शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत पाच वर्षांत पडणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:16 IST

ठाणे : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु , निधीची कमतरता ...

ठाणे : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु , निधीची कमतरता असून वेळेत तिची दुरुस्ती झाली नाही तर ती पाच वर्षांत पडेल,असा धक्कादायक आरोप रुग्णालयाच्या डीन संध्या खडसे यांनी केला. सध्या तिची अवस्था भीषण असून भिंतीचे पोपडे पडणे, बुरशी लागणे, सफाईकामगार आणि सुरक्षारक्षकांची अपुरी संख्या यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर असल्याचे सांगून त्यांनी आपल्याच प्रशासनाविरोधात आवाज उठवला.

या रुग्णालयातील डॉक्टरांनाच डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दुपारी १२ च्या सुमारास रुग्णालयाची पाहणी केली. तसेच आजाराने ग्रस्त असलेल्या डॉक्टरांचीही विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना खडसे यांनी कळवा रुग्णालयातील असुविधांचा पाढा वाचला.

रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्षया रुग्णालयात १७ विभाग असून याठिकाणी रोज ओपीडीला १६०० ते १८०० रुग्ण येत आहेत. दिवसाला २५ ते ३० विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत. तर २०० हून अधिक रुग्ण हे उपचारासाठी येथे दाखल होत असतात. परंतु, ही इमारत २५ वर्षांहून अधिक काळ जुनी आहे. दोन वर्षांपूर्वी तिचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यानसार ती धोकादायक स्थितीत आली असून तिची दुरुस्ती गरजेची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याचा ठपकाही त्यांनी प्रशासनावर ठेवला. भिंतीना रंग नाही, बुरशी लागलेली आहे, इतर अनेक असुविधा आहेत, कुठे पोपडे पडत आहेत. अशी विविध समस्या असून त्या सोडवल्या जात नाही. मात्र,दुसरीकडे काही मंडळींकडून या ठिकाणचे मेडिकल कॉलेज हे पांढरा हत्ती असल्याचा उल्लेख केला जात असून ते बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुरुस्तीसाठी जो निधी मिळतो तो सुद्धा तुटपुंजा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.अपुऱ्या सुविधा : मुलांसाठी होस्टेल नाही, एका एका रुममध्ये तीन ते चार जण राहत आहेत, डक्ट जुने आहेत, भिंती ओलसर झाल्या आहेत, त्यामुळे येथील डॉक्टर आजारी पडत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.सुरक्षारक्षकांची संख्याही कमीसफाईकामगारांची संख्या ४० ते ४५ ही तुटपुंजी असून सुरक्षारक्षकांची संख्याही १७२ आवश्यक असतांनाही केवळ ५० ते ६० सुरक्षारक्षक कार्यरत असून येथे चोरीची घटना घडल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.डेंग्यूचे रोज येतात तीन रुग्णयेथील कॅबलॅबबाबतही त्यांनी यावेळी आक्षेप घेतला आहे. पीपीपी तत्वावर हे काम केले जात असून त्याठिकाणी एसीमधून पाणी गळत असल्याने त्याचा त्रास डॉक्टरांना होत असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात रोज तीन रुग्ण हे डेंग्यूचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.अन्यथा आंदोलन करूछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालायत ज्या काही असुविधा आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही प्रशासनाला सात दिवसांची मुदत देत आहोत. परंतु, त्यानंतरही त्यात सुधारणा झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन होईल.- मनोज शिंदे, शहर अध्यक्ष - काँग्रेसमेडिकल तीन वर्षांपासून बंदसर्वसामान्यांना औषधे मिळावीत म्हणून येथे मेडिकल स्टोअर असणे अपेक्षित आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून ते बंद आहे. परंतु, आता ते आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मोफत देण्याचा घाट घातला जात आहे.- विक्रांत चव्हाण, गटनेते, काँग्रेस