शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

मुख्यमंत्री २० तारखेला २७ गावांत

By admin | Updated: October 19, 2015 01:13 IST

कोणत्याही परिस्थितीत कल्याण-डोंबिवली मनपात भाजपाचा महापौर निवडून आणण्याचा ध्यास घेलेल्या भाजपाने २७ गावांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

चिकणघर : कोणत्याही परिस्थितीत कल्याण-डोंबिवली मनपात भाजपाचा महापौर निवडून आणण्याचा ध्यास घेलेल्या भाजपाने २७ गावांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मंगळवारी २० आॅक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २७ गावांत येत असून येथूनच ते भाजपाच्या जाहीर प्रचारांचा नारळ फोडणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता मानपाडास्थित प्रिमीअर मैदानात मुख्यमंत्र्यांची सभा असल्याची माहिती भाजपा ग्रामीणचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी दिली.विनोद काळण, रुपाली गोरे, सुनिता खंडागळे, शीतल चव्हाण, मोरेश्वर भोईर, राहुल पाटील, रमाकांत पाटील, नीता म्हात्रे, सुनिता पाटील, स्नेहल म्हात्रे, रेश्मा धमापूरकर, दमयंती वझे, जालंधर पाटील, इंदिरा तरे, लालचंद भोईर, पूजा पाटील, प्रशिला साळुंखे अशा १७ सर्वपक्षिय उमेदवारांना समितीने पुरस्कृत केले आहे. शिवसेने समोर समितीने आव्हान उभे केले असले तरी शिवसेनाही आपल्या रणनीतीनुसार गुप्त प्रचार करीत आहे. कोणाची किती ताकद आहे हे निकालावरून सष्ट होईल. रविवार हा चाकरमान्यांच्या सुट्टीचा दिवस असल्याने त्याचा फायदा घेण्यावर उमेदवारांनी भर दिला. सकाळपासून ते चाकरमान्यांच्या घरी भेट देत होते. सगळीच मंडळी आज भेटतात याचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांची पळापळ होती. १ नोव्हेंबरला मतदान असून त्या आधी १८ आणि २२ व २६ आॅक्टोबर असे तीनच दिवस चााकरमान्यांच्या सुट्टीचे असून त्यापैकी एक रविार गेला. सोमवार ते शनिवार असे सहा दिवस चाकरमानी घरात भेटत नाहीत. म्हणून चाकरमान्यांच्या भेटीगाठी घेण्यावर उमेदवारांनी भर देऊन आपल्यालाच मते देण्याचे आवाहन केले आहे.भाजपातर्फे जातीच्या कार्डाचा वापर>कल्याणमधील एक गठ्ठा मते मिळविण्यासाठी भाजपाने कोळी जातीच्या कार्डाचाही वापर केला आहे. कल्याण पश्चिमेतील कोळी समाजाचे प्राबल्य पाहता कोळी समाजाला भाजपाने ९ प्रभागांत उमेदवारी देऊन सहानभूती मिळविण्याचे राजकारण खेळले आहे. >प्रभाग -४ (कविता मिरकुटे), प्रभाग ६ (कल्पना गोडे), प्रभाग ७ (भरत) प्रभाग ९ (उपेक्षा भोईर), प्रभाग १० (प्रदीप भोईर), प्रभाग १३ (जनार्दन पाटील), प्रभाग १४ (योगीता पाटील), प्रभाग ४५ (रेखा चौधरी) आणि अपर्णा पाटील (प्रभाग १२) अशा नऊ कोळीबांधवांना उमेवारी दिल्याची माहिती कोळी समाजाचे राज्य उपाध्यक्ष देवानंद भोईर यांनी दिली.अखेर २७ गावांतला बहिष्कार फुटला गेल्याने रविवारी झालेल्या २७ गाव सर्वपक्षिय संरक्षण संघर्ष समितीने एकमताने उमेदवारांची यादी जाहीर करून शिवसेने समोर एकास एक उमेदवार दिला आहे. यामुळे २७ गावांतली निवडणूक आता रंगतदार होणार असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. २१ प्रभागातील दोन बिनविरोध आणि दोन बहिष्काराग्रस्त प्रभाग असल्याने १७ प्रभागात शिवसेना आण संघर्ष समिती असा थेट समाना होईल.