शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी चाखतात ठाण्यातील नाश्त्याची चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 01:20 IST

कोकणात जलदगतीने जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी नवीन वर्षापासून ठाण्यात तयार होणारा चहा आणि ब्रेकफास्टची चव चाखत आहेत.

पंकज रोडेकर ठाणे : कोकणात जलदगतीने जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी नवीन वर्षापासून ठाण्यात तयार होणारा चहा आणि ब्रेकफास्टची चव चाखत आहेत. अशा प्रकारे ऐतिहासिक असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकात खाद्यपदार्थ लोड होण्याची रेल्वेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.मुंबई ते कोकणातील करमाळी हे ५५२ किमीचे अंतर अवघ्या आठ तासांत कापणारी तेजस एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटते. तसेच दुपारी २ वाजता ती करमाळीला दाखल होते. इतर एक्स्प्रेसप्रमाणे या एक्स्प्रेसमध्येही सुरुवातीला मुंबईतून खाद्यपदार्थ लोड केले जात होते. मात्र, नवीन वर्षात त्यामध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझमने बदल केला आहे. यानुसार, या एक्स्प्रेसमधील सकाळच्या ब्रेकफास्टचा ठेका फूड प्लाझाला तब्बल पाच वर्षांकरिता दिला आहे.ठाण्यात ब्रेकफास्ट, तर रत्नागिरी येथे लंच आणि करमाळीत डीनर गाडीत लोड केले जाऊ लागले आहे. त्यामुळे गाडीत मुंबईऐवजी ठाण्यात तयार होणाºया नाश्त्याची चव चाखता येत आहे. ती आठवड्यातून पाचवेळा या मार्गावर धावते.रेल्वेतील तिकीटधारकांची संख्या निश्चित झाली की, रेल्वे प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला प्रवाशांच्या मागणीनुसार व्हेज आणि नॉनव्हेज असे खाद्यपदार्थ तयार करण्यास सांगितले जाते. त्यानुसार, तयार झालेले ताजे पदार्थ गाडीत रेल्वेस्थानकात दाखल होण्यापूर्वीच आणले जातात.संबंधित कंत्राटदाराकडे पुरेपूर असलेल्या मनुष्यबळामुळे संबंधितांकडून ते खाद्यपदार्थ १२ डब्यांत अवघ्या ३२ सेकंदांत लोड होतात. या नाश्त्याचे प्रवाशांकडून केलेल्या मागणीनुसारच वाटप होते. त्याचबरोबर आॅर्डरपेक्षा २५ ते ३० पाकिटे अतिरिक्त ठेवून गाडीत होणाºया नव्या मागणीनुसार त्याची पूर्तता केली जाते, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात येते.>ठाणे स्थानकावरील फूड प्लाझाला पाच वर्षांचा ठेका मिळाला असून तिकीट बुकिंगनंतर रेल्वे प्रशासनाच्या आॅर्डरनुसार ताजे खाद्यपदार्थ तयार करून त्या गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये नियोजित वेळेत, म्हणजे अवघ्या ३२ सेकंदांत आॅर्डरप्रमाणे चढवले जात असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेस