शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधील आसनव्यवस्थेत बदल : ३२ ऐवजी १४ प्रवाशांसाठीच आसन सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:40 IST

मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे पुर्वी ज्या आसनांवर ३२ प्रवाशी बसुन प्रवास करायचे आत्ता त्याच आसनांवर केवळ १४ च प्रवाशी बसुन प्रवास करत आहेत.

ठळक मुद्दे कसारा, नेरळ, बदलापूर, अंबरनाथच्या प्रवाशांना त्रास जुनी आसनव्यवस्थाच चांगली

डोंबिवली: मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे पुर्वी ज्या आसनांवर ३२ प्रवाशी बसुन प्रवास करायचे आत्ता त्याच आसनांवर केवळ १४ च प्रवाशी बसुन प्रवास करत आहेत.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन लांब पल्याच्या उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना सुरुवातीच्या स्थानकापासुनच ठाणे कल्याण पुढील रेल्वे स्थानकापर्यंत उभे राहुन प्रवास करावा लागत आहे. आसनावर बसलेल्या कुणी सहप्रवासीही लांबचा प्रवास असल्याने सहप्रवाशांना बसण्यासाठी जागा देत नसल्याचा अनुभव येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सीएसएमटी येथून निघालेल्या लोकलमध्ये आभावानेच प्रवासी घाटकोपर,ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान सहप्रवाशांना बसण्यासाठी जागा देतात. अन्यथा प्रवाशांना अडीच ते तीन तास ताटकळत प्रवास करावा लागत असल्याची खंत कर्जत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर गंगावणे यांनी व्यक्त केली. असे ताटकळत प्रवास करावा लागत असेल तर हजारो प्रवाशांना अल्पावधीतच शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा आणि तातडीने बदल करावा असेही ते म्हणाले. मध्य रेल्वे प्रशासनाने उपनगरीय लोकल गाड्यांमधिल आसनव्यवस्था बदलण्याअगोदर दुरवरील रेल्वे प्रवाशांचा विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. तरी, मध्य रेल्वे प्रशासनाने ३२ प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल करुन ती १४ प्रवाशांची केलेली आहे, त्या सर्व उपनगरीय लोकल गाड्या ह्या केवळ कमी अंतरावरील प्रवासाकरताच चालवाव्यात. सीएसएमटी-कुर्ला मार्गावर तसेच कर्ला-ठाणे मार्गावर अशा लोकल सोडल्यास प्रवाशांची फारशी गैरसोय होणार नाही, पण कर्जत-कसारा पर्यंत आणि तेथून सीएसएमटीपर्यंत असा प्रवास करावा लागणार म्हणजे मरण यातनाच असल्याची प्रतिक्रिया कर्जत, कसा-याच्या प्रवाशांमधून व्यक्त झाली. ज्येष्ठ नागरिकांसह गरोदर माता, विद्यार्थी यांच्यासह शारिरीक त्रास असलेल्या प्रवाशांना होणा-या त्रासाचाही रेल्वे प्रशासनाने विचार करायला हवा असेही मत व्यक्त झाले. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीKarjatकर्जतdombivaliडोंबिवली