शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 00:09 IST

‘आमा’ची नाराजी : आनंदनगर एमआयडीसीतील चित्र

अंबरनाथ : येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र अनेक वर्षांपासून धूळखात आहे. हा प्रकल्प सुरू न केल्यास रासायनिक उद्योग अन्य राज्यांत स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात ‘आमा’ संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.एमआयडीसीमधील कारखानदार पर्यावरणस्नेही पद्धतीने उत्पादन प्रक्रिया करू इच्छित आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) सुरू करण्याबाबत एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ उदासीन असल्याचा आरोप अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आमा) चे अध्यक्ष उमेश तायडे यांनी बुधवारी केला. गेली सात वर्षे संघटनेतर्फे पाठपुरावा करूनही सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झालेले नाही.

या औद्योगिक वसाहतीतील १२७ कंपन्या या केंद्राच्या सभासद आहेत. केंद्र सुरू झाल्यास रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणे सोपे होईल. वैयक्तिकरीत्या अशा प्रकारचे प्रक्रिया केंद्र उभारणे सर्वच उद्योजकांना परवडणारे नाही. प्रत्येक कंपनीने स्वतंत्र अशी यंत्रणा बसवली, तर एक घनमीटर रासायनिक सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ९० ते ११० रुपये खर्च येतो. तीच प्रक्रिया जर सामायिक केंद्रातून झाली, तर एक घनमीटर पाण्यासाठी फक्त २९ रुपये खर्च उद्योजकांना परवडणारा आहे. मात्र, विनंती करूनही केंद्र सुरू करण्याबाबत यंत्रणा उदासीन आहे.नऊ हजार कोटींची होते निर्यातच्उद्योजकांचे प्रतिनिधी म्हणून संघटना हे केंद्र सुरू करण्याबाबत आग्रही आहे. कारण, हे केंद्र सुरू होत नसल्याचा ठपका उद्योजकांवर ठेवला जात आहे. आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधून दरवर्षी नऊ हजार कोटींचा माल निर्यात होतो. त्यातून सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळतो.च्मात्र, गेल्या काही वर्षांत या त्रासाला कंटाळून अनेक उद्योग स्थलांतरित झाले. काही स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे व्यवस्थापन कोणत्याही कंपनीला द्या, परंतु सीईटीपी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी तायडे यांनी केली आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरWaterपाणी