शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री की व्हॉइसरॉय? हा बंद म्हणजे निव्वळ बालिशपणा; जितेंद्र आव्हाड यांनी लगावला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 05:35 IST

आनंदनगर चेकनाका येथून राष्ट्रवादीचे सुमारे पाच हजार पदाधिकारी, वारकरी मुंबईच्या दिशेने बसने रवाना झाले. तेव्हा आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पोलिसांना हाताशी घेऊन हा बंद करण्यात आला आहे. हा बंद म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. मोर्चा निघणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था, वाहतूककोंडी होणार नाही, यासाठी पोलिसांना सूचना देणे गरजेचे होते. पण,  मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण होत असेल, बस बंद केल्या जात असतील तर  ही दडपशाही आहे. मुंबईतील महामाेर्चा दडपण्यासाठीच हा बंद घडवून आणला. ते मुख्यमंत्री आहेत की व्हाइसरॉय आहेत, असा प्रश्न पडला असल्याचेही आव्हाड म्हणाले. 

महापुरुषांचा वारंवार केला जाणारा अवमान, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, राज्यातील बेरोजगारी याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महामोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी आनंदनगर चेकनाका येथून राष्ट्रवादीचे सुमारे पाच हजार पदाधिकारी, वारकरी मुंबईच्या दिशेने बसने रवाना झाले. तेव्हा आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ठाण्याहून हजारो लोक मुंबईला निघाले आहेत. त्यांच्या मनात आक्रोश आहे. सरकारमधील नेतेमंडळी महापुरुषांबद्दल करत असलेले अवमानजनक वक्तव्य याविराेधात हा आक्रोश आहे, असे ते म्हणाले. ठाण्यात बंद पुकारून परिवहन सेवा बंद ठेवून, रिक्षाचालकांना दमदाटी करून नागरिकांना वेठीस धरण्यात आले. त्यांनी वारकऱ्यांसाठी हा संप केलेला आहे. पण खुद्द वारकरी हे आमच्यासोबत आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ९ वर्षांपूर्वीचे पुराण काढण्याचा हा प्रकार असून त्यांचे हे नवीन नाटक असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी उपस्थित वारकऱ्यांना ठाणे बंदविषयी छेडले असता, त्यांनी सर्व बनावट आहे. आम्हीही वारकरी आहोत. पिढ्यानपिढ्या वारकरी परंपरा जपत आहोत, असे सांगितले. यावेळी आव्हाड यांनी त्या वारकऱ्यांसमाेर नतमस्तक होऊन त्यांचे धन्यवाद मानले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड