शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अंबरनाथमध्ये नागरिक रस्त्यावर, आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 03:02 IST

मोरीवली येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीने शहरातील कंपन्या आणि त्यापासून निर्माण होणारा प्रदूषणचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अंबरनाथ - मोरीवली येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीने शहरातील कंपन्या आणि त्यापासून निर्माण होणारा प्रदूषणचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रदूषण करणारा आणि शहरासाठी घातक ठरणाऱ्या कंपनींच्या विरोधात बुधवारी मानवी साखळी तयार करून प्रदूषणाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ऐन दिवाळीत हे आंदोलन झाल्याने प्रशासनाला आता तरी जाग येईल का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष व त्यांचे नेते ‘दिवाळी पहाट’ सारखे कार्यक्र म करण्यात व्यस्त असताना अंबरनाथ शहरातील नागरिक प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरले होते. डम्पिंग, केमिकल कंपन्यातील धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी बी केबिन रोड ते नवरेनगरपर्यंत मानवी साखळी करून प्रशासनाचा निषेध केला. अंबरनाथमध्ये सध्या डम्पिंग आणि एमआयडीसीतील कंपन्यातील घातक आणि दुर्गंधी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या समस्येकडे संबंधित यंत्रणा गांभीर्याने पाहत नसल्याने अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले.डम्पिंगप्रमाणे नागरिकांचा संतापही धगधगत असल्याने वेळीच याकडे लक्ष न दिल्यास याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डम्पिंग आणि कंपन्यांमधून निघणा-या धुरामुळे ग्रीन सीटी, निसर्ग ग्रीन, नवरेनगर, रॉयल पार्कया भागात राहणाºया लाखो नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. धुरामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.मानवी साखळीबी केबिन रस्त्यावर सकाळी आठ वाजता दोन किलोमीटर एवढी लांब मानवी साखळी तयार केली होती.प्रशासन कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :thaneठाणे