शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

भिवंडीत मेट्रोच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त ; रस्ता रुंदीकरणाकडे मनपा प्रशासनानेही दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 17:27 IST

मेट्रो प्रकल्प भिवंडी शहरातून अंजुरफाटा ,धामणकर नाका, कल्याण नाका मार्गे टेमघर, साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार आहे.

- नितिन पंडित  

भिवंडी - ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो ५ प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे . सध्या या मेट्रोप्रकल्पाच्या कामास सुरवात होऊन कशेळी पासून ते थेट भिवंडी शहरातील धामणकर नाका पर्यंत रस्त्यावर बॅरिकेट्स लावून कामास प्रत्येक्ष सुरवात देखील करण्यात आली आहे . मात्र हे काम करतांना मेट्रोप्रकल्पाच्या संबंधित ठेकेदार व जबादार अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे . विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरु झाला तरीही मेट्रो मार्गिकेमध्ये येणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हातून कोंडीची समस्या निर्माण झाली आहे . त्यातच प्रकल्प ठेकेदार व अधिकाऱ्यांसह एमएमआरडीए व भिवंडी महानगरपालिका प्रशासनात काडीचीही सुसूत्रता दिसत नसल्याने हे काम नक्की पूर्णत्वास जाणार का किंवा कसे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

 मेट्रो प्रकल्प भिवंडी शहरातून अंजुरफाटा ,धामणकर नाका, कल्याण नाका मार्गे टेमघर, साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार असून या मार्गावरील अतिक्रमण हटविणे, रस्ते रुंदीकरण करण्या बाबत कोणतेही नियोजन महानगरपालिका प्रशासना कडून केले नसल्याने या मार्गा वरून मेट्रो जाणार कशी या बाबत नागरीकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच या मेट्रोच्या मार्गिकेत ठेकेदारांनी मोठ्या वजनाचे लोखंडी बॅरिकेट्स उभी केल्याने रस्ता अरुंद झाल्याने धामणकर नाका ते अंजुरफाटा या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असताना ठेकेदारांनी ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक उभे करणे गरजेचे आहे मात्र तशी व्यवस्था अजूनही झालेली नसल्याने बॅरिकेट्स पडून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे कल्याण रोड मार्गात कोणतेही नियोजन न केल्याने या मार्गावरील व्यावसायिक ,निवासी गाळेधारक रस्ता रुंदीकरणास विरोध करीत असताना त्यांचे समाधान आज पर्यंत झाले नसल्याने शहरात सुरू झालेले मेट्रो चे काम पुढे कसे नेणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रोच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसणार असल्याने मेट्रो प्रकल्पातील संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.  

टॅग्स :Metroमेट्रोbhiwandiभिवंडी