस्त्यावरील समतानगर नाल्यावरचा पूल एका बाजूने सप्टेंबर महिन्यात खचला आहे. महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून रस्ता एका बाजूने बंद करून लोखंडी बॅरेकेट्स लावण्यात आल्या. तसेच लवकरच पुलाची दुरस्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यावेळी महापालिकेच्या वतीने देण्यात आले. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही पुलाच्या कामाला मुहूर्त मिळाला नाही. पुलाच्या दुसऱ्या मार्गावरून जड वाहन गेल्यास पूल पूर्णतः कोसळण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान प्रभाग समिती सभापती व स्थानिक नगरसेविका अंजली साळवे यांनीही महापालिका बांधकाम विभागाला माहिती देऊन पुलाच्या दुरस्तीची मागणी केली.

 महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश शितलाणी यांच्या सोबत संपर्क केला असता, होऊ शकला नाही. तसेच प्रभाग समिती क्र-४ च्या कार्यालयाशी संपर्क केला असता, पूला बाबत बांधकाम विभागाला माहिती दिली. असे सांगण्यात आले. समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी खचलेल्या पुलाबाबत ऑनलाईन महापालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांनाही काहीएक उत्तरे दिले नाही. असे त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरroad safetyरस्ते सुरक्षा