शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

चिखलोली धरण पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:51 IST

गेल्यावर्षी मे महिन्यात चिखलोली धरणातील पाणीसाठ्यात रसायनांचे अंश आढळल्याने या धरणातील पाणीपुरवठा बंद केला होता. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले होते.

अंबरनाथ  - गेल्यावर्षी मे महिन्यात चिखलोली धरणातील पाणीसाठ्यात रसायनांचे अंश आढळल्याने या धरणातील पाणीपुरवठा बंद केला होता. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले होते. मात्र ना चौकशी ना कंपन्यांवर कारवाई झाली. त्यामुळे पुन्हा या धरणातील पाण्याला कारखान्यांचा धोका निर्माण झाला आहे.अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दतील चिखलोली धरणातून नियमित शहरातील पूर्व भागात सहा दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र या धरणाच्या सीमेवर अनेक रासायनिक कारखाने उभारण्याची परवानगी एमआयडीसीने दिल्याने या कारखान्यांचा धोका थेट धरणाला झाला आहे. या कारखान्यातील रासायनिक द्रव्य थेट धरणपात्रात जात असल्याने धरणातील पाणी दूषित होत आहे. गेल्यावर्षी हा प्रकार उजेडात आला होता. कारण दरवर्षीपेक्षा जास्त रसायन या पाण्यात आढळले होते. या धरणातील सर्व पाणी दूषित आणि घातक झाल्याने या धरणातून पाणी उचलण्यास बंदी घातली होती. तब्बल महिनाभर अंबरनाथ पूर्व भागाला या धरणातून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. धरणात थेट कंपनीतील रसायन येत असल्याने कंपन्यांवर कारवाईची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र या कंपन्यांवर कारवाई झालेली नाही. २१ मे रोजी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या धरणाची पाहणी केली होती. धरणाच्या पाण्यात रसायनमिश्रीत पाणी असल्याचे समोर आल्यावर त्यांनी संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र महिना उलटल्यावरही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मंत्र्यांचेच आदेश धाब्यावर बसविण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले होते. काहीतरी कारवाई दाखविण्याच्या प्रयत्नात प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कारखान्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत राहिले. सरकारी यंत्रणेच्या या कामचुकारपणाचा फटका हा चिखलोली धरणाला आणि त्यातील पाण्याला बसत आहे.पावसाळा संपत आल्याने आता पुन्हा या धरणातून अंबरनाथ शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. या धरणातील पाणी दूषित होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने जीवन प्राधिकरणाचे अधिकारीही प्रयत्न करीत आहेत. मात्र ज्या कंपन्यांनी गेल्यावर्षी धरणातील पाणी दूषित केले होते त्यांच्यावर कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने हे कंपनी व्यवस्थापन निर्धास्त झाले आहेत.चिखलोली धरणातील पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होत नसल्याने या प्रकरणी मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी पुढाकार घेतला आहे. धरणातील पाणी दूषित करणारे कारखाने बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अंबरनाथ शहरातील पूर्वेकडील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, कैलासनगर, वडवलीचा काही भाग असा सुमारे पन्नास हजार लोकवस्तीला या धरणातून पाणीपुरवठा होतो.मनसेचा आंदोलनाचा इशाराही बाब लक्षात घेऊन लघु पाटबंधºयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी पंधरा दिवसात संबंधित कंपन्यांवर चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी लकडे यांनी केली आहे. कारवाई न केल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरण