शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

सत्यनारायणामुळे झालो मुख्यमंत्री , मनोहर जोशी यांची भावना, कथाकथन स्पर्धेच्या निमित्ताने आत्मकथन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 06:36 IST

कथा सांगणे, हीसुद्धा मोठी कला आहे आणि ती मला चांगलीच येते. मी इयत्ता पाचवीपासून कथा सांगतो. ती म्हणजे सत्यनारायणाची कथा; पण सत्यनारायणाची कथा सांगूनही मुख्यमंत्री होता येते, असे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितले.

ठाणे : कथा सांगणे, हीसुद्धा मोठी कला आहे आणि ती मला चांगलीच येते. मी इयत्ता पाचवीपासून कथा सांगतो. ती म्हणजे सत्यनारायणाची कथा; पण सत्यनारायणाची कथा सांगूनही मुख्यमंत्री होता येते, असे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितले.कोकण कला अकादमी, आनंद विश्व गुरु कुल महाविद्यालय व मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ठाणे कोकण विभागीय पातळीवरील कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात जोशी यांनी आत्मकथन केले.जोशी म्हणाले की, राजकारणात मनापासून काम करणाºयाला अपयश मिळत नाही. मला यश मिळाले आणि मोठी पदेही. मनापासून काम केले, तर राजकारणात प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. स्पर्धा कमालीची असते. परंतु, आपल्याला जे सांगायचे असते, ते पटवून देता आले पाहिजे. राजकारणात असूनही मी शब्द पाळतो. मी राजकारणात प्रवेश करून ५० वर्षे होत आहे आणि शिवसेनेला ५१ वर्षे. ठाण्यातील लोक शिस्तबद्ध आहे आणि त्यांच्या शिस्तीमुळे मी इथे हजर राहतो. भाषण चांगले असेल, तर श्रोते बसून राहतात. राजकारण हा माझा आवडता विषय आहे. राजकारणातही अभ्यास सुरू असतो. मी राजकारणात असतानाही अभ्यास सोडला नाही. विद्यार्थ्यांना सल्ला देताना ते म्हणाले की, आत्मविश्वास बाळगा, काम करण्याची इच्छा असू द्या. स्वत: नोकºया निर्माण करा, ध्यास घ्या, मोठे व्हा. नोकरीपेक्षा व्यवसाय करा, असा सल्लाही त्यांनी दिला.लेखिका प्रा. माधवी घारपुरे, उमा चांदे, स्नेहा केसरकर, नितल वढावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. साहित्याची मौखिक परंपरा जपण्यासाठी कथाकथन ही कला जपली पाहिजे. कथाकथनाला नाट्य हवे, नाटक नको. अभिनय हवा, अभिनेता नको. स्मरणशक्ती हवी, पण पाठांतर नको. ही त्रिशुळाची तीन टोके आहेत. स्पर्धकाने निवडलेली कथा, शब्दांचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशा शब्दांत घारपुरे यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.या स्पर्धेत आंतरशालेय गटातून होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या अदिती सावंत, तर आंतरमहाविद्यालय गटातून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विशाखा गढरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय पारितोषिक आंतरशालेय गटात ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेची परी भारदे व सरस्वती सेकंडरी स्कूलचा गंधार कुलकर्णी यांना विभागून देण्यात आले. तृतीय क्रमांक ए.के. जोशी इंग्लिश मीडियम शाळेची वेदान्ती हिंदुराव हिने पटकावला. आंतरमहाविद्यालयीन गटात द्वितीय पारितोषिक आनंद विश्व गुरुकुल ज्यु. कॉलेजच्या रेणुका भिरंगी, हिने तर तृतीय पारितोषिक दी एसआयए ज्यु. कॉलेज, डोंबिवलीच्या सहयोगी गायकवाड, शेठ एनकेटी कनिष्ठ महाविद्यालय, ठाणेच्या नूपुरा बंदे यांना विभागून देण्यात आले. सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार