शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भिवंडीत मेट्रोच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त ; रस्ता रुंदीकरणाकडे मनपा प्रशासनानेही दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 17:27 IST

मेट्रो प्रकल्प भिवंडी शहरातून अंजुरफाटा ,धामणकर नाका, कल्याण नाका मार्गे टेमघर, साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार आहे.

- नितिन पंडित  

भिवंडी - ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो ५ प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे . सध्या या मेट्रोप्रकल्पाच्या कामास सुरवात होऊन कशेळी पासून ते थेट भिवंडी शहरातील धामणकर नाका पर्यंत रस्त्यावर बॅरिकेट्स लावून कामास प्रत्येक्ष सुरवात देखील करण्यात आली आहे . मात्र हे काम करतांना मेट्रोप्रकल्पाच्या संबंधित ठेकेदार व जबादार अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे . विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरु झाला तरीही मेट्रो मार्गिकेमध्ये येणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हातून कोंडीची समस्या निर्माण झाली आहे . त्यातच प्रकल्प ठेकेदार व अधिकाऱ्यांसह एमएमआरडीए व भिवंडी महानगरपालिका प्रशासनात काडीचीही सुसूत्रता दिसत नसल्याने हे काम नक्की पूर्णत्वास जाणार का किंवा कसे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

 मेट्रो प्रकल्प भिवंडी शहरातून अंजुरफाटा ,धामणकर नाका, कल्याण नाका मार्गे टेमघर, साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार असून या मार्गावरील अतिक्रमण हटविणे, रस्ते रुंदीकरण करण्या बाबत कोणतेही नियोजन महानगरपालिका प्रशासना कडून केले नसल्याने या मार्गा वरून मेट्रो जाणार कशी या बाबत नागरीकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच या मेट्रोच्या मार्गिकेत ठेकेदारांनी मोठ्या वजनाचे लोखंडी बॅरिकेट्स उभी केल्याने रस्ता अरुंद झाल्याने धामणकर नाका ते अंजुरफाटा या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असताना ठेकेदारांनी ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक उभे करणे गरजेचे आहे मात्र तशी व्यवस्था अजूनही झालेली नसल्याने बॅरिकेट्स पडून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे कल्याण रोड मार्गात कोणतेही नियोजन न केल्याने या मार्गावरील व्यावसायिक ,निवासी गाळेधारक रस्ता रुंदीकरणास विरोध करीत असताना त्यांचे समाधान आज पर्यंत झाले नसल्याने शहरात सुरू झालेले मेट्रो चे काम पुढे कसे नेणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रोच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसणार असल्याने मेट्रो प्रकल्पातील संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.  

टॅग्स :Metroमेट्रोbhiwandiभिवंडी