शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

'मुख्यमंत्र्यांनी दीड महिन्यातच शब्द फिरवला'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 01:34 IST

कचरासफाईसाठी फेरनिविदेला मंजुरी, कंत्राटी कामगार पगारापासून वंचित

- धीरज परबमीरा रोड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा- भार्इंदर पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना अंशदान व रजेचा पगार मिळाला नाही, म्हणून नवीन कचरासफाईची निविदा काढण्यास दिलेली स्थगिती अवघ्या दीड महिन्यात स्वत:च उठवली आहे. कामगारांच्या हाती त्यांच्या हक्काची देणी पडली नसतानाच पालिकेने कचरासफाईची फेरनिविदा प्रसिद्ध केली आहे.२०१२ मध्ये ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला पाच वर्षांसाठी दिलेल्या सफाई कंत्राटाची मुदत गेल्या वर्षी संपली आहे. सध्या मुदतवाढीवर काम सुरू आहे. १६०० कंत्राटी सफाई कामगारांना पाच वर्षे सेवा झाल्याने त्यांचे अंशदान, रजेचा पगार तसेच साहित्य आदींसाठी श्रमजीवी कामगार रयत संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचा लढा सुरूच आहे. महापालिका व कंत्राटदाराने सफाई कामगारांची हक्काची देणी दिली नसतानाच एप्रिलमध्ये कचरासफाईसाठी नवा कंत्राटदार नेमण्याकरिता निविदा काढली. मात्र, कामगार विभागाने निर्देश देऊनही कंत्राटदार व पालिकेने कामगारांना अंशदान व हक्काच्या रजेचा पगार दिला नाही, तर नवीन येणारा कंत्राटदार हात झटकेल आणि कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असे पंडित यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितले.पंडित यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी शेरा मारत नव्या कचरासफाई कंत्राटाच्या निविदा प्रक्रियेस स्थगिती दिली होती.स्थगितीवर आयुक्तांनी ३० मे रोजी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला. अहवालात सध्याच्या कंत्राटदाराची मुदत संपल्याने तसेच कचरा वर्गीकरणाचे काम सुरू करून कचरा प्रकल्प पूर्ण करायचा असल्याचे म्हटले होते. आयुक्तांच्या अहवालापाठोपाठ आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन निविदा प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली होती. अवर सचिव नवनाथ वाठ यांनी पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी कचरा वर्गीकरण व वाहतुकीकरिता कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रियेला दिलेली स्थगिती उठवण्यात आल्याचे कळवले.कंत्राटदार नियुक्तीच्या निविदा प्रक्रियेला खुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्थगिती दिल्याने थकीत अंशदान, रजेचा पगार आदी पदरी पडेल, अशी सफाई कामगारांनी बाळगलेली आशा आता मुख्यमंत्र्यांनीच आपला निर्णय फिरवल्याने फोल ठरली आहे. चार वर्षांसाठी कंत्राटदार नियुक्त केला जाणार असून पहिल्या वर्षासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी त्यात पाच टक्के वाढ केली जाणार आहे.विवेक पंडित यांची महत्त्वाची भूमिकापालघर लोकसभेची पोटनिवडणूक मुख्यमंत्र्यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. निवडणूक जिंकण्यासाठी विवेक पंडित यांची भूमिका महत्त्वाची होती.पोटनिवडणुकीदरम्यानच ांडित यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्थगिती देण्याची मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी लगेच स्थगितीही दिली. पण, भाजपाचा उमेदवार विजयी होताच मेहतांनी दिलेल्या पत्रावरून लगोलग मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठवली.मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून चुकीचा आदेश मिळवला आहे. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपणास, मी कामगारांची देणी देण्याची अट काढण्यास सांगितलेले नाही, असे कळवले आहे.- विवेक पंडित,माजी आमदार 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmira roadमीरा रोड