शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने शहापूरच्या ९७ गावांसह २५९ पाडे टँकरमुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 18:40 IST

‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल्यामुळे भिमनवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारमानले

ठळक मुद्दे भावली धरणातील १२.६९ दलघमी. हक्काचे पाणी आरक्षित‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरातजो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही, असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी

 भावली धरणातील १२.६९ दलघमी. हक्काचे पाणी आरक्षितलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ‘भावली धरण’ प्रकल्पातून शहापूर तालुक्यातील टँकरग्रस्त ९७ गावे २५९ पाड्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी सुमारे १२.६९ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंजुरी दिली आहे. या आदेशामुळे आता शहापूरच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यास यश मिळाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेवर मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांनी सांगितले.‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल्यामुळे भिमनवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारमानले. याचा लाभ शहापूरच्या माळ व दांड सारख्या दुर्गम भागातील गावांबरोबर वाशाळ, खर्र्डी, कसारा, चेरपोली, शहापूर, आसनगाव अशा दोन लाख लोकवस्तीच्या गावेपाडे आदी ९७ गावे व २५९ आदिवासी पाड्यांना आता हक्काचे पाणी मिळणार आहे.धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्यातील काही गावे अनके वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी या तालुक्यातील नागरिकांच्या व्यथांची दाखल घेत भावली धरणातील पाणी जलसंपदा प्रकल्पातून बिगर सिंचन पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने या तालुक्यातील गावपाड्यांची पाणी समस्या कायमची मिटणार आहे अशी माहिती भीमनवार यांनी दिली. शहापूर येथील कुणबी महोत्सवाला मुख्यमंत्री आले असता त्यावेळी पाण्यासंदर्भातील लोकांच्या तीव्र भावना त्यांनी लक्षात घेत ‘गुरूत्वाकर्षण पद्धतीने भावली धरणाचे पाणी आणण्यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते.जो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही, असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देणारा शासन निर्णय काढून शहापूरचा पाणी प्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांनी देखील वारंवार आवाज उठवून पाटपुरावा केला असता त्यास यश मिळाले आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद