शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खान यांच्यात रंगली पाण्यासंदर्भात चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 15:54 IST

राज्यातील उपलब्ध पाणी, त्याचा विनीयोग, करण्यासह आगामी उन्हाळ्यात राज्यात ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या पाणी समस्या , त्यावर संभाव्य उपाययोजनांच्या  संकल्पनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रधानसचिव आणि संबंधीत मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी मंत्रालयात पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान चर्चा केली. 

ठाणे : राज्यातील उपलब्ध पाणी, त्याचा विनीयोग, करण्यासह आगामी उन्हाळ्यात राज्यात ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या पाणी समस्या , त्यावर संभाव्य उपाययोजनांच्या  संकल्पनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रधानसचिव आणि संबंधीत मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी मंत्रालयात पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान चर्चा केली. यावेळी ठाण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी देखील या बैठकीत व्हीडीओ कॉन्स्फरसद्वारे सहभागी झाले. राज्यात मागील वर्षी जलशिवार व जलसंधारणची कामे मोठ्याप्रमाणात झाले आहेत. जुन्या धरणातील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यामध्ये राज्य शासनाला चांगले यश मिळाले आहे. शासनाच्या पाण्या संबंधातील योजना लोकचळवळ म्हणून राज्यात राबवण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यात या चळवळीत नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी होऊन पाणी समस्येवर मात केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारा ठाणे जिल्हा पाणी टंचाईने ग्रासलेले असताना जलशिवारच्या लोकचळवळीने त्यावर बऱ्यापैकी मात करणे शक्य झाले. भाजीपाल्यासारख्या रब्बी पिकांसह गुरांसाठी उन्हाळ्यातील काही महिने राणावणात पाणी उपलब्ध झाले.   ग्रामीण आदिवासी, दुर्गमभागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी आणि शहरातील उपलब्ध पाणी वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवून लोकांमध्ये त्या रूजवण्यासाठी आमीर खान यांच्यासह त्यांच्या फाऊंडेशनचे काम वाखण्याजोगे आहे. देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या या फाऊंडेशनच्या आजवरच्या अनुभवातून राज्यात आणखी काही करणे शक्य करण्यासाठी या बैठकीतून नक्कीच चांगले फलित होण्याचा अपेक्षा जलसंधारणात व जलशिवारसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAamir Khanआमिर खान