शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

ठाण्यातील नालेसफाईची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी : जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 23:49 IST

भाजपचे आमदार केळकर यांनी ठाणे शहरातील नालेसफाईमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

ठाणे : जर ठाण्यातील एखाद्या आंब्याच्या स्टॉलसाठी मुख्यमंत्र्यांकडून फोन येऊ शकतो. तर ठाणे महापालिकेतील नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीही आ. संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी, असे आवाहन राष्टÑवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी सत्ताधारी भाजपला केले. नालेसफाई ही पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ती तातडीने करण्याची मागणी ३ मे रोजीच पालिका आयुक्तांकडे केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपचे आमदार केळकर यांनी ठाणे शहरातील नालेसफाईमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या चौकशीचे आव्हान केळकर यांच्यासह पालिका आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्यांनी दिले.ते म्हणाले, केळकर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून आणावेत. जर, आंब्याचा एक स्टॉल हटविण्यासाठी मुख्यमंत्री मध्यस्थी करीत असतील, तर लोकांच्या जीविताशी संबंधित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाच पाहिजे. नाल्यातून निर्माण झालेला पैसा कुठे जातो, हे मुख्यमंत्र्यांनी शोधावे, असे आवाहन आव्हाड यांनी केले.गेली दहा वर्षे आम्ही नालेसफाई व्यवस्थित होण्याच्या उद्देशाने ठामपाशी पत्रव्यवहार करीत आहोत. एकच अधिकारी गेली दहा वर्षे नालेसफाईवर लक्ष ठेवून आहे. नालेसफाईचे काम करणारे ठेकेदार कोणाच्या रोजंदारीवर आहेत; नालेसफाईवर गेली २५ वर्षे सत्तेत असलेले लोक का बोलत नाहीत, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.नालेसफाईसंदर्भात मागील वर्षी ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी मांडलेली लक्षवेधी आजपर्यंत सभागृहात घेण्यात आलेली नाही. याचीही कारणे आता सत्ताधारी आणि प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी आव्हाड यांनी केली.नालेसफाईला यंदाही उशीरजूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठाण्यात पावसाचे आगमन होते. त्याचदरम्यान नालेसफाईला सुरुवात होते. त्यामुळे अर्धी नालेसफाई झाल्याने त्या नाल्यातील कचरा वाहून जातो. बाहेर काढलेला कचराही पावसाच्या पाण्याने पुन्हा त्याच कचºयात मिसळून नाल्यात जातो. पालिकेचे अधिकारी हे नालेसफाईचा उद्योग फक्त पैसे खाण्यासाठीच करीत आहेत, असा आरोप ३ मे रोजी पालिका आयुक्त जयस्वाल यांना दिलेल्या पत्रामध्ये आव्हाड यांनी केला होता. आताही नालेसफाईला उशिर झाला असून गेल्या वर्षी रामचंद्रनगर, संभाजीनगर परिसरातील नाल्यांमधून दोन महिला वाहून गेल्याच्या घटनेकडेही त्यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड