शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

अंबरनाथमध्ये नागरिक रस्त्यावर, आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 03:02 IST

मोरीवली येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीने शहरातील कंपन्या आणि त्यापासून निर्माण होणारा प्रदूषणचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अंबरनाथ - मोरीवली येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीने शहरातील कंपन्या आणि त्यापासून निर्माण होणारा प्रदूषणचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रदूषण करणारा आणि शहरासाठी घातक ठरणाऱ्या कंपनींच्या विरोधात बुधवारी मानवी साखळी तयार करून प्रदूषणाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ऐन दिवाळीत हे आंदोलन झाल्याने प्रशासनाला आता तरी जाग येईल का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष व त्यांचे नेते ‘दिवाळी पहाट’ सारखे कार्यक्र म करण्यात व्यस्त असताना अंबरनाथ शहरातील नागरिक प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरले होते. डम्पिंग, केमिकल कंपन्यातील धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी बी केबिन रोड ते नवरेनगरपर्यंत मानवी साखळी करून प्रशासनाचा निषेध केला. अंबरनाथमध्ये सध्या डम्पिंग आणि एमआयडीसीतील कंपन्यातील घातक आणि दुर्गंधी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या समस्येकडे संबंधित यंत्रणा गांभीर्याने पाहत नसल्याने अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले.डम्पिंगप्रमाणे नागरिकांचा संतापही धगधगत असल्याने वेळीच याकडे लक्ष न दिल्यास याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डम्पिंग आणि कंपन्यांमधून निघणा-या धुरामुळे ग्रीन सीटी, निसर्ग ग्रीन, नवरेनगर, रॉयल पार्कया भागात राहणाºया लाखो नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. धुरामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.मानवी साखळीबी केबिन रस्त्यावर सकाळी आठ वाजता दोन किलोमीटर एवढी लांब मानवी साखळी तयार केली होती.प्रशासन कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :thaneठाणे