शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सत्यनारायणामुळे झालो मुख्यमंत्री , मनोहर जोशी यांची भावना, कथाकथन स्पर्धेच्या निमित्ताने आत्मकथन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 06:36 IST

कथा सांगणे, हीसुद्धा मोठी कला आहे आणि ती मला चांगलीच येते. मी इयत्ता पाचवीपासून कथा सांगतो. ती म्हणजे सत्यनारायणाची कथा; पण सत्यनारायणाची कथा सांगूनही मुख्यमंत्री होता येते, असे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितले.

ठाणे : कथा सांगणे, हीसुद्धा मोठी कला आहे आणि ती मला चांगलीच येते. मी इयत्ता पाचवीपासून कथा सांगतो. ती म्हणजे सत्यनारायणाची कथा; पण सत्यनारायणाची कथा सांगूनही मुख्यमंत्री होता येते, असे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितले.कोकण कला अकादमी, आनंद विश्व गुरु कुल महाविद्यालय व मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ठाणे कोकण विभागीय पातळीवरील कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात जोशी यांनी आत्मकथन केले.जोशी म्हणाले की, राजकारणात मनापासून काम करणाºयाला अपयश मिळत नाही. मला यश मिळाले आणि मोठी पदेही. मनापासून काम केले, तर राजकारणात प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. स्पर्धा कमालीची असते. परंतु, आपल्याला जे सांगायचे असते, ते पटवून देता आले पाहिजे. राजकारणात असूनही मी शब्द पाळतो. मी राजकारणात प्रवेश करून ५० वर्षे होत आहे आणि शिवसेनेला ५१ वर्षे. ठाण्यातील लोक शिस्तबद्ध आहे आणि त्यांच्या शिस्तीमुळे मी इथे हजर राहतो. भाषण चांगले असेल, तर श्रोते बसून राहतात. राजकारण हा माझा आवडता विषय आहे. राजकारणातही अभ्यास सुरू असतो. मी राजकारणात असतानाही अभ्यास सोडला नाही. विद्यार्थ्यांना सल्ला देताना ते म्हणाले की, आत्मविश्वास बाळगा, काम करण्याची इच्छा असू द्या. स्वत: नोकºया निर्माण करा, ध्यास घ्या, मोठे व्हा. नोकरीपेक्षा व्यवसाय करा, असा सल्लाही त्यांनी दिला.लेखिका प्रा. माधवी घारपुरे, उमा चांदे, स्नेहा केसरकर, नितल वढावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. साहित्याची मौखिक परंपरा जपण्यासाठी कथाकथन ही कला जपली पाहिजे. कथाकथनाला नाट्य हवे, नाटक नको. अभिनय हवा, अभिनेता नको. स्मरणशक्ती हवी, पण पाठांतर नको. ही त्रिशुळाची तीन टोके आहेत. स्पर्धकाने निवडलेली कथा, शब्दांचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशा शब्दांत घारपुरे यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.या स्पर्धेत आंतरशालेय गटातून होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या अदिती सावंत, तर आंतरमहाविद्यालय गटातून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विशाखा गढरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय पारितोषिक आंतरशालेय गटात ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेची परी भारदे व सरस्वती सेकंडरी स्कूलचा गंधार कुलकर्णी यांना विभागून देण्यात आले. तृतीय क्रमांक ए.के. जोशी इंग्लिश मीडियम शाळेची वेदान्ती हिंदुराव हिने पटकावला. आंतरमहाविद्यालयीन गटात द्वितीय पारितोषिक आनंद विश्व गुरुकुल ज्यु. कॉलेजच्या रेणुका भिरंगी, हिने तर तृतीय पारितोषिक दी एसआयए ज्यु. कॉलेज, डोंबिवलीच्या सहयोगी गायकवाड, शेठ एनकेटी कनिष्ठ महाविद्यालय, ठाणेच्या नूपुरा बंदे यांना विभागून देण्यात आले. सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार