शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फड गप्पांचा - कोणाच्या कुटुंबात काय चाललेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 01:49 IST

हो... कारण नाही ठेवला तरी त्यांना काही फरक पडत नाही... हे आपण जाणून असावे...

अमोल ठाकूर

मला सांगा ही प्रधानसेवकांची भाषणं कोण लिहितं?काय झालं?काय झालं म्हणून काय विचारता?सगळी कामंधामं सोडून त्यांची सभा ऐकायला बसायचं आणि ते विकासाचं, नवभारताचं काही सांगतील असं वाटत असतानाच... प्रधानसेवक भलतेच काही सांगू लागतात. कोणाच्या कुटुंबात काय चाललं आहे, कोण तिहारमध्ये आहे म्हणून कोणाची झोप उडाली आहे... कोण गतिरोधक आहे... हे काय प्रधानसेवकांनी बोलायचे विषय आहेत का?अच्छा, कळला तुमचा त्रागा. ते बारामतीकरांना म्हणाले की, ‘‘त्यांच्या कुटुंंबात गोंधळ सुरू आहे...’’ मग गोंदियात म्हणाले, ‘‘एनसीपीच्या नेत्यांची झोप उडाली आहे... कोणीतरी तिहारमध्ये काही बोलेल म्हणून...’’ हे असं बोलावं लागतं... ते राजकीय भाष्य असतं.पण...पण काय आणि बिण काय... प्रधानसेवक आहेत ते. समोर बसलेल्या हजारो लोकांना काय सांगणार... आपण पाच वर्षांत कशी प्रगती केली... किती स्मार्ट सिटी तयार केल्या... किती शौचालयं बांधली... किती रेल्वे स्टेशनांत किती सरकते जिने लावले... या सगळ्याची उजळणी करत बसले तर लोक भाषण ऐकतील का? त्यांना असे आरोप-प्रत्यारोप, खुली आव्हानं, उणीदुणी हेच ऐकायचं असतं...असं कसं काय म्हणता तुम्ही? मग देशाला दिशा कोणी द्यायची... पुढचा विचार काय ते कोणी सांगायचं?ते काय हे असं जाहीर प्रचार सभांमध्ये सांगायचं असतं का? ते वेळोवेळी होणाऱ्या सभा, संमेलनांत बोललं जातंच की... कधी कधी वेळ झाला तर संसदेतही ते बोलतात... त्यातून दिशा मिळते.पण तिथेही ते हेच बोलत होते... सत्तर वर्षांची टेप वाजवत होते... आधीचे सत्ताधारी कसे होते हेच तर ते गेले पाच वर्षं सांगत होते... आता तेच तेच परत कशाला?हे राजकारण आहे... जाहीर सभेत बोलायच्या गोष्टी वेगळ्या, खासगीतल्या वेगळ्या, कौतुक सोहळ्यातल्या वेगळ्या... ही मोठी माणसं जेव्हा बोलतात तेव्हा मोजूनमापून बोलतात... त्यांच्या बोलण्याचे काय पडसाद उमटतात हे जाणून घेण्यासाठी बोलतात... त्यातून जनतेच्या मनाचा अंदाज घेतात... आधी बोललेलं पुसून टाकायचं असेल तर... मी असं बोललोच नव्हतो किंवा माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता असं म्हणतात......आणि त्यावर आपण विश्वास ठेवायचा?हो... कारण नाही ठेवला तरी त्यांना काही फरक पडत नाही... हे आपण जाणून असावे... म्हणजे मग भाषण कोणी लिहिलं असा आपल्याला प्रश्न पडत नाही.- म. हा. मुंबापुरीकर

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMumbaiमुंबई