शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

फड गप्पांचा - कोणाच्या कुटुंबात काय चाललेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 01:49 IST

हो... कारण नाही ठेवला तरी त्यांना काही फरक पडत नाही... हे आपण जाणून असावे...

अमोल ठाकूर

मला सांगा ही प्रधानसेवकांची भाषणं कोण लिहितं?काय झालं?काय झालं म्हणून काय विचारता?सगळी कामंधामं सोडून त्यांची सभा ऐकायला बसायचं आणि ते विकासाचं, नवभारताचं काही सांगतील असं वाटत असतानाच... प्रधानसेवक भलतेच काही सांगू लागतात. कोणाच्या कुटुंबात काय चाललं आहे, कोण तिहारमध्ये आहे म्हणून कोणाची झोप उडाली आहे... कोण गतिरोधक आहे... हे काय प्रधानसेवकांनी बोलायचे विषय आहेत का?अच्छा, कळला तुमचा त्रागा. ते बारामतीकरांना म्हणाले की, ‘‘त्यांच्या कुटुंंबात गोंधळ सुरू आहे...’’ मग गोंदियात म्हणाले, ‘‘एनसीपीच्या नेत्यांची झोप उडाली आहे... कोणीतरी तिहारमध्ये काही बोलेल म्हणून...’’ हे असं बोलावं लागतं... ते राजकीय भाष्य असतं.पण...पण काय आणि बिण काय... प्रधानसेवक आहेत ते. समोर बसलेल्या हजारो लोकांना काय सांगणार... आपण पाच वर्षांत कशी प्रगती केली... किती स्मार्ट सिटी तयार केल्या... किती शौचालयं बांधली... किती रेल्वे स्टेशनांत किती सरकते जिने लावले... या सगळ्याची उजळणी करत बसले तर लोक भाषण ऐकतील का? त्यांना असे आरोप-प्रत्यारोप, खुली आव्हानं, उणीदुणी हेच ऐकायचं असतं...असं कसं काय म्हणता तुम्ही? मग देशाला दिशा कोणी द्यायची... पुढचा विचार काय ते कोणी सांगायचं?ते काय हे असं जाहीर प्रचार सभांमध्ये सांगायचं असतं का? ते वेळोवेळी होणाऱ्या सभा, संमेलनांत बोललं जातंच की... कधी कधी वेळ झाला तर संसदेतही ते बोलतात... त्यातून दिशा मिळते.पण तिथेही ते हेच बोलत होते... सत्तर वर्षांची टेप वाजवत होते... आधीचे सत्ताधारी कसे होते हेच तर ते गेले पाच वर्षं सांगत होते... आता तेच तेच परत कशाला?हे राजकारण आहे... जाहीर सभेत बोलायच्या गोष्टी वेगळ्या, खासगीतल्या वेगळ्या, कौतुक सोहळ्यातल्या वेगळ्या... ही मोठी माणसं जेव्हा बोलतात तेव्हा मोजूनमापून बोलतात... त्यांच्या बोलण्याचे काय पडसाद उमटतात हे जाणून घेण्यासाठी बोलतात... त्यातून जनतेच्या मनाचा अंदाज घेतात... आधी बोललेलं पुसून टाकायचं असेल तर... मी असं बोललोच नव्हतो किंवा माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता असं म्हणतात......आणि त्यावर आपण विश्वास ठेवायचा?हो... कारण नाही ठेवला तरी त्यांना काही फरक पडत नाही... हे आपण जाणून असावे... म्हणजे मग भाषण कोणी लिहिलं असा आपल्याला प्रश्न पडत नाही.- म. हा. मुंबापुरीकर

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMumbaiमुंबई