शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन, लोकार्पण केलेले प्रकल्प केवळ कागदावरच, ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 01:29 IST

मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन केलेली क्लस्टर योजना प्रत्यक्षात महिना संपत आला तरी सुरूझालेली नाही,

ठाणे : मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन केलेली क्लस्टर योजना प्रत्यक्षात महिना संपत आला तरी सुरूझालेली नाही, तसेच दिव्यांगांची घरे, स्टॉलच्या वाटपासह बीएसयूपीच्या घरांचे वाटपही अद्याप झालेले नाही. शिवाय, आपला दवाखाना योजनेतून तयार होणारे दवाखाने अद्यापही तयार झालेले नाहीत. त्यामुळे करून दाखवले म्हणत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक केल्याची टीका आता होऊ लागली आहे.निवडणुकीपूर्वी ठाणेकरांना दिलेल्या क्लस्टर योजनेच्या आश्वासनाची पूर्तता म्हणून ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किसननगर भागातील काही भागांचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर, हे काम सुरू होईल, अशी आशा होती. परंतु, ते अद्यापही सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे येथील रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली, तरी या योजनेत अद्यापही अडथळे कायम आहेत. याच्या हरकती, सुनावणी अद्यापही झालेली नाही. तसेच येथील बाधितांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन कुठे करणार, याचेही नियोजन केलेले नाही.दुसरीकडे दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर आपला दवाखाना सुरू केला आहे. शहरात अशा स्वरूपाचे ५० दवाखाने सुरू करण्याच्या निमित्ताने त्याचेही लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. परंतु, महिना उलटल्यानंतरही घाणेकर नाट्यगृह परिसरातील दवाखान्याचा डेमो काही हललेला नसून शहरात हे दवाखाने सुरूझालेले नाहीत.बीएसयूपीची घरे, दिव्यांगांची १९० घरे, २६० स्टॉलचे वाटपही प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु, आज हे सर्व कागदावरच आहे. दिव्यांगांच्या घरांच्या फायलींवर शुक्रवारी आयुक्तांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ढोकाळी भागातील सायन्स पार्क आणि अर्बन जंगल या प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी करूनही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनीच आता या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. ही सर्व कामे अर्धवट असताना त्याची घाई कशासाठी, असा सवालही भाजपने केला आहे.

प्रकल्पांच्या भूमिपूजन व लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी लाखोंचा निधी खर्च केला आहे. परंतु, आता एक ते दोन आठवड्यांत पुन्हा या योजनांसाठी आणखी एक कार्यक्रम घेण्याचा विचार पालिकेचा असून त्यानंतर प्रत्यक्षात घरांचे चावीवाटप, स्टॉलवाटप केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.> मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन करून त्यांच्या वचनांची पूर्तता शिवसेना करणार नसेल, तर मग याचा अर्थ सत्ताधारी शिवसेना नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसते. यामध्ये केवळ ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक करून त्यांची शिवसेनेने केलेली ही निव्वळ फसवणूक आहे. करदात्या ठाणेकरांच्या पैशांची ही केवळ उधळपट्टी आहे. मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेले प्रकल्प त्यांच्याच पक्षाचे नेते रद्द करतात, यापलीकडे आणखी वाईट ते काय. - आ. निरंजन डावखरे,अध्यक्ष, भाजपा ठाणे शहर जिल्हा

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे