शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
6
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
7
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
8
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
9
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
10
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
11
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
12
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
13
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
14
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
15
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
16
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
17
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
18
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
19
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
20
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

भिवंडीत मेट्रोच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त ; रस्ता रुंदीकरणाकडे मनपा प्रशासनानेही दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 17:27 IST

मेट्रो प्रकल्प भिवंडी शहरातून अंजुरफाटा ,धामणकर नाका, कल्याण नाका मार्गे टेमघर, साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार आहे.

- नितिन पंडित  

भिवंडी - ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो ५ प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे . सध्या या मेट्रोप्रकल्पाच्या कामास सुरवात होऊन कशेळी पासून ते थेट भिवंडी शहरातील धामणकर नाका पर्यंत रस्त्यावर बॅरिकेट्स लावून कामास प्रत्येक्ष सुरवात देखील करण्यात आली आहे . मात्र हे काम करतांना मेट्रोप्रकल्पाच्या संबंधित ठेकेदार व जबादार अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे . विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरु झाला तरीही मेट्रो मार्गिकेमध्ये येणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हातून कोंडीची समस्या निर्माण झाली आहे . त्यातच प्रकल्प ठेकेदार व अधिकाऱ्यांसह एमएमआरडीए व भिवंडी महानगरपालिका प्रशासनात काडीचीही सुसूत्रता दिसत नसल्याने हे काम नक्की पूर्णत्वास जाणार का किंवा कसे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

 मेट्रो प्रकल्प भिवंडी शहरातून अंजुरफाटा ,धामणकर नाका, कल्याण नाका मार्गे टेमघर, साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार असून या मार्गावरील अतिक्रमण हटविणे, रस्ते रुंदीकरण करण्या बाबत कोणतेही नियोजन महानगरपालिका प्रशासना कडून केले नसल्याने या मार्गा वरून मेट्रो जाणार कशी या बाबत नागरीकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच या मेट्रोच्या मार्गिकेत ठेकेदारांनी मोठ्या वजनाचे लोखंडी बॅरिकेट्स उभी केल्याने रस्ता अरुंद झाल्याने धामणकर नाका ते अंजुरफाटा या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असताना ठेकेदारांनी ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक उभे करणे गरजेचे आहे मात्र तशी व्यवस्था अजूनही झालेली नसल्याने बॅरिकेट्स पडून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे कल्याण रोड मार्गात कोणतेही नियोजन न केल्याने या मार्गावरील व्यावसायिक ,निवासी गाळेधारक रस्ता रुंदीकरणास विरोध करीत असताना त्यांचे समाधान आज पर्यंत झाले नसल्याने शहरात सुरू झालेले मेट्रो चे काम पुढे कसे नेणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रोच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसणार असल्याने मेट्रो प्रकल्पातील संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.  

टॅग्स :Metroमेट्रोbhiwandiभिवंडी