शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने शहापूरच्या ९७ गावांसह २५९ पाडे टँकरमुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 18:40 IST

‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल्यामुळे भिमनवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारमानले

ठळक मुद्दे भावली धरणातील १२.६९ दलघमी. हक्काचे पाणी आरक्षित‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरातजो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही, असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी

 भावली धरणातील १२.६९ दलघमी. हक्काचे पाणी आरक्षितलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ‘भावली धरण’ प्रकल्पातून शहापूर तालुक्यातील टँकरग्रस्त ९७ गावे २५९ पाड्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी सुमारे १२.६९ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंजुरी दिली आहे. या आदेशामुळे आता शहापूरच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यास यश मिळाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेवर मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांनी सांगितले.‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल्यामुळे भिमनवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारमानले. याचा लाभ शहापूरच्या माळ व दांड सारख्या दुर्गम भागातील गावांबरोबर वाशाळ, खर्र्डी, कसारा, चेरपोली, शहापूर, आसनगाव अशा दोन लाख लोकवस्तीच्या गावेपाडे आदी ९७ गावे व २५९ आदिवासी पाड्यांना आता हक्काचे पाणी मिळणार आहे.धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्यातील काही गावे अनके वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी या तालुक्यातील नागरिकांच्या व्यथांची दाखल घेत भावली धरणातील पाणी जलसंपदा प्रकल्पातून बिगर सिंचन पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने या तालुक्यातील गावपाड्यांची पाणी समस्या कायमची मिटणार आहे अशी माहिती भीमनवार यांनी दिली. शहापूर येथील कुणबी महोत्सवाला मुख्यमंत्री आले असता त्यावेळी पाण्यासंदर्भातील लोकांच्या तीव्र भावना त्यांनी लक्षात घेत ‘गुरूत्वाकर्षण पद्धतीने भावली धरणाचे पाणी आणण्यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते.जो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही, असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देणारा शासन निर्णय काढून शहापूरचा पाणी प्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांनी देखील वारंवार आवाज उठवून पाटपुरावा केला असता त्यास यश मिळाले आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद