शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

फड गप्पांचा - कोणाच्या कुटुंबात काय चाललेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 01:49 IST

हो... कारण नाही ठेवला तरी त्यांना काही फरक पडत नाही... हे आपण जाणून असावे...

अमोल ठाकूर

मला सांगा ही प्रधानसेवकांची भाषणं कोण लिहितं?काय झालं?काय झालं म्हणून काय विचारता?सगळी कामंधामं सोडून त्यांची सभा ऐकायला बसायचं आणि ते विकासाचं, नवभारताचं काही सांगतील असं वाटत असतानाच... प्रधानसेवक भलतेच काही सांगू लागतात. कोणाच्या कुटुंबात काय चाललं आहे, कोण तिहारमध्ये आहे म्हणून कोणाची झोप उडाली आहे... कोण गतिरोधक आहे... हे काय प्रधानसेवकांनी बोलायचे विषय आहेत का?अच्छा, कळला तुमचा त्रागा. ते बारामतीकरांना म्हणाले की, ‘‘त्यांच्या कुटुंंबात गोंधळ सुरू आहे...’’ मग गोंदियात म्हणाले, ‘‘एनसीपीच्या नेत्यांची झोप उडाली आहे... कोणीतरी तिहारमध्ये काही बोलेल म्हणून...’’ हे असं बोलावं लागतं... ते राजकीय भाष्य असतं.पण...पण काय आणि बिण काय... प्रधानसेवक आहेत ते. समोर बसलेल्या हजारो लोकांना काय सांगणार... आपण पाच वर्षांत कशी प्रगती केली... किती स्मार्ट सिटी तयार केल्या... किती शौचालयं बांधली... किती रेल्वे स्टेशनांत किती सरकते जिने लावले... या सगळ्याची उजळणी करत बसले तर लोक भाषण ऐकतील का? त्यांना असे आरोप-प्रत्यारोप, खुली आव्हानं, उणीदुणी हेच ऐकायचं असतं...असं कसं काय म्हणता तुम्ही? मग देशाला दिशा कोणी द्यायची... पुढचा विचार काय ते कोणी सांगायचं?ते काय हे असं जाहीर प्रचार सभांमध्ये सांगायचं असतं का? ते वेळोवेळी होणाऱ्या सभा, संमेलनांत बोललं जातंच की... कधी कधी वेळ झाला तर संसदेतही ते बोलतात... त्यातून दिशा मिळते.पण तिथेही ते हेच बोलत होते... सत्तर वर्षांची टेप वाजवत होते... आधीचे सत्ताधारी कसे होते हेच तर ते गेले पाच वर्षं सांगत होते... आता तेच तेच परत कशाला?हे राजकारण आहे... जाहीर सभेत बोलायच्या गोष्टी वेगळ्या, खासगीतल्या वेगळ्या, कौतुक सोहळ्यातल्या वेगळ्या... ही मोठी माणसं जेव्हा बोलतात तेव्हा मोजूनमापून बोलतात... त्यांच्या बोलण्याचे काय पडसाद उमटतात हे जाणून घेण्यासाठी बोलतात... त्यातून जनतेच्या मनाचा अंदाज घेतात... आधी बोललेलं पुसून टाकायचं असेल तर... मी असं बोललोच नव्हतो किंवा माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता असं म्हणतात......आणि त्यावर आपण विश्वास ठेवायचा?हो... कारण नाही ठेवला तरी त्यांना काही फरक पडत नाही... हे आपण जाणून असावे... म्हणजे मग भाषण कोणी लिहिलं असा आपल्याला प्रश्न पडत नाही.- म. हा. मुंबापुरीकर

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMumbaiमुंबई