शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

चिखलोली धरण पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:51 IST

गेल्यावर्षी मे महिन्यात चिखलोली धरणातील पाणीसाठ्यात रसायनांचे अंश आढळल्याने या धरणातील पाणीपुरवठा बंद केला होता. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले होते.

अंबरनाथ  - गेल्यावर्षी मे महिन्यात चिखलोली धरणातील पाणीसाठ्यात रसायनांचे अंश आढळल्याने या धरणातील पाणीपुरवठा बंद केला होता. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले होते. मात्र ना चौकशी ना कंपन्यांवर कारवाई झाली. त्यामुळे पुन्हा या धरणातील पाण्याला कारखान्यांचा धोका निर्माण झाला आहे.अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दतील चिखलोली धरणातून नियमित शहरातील पूर्व भागात सहा दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र या धरणाच्या सीमेवर अनेक रासायनिक कारखाने उभारण्याची परवानगी एमआयडीसीने दिल्याने या कारखान्यांचा धोका थेट धरणाला झाला आहे. या कारखान्यातील रासायनिक द्रव्य थेट धरणपात्रात जात असल्याने धरणातील पाणी दूषित होत आहे. गेल्यावर्षी हा प्रकार उजेडात आला होता. कारण दरवर्षीपेक्षा जास्त रसायन या पाण्यात आढळले होते. या धरणातील सर्व पाणी दूषित आणि घातक झाल्याने या धरणातून पाणी उचलण्यास बंदी घातली होती. तब्बल महिनाभर अंबरनाथ पूर्व भागाला या धरणातून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. धरणात थेट कंपनीतील रसायन येत असल्याने कंपन्यांवर कारवाईची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र या कंपन्यांवर कारवाई झालेली नाही. २१ मे रोजी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या धरणाची पाहणी केली होती. धरणाच्या पाण्यात रसायनमिश्रीत पाणी असल्याचे समोर आल्यावर त्यांनी संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र महिना उलटल्यावरही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मंत्र्यांचेच आदेश धाब्यावर बसविण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले होते. काहीतरी कारवाई दाखविण्याच्या प्रयत्नात प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कारखान्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत राहिले. सरकारी यंत्रणेच्या या कामचुकारपणाचा फटका हा चिखलोली धरणाला आणि त्यातील पाण्याला बसत आहे.पावसाळा संपत आल्याने आता पुन्हा या धरणातून अंबरनाथ शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. या धरणातील पाणी दूषित होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने जीवन प्राधिकरणाचे अधिकारीही प्रयत्न करीत आहेत. मात्र ज्या कंपन्यांनी गेल्यावर्षी धरणातील पाणी दूषित केले होते त्यांच्यावर कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने हे कंपनी व्यवस्थापन निर्धास्त झाले आहेत.चिखलोली धरणातील पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होत नसल्याने या प्रकरणी मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी पुढाकार घेतला आहे. धरणातील पाणी दूषित करणारे कारखाने बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अंबरनाथ शहरातील पूर्वेकडील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, कैलासनगर, वडवलीचा काही भाग असा सुमारे पन्नास हजार लोकवस्तीला या धरणातून पाणीपुरवठा होतो.मनसेचा आंदोलनाचा इशाराही बाब लक्षात घेऊन लघु पाटबंधºयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी पंधरा दिवसात संबंधित कंपन्यांवर चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी लकडे यांनी केली आहे. कारवाई न केल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरण