शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

गृहपाठ - शिक्षकांची बदलती पंचसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:47 IST

संतोष सोनावणे

संतोष सोनावणे

आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीपासून आजच्या जागतिकीकरणाच्या युगातील शैक्षणिक बाजारपेठांपर्यंतच्या हजारो वर्षांच्या प्रवासात गुरू, आचार्य, अध्यापक, शिक्षक, प्राध्यापक अशा संज्ञा बदलत राहिल्या, परंतु शिक्षकाचं स्थान आजही अढळ आहे. बदललं ते शिक्षकाच्या कामाचं स्वरूप, शिकवण्याच्या पद्धती, शिक्षणाची साधनं. अर्थात, शिक्षकालाही तसा बदल स्वीकारणं व कार्यान्वित राहणंही अपरिहार्य आहे.

आज माहितीचे अक्षरश: जाळे तयार झाले आहे. एका क्लिकवर जग जवळ आले आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे खरंच क्रांती घडू पाहत आहे. अशा या वेगवान जगात त्याच वेगात स्वत:ला ठेवणं हे कठीण वाटत असलं, तरी अवघड मात्र निश्चित नाही. एके ठिकाणी माझ्या वाचनात आलं होतं की, शिक्षक म्हणजे टेक्स्टबुक टू नोटबुक. खरं म्हणजे, अशी मर्यादा शिक्षकपदाला तिथेच थांबवते. शिक्षकाने स्वत:ला कधीही अभ्यासक्र म, पाठ्यपुस्तक व परीक्षा या चक्रात बसवू नये. एकदा का आपल्या कामात साचेबंदपणा आला की, नवनिर्मिती, सृजनशीलता, प्रयोग हे आपोआपच थांबते. एका अर्थाने खरोखर एखाद्या कलावंताप्रमाणे शिक्षक जन्मावा लागतो. एकदा का तो जन्मला की, सुरू होते ती साधना, दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि परिश्रम. परंतु, याकरिता स्वत:ला सतत विद्यार्थी समजणं आणि त्याच ध्यासाने सतत शिकत राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. याकरिता पुढील पंचसूत्रीचा अवलंब करावयास हवा.१) आपल्या विषयावरची हुकूमत : जो विषय माझा आहे, माझ्या आवडीचा आहे, त्याचा व्यासंग हवा, त्यावर प्रभुत्व हवं. यात केवळ शालेय विषयच येतील, असे काही नाही तर ते ते सगळे विषय जे विद्यार्थीहित, समाजहित, राष्ट्रहित जपतात, त्यांचा यात समावेश होईल. आपल्या विषयाचा खोलवर अभ्यास हवा. वाचन हवं. आपल्या विषयाची कुठे चर्चा झाली तर आवर्जून आपले नाव यायला हवे. मनात ध्यास घेतला तर ते निश्चित शक्य आहे.२) शिकविण्याचे / अध्यापनाचे कौशल्य : विषयाचा केवळ व्यासंग हा आपल्याला अभ्यासू किडा बनवून टाकतो. आपला विषय अधिक रंजकपणे दुसऱ्याच्या वयाचा विचार करून त्याला समजेल, अशा भाषेत त्याच्या गळी उतरवणे हे आहे खरे कौशल्य. यासाठी हवा सराव व उत्कृष्टतेचा ध्यास.३) अद्ययावतता : शिक्षण क्षेत्रात होणारी विविध संशोधने, बदलत्या घडामोडी, होणारी स्थित्यंतरे, नवीन विषयप्रवाह याकरिता स्वत: नेहमी भुकेले राहणे गरजेचे आहे. आजचे ज्ञान हे उद्या जुने व कालबह्यहोत आहे. मला उद्यासाठी आज तयारी करायलाच हवी, ही काळाची गरज आहे, हे जाणणे गरजेचे आहे.४) वाचन व लिखाणात नियमितता, सातत्य : वरील तिन्ही तंत्रांकरिता सातत्याने वाचन व लिखाण करावयास हवे. विद्यार्थ्यांनी हजेरी, टाचण वही व अहवाल लेखन यात स्वत:ला बाहेर काढायला हवे. जसे आपण वाचतो, तसे आपण विचार करतो, तसे आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो. वाचन-लिखाणाने विचारात प्रगल्भता येते.५) विद्यार्थ्यांवरील नि:स्वार्थ व निर्व्याज प्रेम : वरील चारही तंत्राच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे हे तंत्र आहे. मुलांच्या चेहºयावरचा आनंद शोधणारा, शिकविताना ज्याचे अंत:करण भरून येते, कधी कधी त्याचा गळा दाटून येतो, हेच माझे काम व हेच माझे समाधान असे मानणारा खरा शिक्षक. मुलांना सतत प्रेरणा देणारा, जगण्याचं बळ देणारा व उंच आकाशात भरारी घेण्यासाठी उभारी देणारा शिक्षक व्हायला हवे.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणी कालच शिक्षक दिन साजरा केला गेला. एक व्यासंगी शिक्षणतज्ज्ञ हा देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो, याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. मात्र आज जगाने खूप वेग घेतलाय, ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्यात, अशावेळी शिक्षकांनीही स्वत:ला अधिक सक्षम व अद्ययावत ठेवणं काळाची गरज बनली आहे. 

टॅग्स :thaneठाणेTeacherशिक्षक