शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी भिवंडीमध्ये निघाला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:13 IST

राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे- कापूरबावडी -भिवंडी - कल्याण या मेट्रो -५ मार्गिकेला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली आहे. मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते टेमघर नाक्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाने बाधित होणाºया नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी शुक्रवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढत विरोध केला.

भिवंडी : राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे- कापूरबावडी -भिवंडी - कल्याण या मेट्रो -५ मार्गिकेला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली आहे. मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते टेमघर नाक्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाने बाधित होणाºया नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी शुक्रवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढत विरोध केला.आॅक्टोबर २०१६ मध्ये कल्याण खाडीपुलाचे व मोठागाव पुलाचे उद््घाटन करताना केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो रेल्वे - ५ या प्रकल्पाची घोषणा केली. या प्रसंगी खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यानंतर एमएमआरडीएच्या बैठकीत ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो- ५ या मार्गाला मंजुरी देण्यात आली. एकूण २४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च ८ हजार ४१६ कोटी येणार आहे. या बैठकीत मेट्रो - ५ प्रकल्पासह मेट्रो - ६ च्या विस्तारीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प डीपीआरच्या मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवून मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो - ५ मध्ये एकूण १७ स्थानके आहेत. त्या स्थानकातील गोपाळनगर कल्याण नाका ते टेमघर मार्गावरील लोकवस्ती व दुकाने बाधित होत आहेत. त्यांचे प्रथम पुनर्वसन करणे आवश्यक आहे.परंतु या बाधित नागरिकांना निव्वळ नोटीसा बजावून संबंधित अधिकारी बेघर करण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप कल्याण रोड संघर्ष समितीने केला आहे. तसेच या मार्गावरील रेल्वेबाबत महासभेत घेतलेला ठराव रद्द करून या रेल्वेचा मार्ग बदलावा, अशी मागणी बाधितांनी केली आहे. सेनेचे नगरसेवक मदन बुवा नाईक, नासिर सय्यद, शादाब उस्मानी, राम शिगवण आदी सहभागी झाले होते. महापौर जावेद दळवी व पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना निवेदन दिले.

टॅग्स :Metroमेट्रो