शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने पोलिसांची त्रेधा, देवेंद्र फडणवीस यांची केवळ तीन मिनिटांची आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:54 IST

भाजपाने माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ऐनवेळी ठाण्यात येण्याचा निर्णय घेतल्याने फडणवीस यांच्या सुरक्षेकरिता बंदोबस्त लावताना पोलिसांची धावपळ उडाली.

ठाणे : भाजपाने माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ऐनवेळी ठाण्यात येण्याचा निर्णय घेतल्याने फडणवीस यांच्या सुरक्षेकरिता बंदोबस्त लावताना पोलिसांची धावपळ उडाली. मंगळवारी मुख्यमंत्री येत असल्याचा निरोप जेमतेम काही तास अगोदर नियंत्रण कक्षातून पोलिसांना मिळाला. त्यामुळे नाताळचा बंदोबस्त व पोलिसांच्या सुट्यांमुळे अगोदरच कामाच्या ताणाखाली असलेल्या पोलिसांची दमछाक झाली. ज्या कार्यक्रमात मुख्यमंत्री हजर राहिले तेथे त्यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करणारे केवळ तीन मिनिटांचे भाषण केले.नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाºया शिवसमर्थ मैदानावर भाजपाचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वरवंदना’ आणि ‘अटल ज्येष्ठ सन्मान सोहळा’ या कार्यक्रमाचे मंगळवारी सायंकाळी ६ वा. भाजपाच्या ठाणे शहर शाखेतर्फे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा निरोप भाजपा मीडियाच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर दुपारी एक वाजता दिला गेला. त्यामध्ये मुख्यमंत्री ठाण्यात येणार असल्याचा उल्लेख नव्हता. परंतु, दीड वाजता दिलेल्या निरोपात ‘मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ठाणे नगरीत हार्दिक स्वागत’ असे पोस्टर संदेशासोबत प्रसृत करण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता नौपाडा पोलीस आणि ठाणे नियंत्रण कक्षालाही मुख्यमंत्री नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ७ वाजता येत असल्याचा वायरलेस मेसेज आला. हा मेसेज मिळताच ज्यांच्या हद्दीत कार्यक्रम होणार होता त्या नौपाडा पोलिसांबरोबरच ठाण्याच्या वेशीवरील कोपरी तसेच वागळे इस्टेट, ठाणेनगर, राबोडी या सर्वच पोलीस ठाण्यांमधील अधिकाºयांची बंदोबस्त लावताना तारांबळ उडाली. नाताळनिमित्त अनेक अधिकारी व पोलीस यांच्या अगोदरच ड्युट्या लावण्यात आल्या होत्या. शिवाय नाताळ व वर्षअखेर असल्याने काही अधिकारी व कर्मचाºयांनी सुट्या घेतल्याने स्टाफची चणचण होती. गणेशोत्सवाच्या दरम्यान मुख्यमंत्री एका ज्येष्ठ पत्रकाराच्या घरी येणार असल्याचा निरोप असाच ठाणे पोलिसांना रात्री ९ वा. मिळाला व त्यानंतर रात्री १२ वाजता ते ठाण्यात दाखल झाले होते. तो खासगी कार्यक्रम होता. हा सार्वजनिक कार्यक्रम असल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने तसेच आयोजकांनीही कार्यक्रमाचे नियोजन करणे अपेक्षित असल्याचेही एका अधिकाºयाने खासगीत सांगितले. वेगवेगळ््या जातीय संघटनांकडून दिले जाणारे इशारे, राज्याच्या काही भागातील नक्षलवादी कारवाया तसेच मुंबईवर यापूर्वी झालेले दहशतवादी हल्ले या बाबींचा विचार भाजपाच्या नेत्यांनीही ऐनवेळी मुख्यमंत्र्यांना बोलावताना करायला हवा, असे मत पोलिसांनी खासगीत व्यक्त केले.मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता दाखल झालेले मुख्यमंत्री सायंकाळी ७.३० वा. मुंबईला रवाना झाले आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दोन ते तीन दिवस आधी पोलिसांना दिला जातो दौºयाचा तपशीलमुख्यमंत्री येणार असल्यास प्रोटोकॉलनुसार किमान एक दिवस आधी संबंधित जिल्हयाच्या पोलीस यंत्रणेला रितसर निरोप देण्याची व्यवस्था केली जाते.हा निरोप नियंत्रण कक्षाकडे किंवा विशेष शाखा सांभाळणाºया उपायुक्त अथवा पोलीस निरीक्षकांकडे येत असतो. कधीकधी तर दोन ते तीन दिवस आधी पोलिसांकडे निरोप येतो.त्यानुसार मुख्यमंत्री ज्या भागातून जाणार त्या भागातील पोलीस ठाण्यांना त्या मार्गावरील बंदोबस्तासाठी दोन तास अगोदर आणि मुख्यमंत्री परत जाईपर्यत तैनात केले जाते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस