शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी भिवंडीमध्ये निघाला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:13 IST

राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे- कापूरबावडी -भिवंडी - कल्याण या मेट्रो -५ मार्गिकेला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली आहे. मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते टेमघर नाक्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाने बाधित होणाºया नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी शुक्रवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढत विरोध केला.

भिवंडी : राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे- कापूरबावडी -भिवंडी - कल्याण या मेट्रो -५ मार्गिकेला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली आहे. मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते टेमघर नाक्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाने बाधित होणाºया नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी शुक्रवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढत विरोध केला.आॅक्टोबर २०१६ मध्ये कल्याण खाडीपुलाचे व मोठागाव पुलाचे उद््घाटन करताना केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो रेल्वे - ५ या प्रकल्पाची घोषणा केली. या प्रसंगी खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यानंतर एमएमआरडीएच्या बैठकीत ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो- ५ या मार्गाला मंजुरी देण्यात आली. एकूण २४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च ८ हजार ४१६ कोटी येणार आहे. या बैठकीत मेट्रो - ५ प्रकल्पासह मेट्रो - ६ च्या विस्तारीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प डीपीआरच्या मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवून मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो - ५ मध्ये एकूण १७ स्थानके आहेत. त्या स्थानकातील गोपाळनगर कल्याण नाका ते टेमघर मार्गावरील लोकवस्ती व दुकाने बाधित होत आहेत. त्यांचे प्रथम पुनर्वसन करणे आवश्यक आहे.परंतु या बाधित नागरिकांना निव्वळ नोटीसा बजावून संबंधित अधिकारी बेघर करण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप कल्याण रोड संघर्ष समितीने केला आहे. तसेच या मार्गावरील रेल्वेबाबत महासभेत घेतलेला ठराव रद्द करून या रेल्वेचा मार्ग बदलावा, अशी मागणी बाधितांनी केली आहे. सेनेचे नगरसेवक मदन बुवा नाईक, नासिर सय्यद, शादाब उस्मानी, राम शिगवण आदी सहभागी झाले होते. महापौर जावेद दळवी व पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना निवेदन दिले.

टॅग्स :Metroमेट्रो