शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत पाच वर्षांत पडणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:16 IST

ठाणे : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु , निधीची कमतरता ...

ठाणे : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु , निधीची कमतरता असून वेळेत तिची दुरुस्ती झाली नाही तर ती पाच वर्षांत पडेल,असा धक्कादायक आरोप रुग्णालयाच्या डीन संध्या खडसे यांनी केला. सध्या तिची अवस्था भीषण असून भिंतीचे पोपडे पडणे, बुरशी लागणे, सफाईकामगार आणि सुरक्षारक्षकांची अपुरी संख्या यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर असल्याचे सांगून त्यांनी आपल्याच प्रशासनाविरोधात आवाज उठवला.

या रुग्णालयातील डॉक्टरांनाच डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दुपारी १२ च्या सुमारास रुग्णालयाची पाहणी केली. तसेच आजाराने ग्रस्त असलेल्या डॉक्टरांचीही विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना खडसे यांनी कळवा रुग्णालयातील असुविधांचा पाढा वाचला.

रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्षया रुग्णालयात १७ विभाग असून याठिकाणी रोज ओपीडीला १६०० ते १८०० रुग्ण येत आहेत. दिवसाला २५ ते ३० विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत. तर २०० हून अधिक रुग्ण हे उपचारासाठी येथे दाखल होत असतात. परंतु, ही इमारत २५ वर्षांहून अधिक काळ जुनी आहे. दोन वर्षांपूर्वी तिचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यानसार ती धोकादायक स्थितीत आली असून तिची दुरुस्ती गरजेची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याचा ठपकाही त्यांनी प्रशासनावर ठेवला. भिंतीना रंग नाही, बुरशी लागलेली आहे, इतर अनेक असुविधा आहेत, कुठे पोपडे पडत आहेत. अशी विविध समस्या असून त्या सोडवल्या जात नाही. मात्र,दुसरीकडे काही मंडळींकडून या ठिकाणचे मेडिकल कॉलेज हे पांढरा हत्ती असल्याचा उल्लेख केला जात असून ते बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुरुस्तीसाठी जो निधी मिळतो तो सुद्धा तुटपुंजा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.अपुऱ्या सुविधा : मुलांसाठी होस्टेल नाही, एका एका रुममध्ये तीन ते चार जण राहत आहेत, डक्ट जुने आहेत, भिंती ओलसर झाल्या आहेत, त्यामुळे येथील डॉक्टर आजारी पडत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.सुरक्षारक्षकांची संख्याही कमीसफाईकामगारांची संख्या ४० ते ४५ ही तुटपुंजी असून सुरक्षारक्षकांची संख्याही १७२ आवश्यक असतांनाही केवळ ५० ते ६० सुरक्षारक्षक कार्यरत असून येथे चोरीची घटना घडल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.डेंग्यूचे रोज येतात तीन रुग्णयेथील कॅबलॅबबाबतही त्यांनी यावेळी आक्षेप घेतला आहे. पीपीपी तत्वावर हे काम केले जात असून त्याठिकाणी एसीमधून पाणी गळत असल्याने त्याचा त्रास डॉक्टरांना होत असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात रोज तीन रुग्ण हे डेंग्यूचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.अन्यथा आंदोलन करूछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालायत ज्या काही असुविधा आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही प्रशासनाला सात दिवसांची मुदत देत आहोत. परंतु, त्यानंतरही त्यात सुधारणा झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन होईल.- मनोज शिंदे, शहर अध्यक्ष - काँग्रेसमेडिकल तीन वर्षांपासून बंदसर्वसामान्यांना औषधे मिळावीत म्हणून येथे मेडिकल स्टोअर असणे अपेक्षित आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून ते बंद आहे. परंतु, आता ते आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मोफत देण्याचा घाट घातला जात आहे.- विक्रांत चव्हाण, गटनेते, काँग्रेस