शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

संजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यातील वाद ठरवून, आमदार बच्चू कडू यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 16:25 IST

मनसे आणि कॉंग्रेसमध्ये सध्या जो वाद सुरु आहे, तो ठरवुन केला जात असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच शेतकºयांसाठी येत्या ७ डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी ७ डिसेंबरला राज्यभर आंदोलनभाजपा सरकाराच्या काळात देवही गेले सुट्टीवरमराठी माणसांसाठी ३० टक्के सवलतीची योजना आणावी

ठाणे - परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सध्या काँग्रेसचे संजय निरुपम आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यात सुरु असलेला वाद हा ठरवून केलेला वाद असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. मराठी पाट्या बदलून मराठीपण जपले जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मनसेच्या आंदोलनावर टीका केली आहे.

            शनिवारी ते ठाणे महापालिकेत दिव्यांग्याच्या विविध मागण्यांसंदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना राज यांच्यावर थेट आरोप केला. यापूर्वी अबू आझमी आणि मनसेमध्ये अशाच प्रकारे ठरवून वाद करण्यात आला होता. यावेळी देखील राज ठाकरे आणिसंजय निरूपम यांच्यामध्ये ठरवून केलेला हा वाद असून जनतेला फसवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे अशा नेत्यांकडे दुर्लक्षच केले पाहिजे असे कडू यांनी सांगितले. ऊस, तूर आणि कापूस यांना योग्य भाव मिळावा म्हणून येत्या ७ डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी ठाण्यात केली आहे. भाजप सरकारवर जोरदार टीका करत या सरकारच्या काळात देव सुट्टीवर गेले असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचेही कडू यांनी सांगितले.मनसे आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर टीका केली केवळ काँग्रेस आणि मनसेवर टीका न करता त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील आपले टीकेचे लक्ष केले. मराठी किंवा अमराठी असा मुद्दा नसून केवळ प्रांतवाद हा राजकीय मुद्दा असल्याचे ते म्हणाले. मुंबईत मोठ्या प्रमाणात युपीमधून आलेले टॅक्सीचालक आहेत. मराठीचा पुळका घेणाऱ्यांनी मराठी माणसासाठी आतापर्यंत काय केले असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मराठी माणसांसाठी ३० टक्के सवलत देऊन टॅक्सी देण्याची एखादी योजना सरकारी पातळीवर आतापर्यंत का राबवण्यात आली नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. प्रांतवाद करणे हा केवळ राजकीय स्टंट असल्याचे सांगून त्यांनी राज ठाकरे आणि संजय निरु पम या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBachhu Kaduबच्चू कडू