शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

संजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यातील वाद ठरवून, आमदार बच्चू कडू यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 16:25 IST

मनसे आणि कॉंग्रेसमध्ये सध्या जो वाद सुरु आहे, तो ठरवुन केला जात असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच शेतकºयांसाठी येत्या ७ डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी ७ डिसेंबरला राज्यभर आंदोलनभाजपा सरकाराच्या काळात देवही गेले सुट्टीवरमराठी माणसांसाठी ३० टक्के सवलतीची योजना आणावी

ठाणे - परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सध्या काँग्रेसचे संजय निरुपम आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यात सुरु असलेला वाद हा ठरवून केलेला वाद असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. मराठी पाट्या बदलून मराठीपण जपले जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मनसेच्या आंदोलनावर टीका केली आहे.

            शनिवारी ते ठाणे महापालिकेत दिव्यांग्याच्या विविध मागण्यांसंदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना राज यांच्यावर थेट आरोप केला. यापूर्वी अबू आझमी आणि मनसेमध्ये अशाच प्रकारे ठरवून वाद करण्यात आला होता. यावेळी देखील राज ठाकरे आणिसंजय निरूपम यांच्यामध्ये ठरवून केलेला हा वाद असून जनतेला फसवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे अशा नेत्यांकडे दुर्लक्षच केले पाहिजे असे कडू यांनी सांगितले. ऊस, तूर आणि कापूस यांना योग्य भाव मिळावा म्हणून येत्या ७ डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी ठाण्यात केली आहे. भाजप सरकारवर जोरदार टीका करत या सरकारच्या काळात देव सुट्टीवर गेले असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचेही कडू यांनी सांगितले.मनसे आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर टीका केली केवळ काँग्रेस आणि मनसेवर टीका न करता त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील आपले टीकेचे लक्ष केले. मराठी किंवा अमराठी असा मुद्दा नसून केवळ प्रांतवाद हा राजकीय मुद्दा असल्याचे ते म्हणाले. मुंबईत मोठ्या प्रमाणात युपीमधून आलेले टॅक्सीचालक आहेत. मराठीचा पुळका घेणाऱ्यांनी मराठी माणसासाठी आतापर्यंत काय केले असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मराठी माणसांसाठी ३० टक्के सवलत देऊन टॅक्सी देण्याची एखादी योजना सरकारी पातळीवर आतापर्यंत का राबवण्यात आली नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. प्रांतवाद करणे हा केवळ राजकीय स्टंट असल्याचे सांगून त्यांनी राज ठाकरे आणि संजय निरु पम या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBachhu Kaduबच्चू कडू