शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खड्ड्यांविरोधात साखळी; डम्पिंग समस्येकडेही वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:21 IST

जागरूक नागरिक संघटनेचे आंदोलन

कल्याण : रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या प्रक्रियेत केवळ तात्पुरती मलमपट्टी करून नागरिकांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ रविवारी येथील जागरूक नागरिक संघटनेतर्फे मानवी साखळी करून केडीएमसीविरोधात आंदोलन करण्यात आले. मोहम्मद अली चौक ते शिवाजी चौक अशी मानवी साखळी करण्यात आली होती. यात खड्ड्यांच्या मुद्द्यासह आधारवाडी डम्पिंगचा विषयही उपस्थित करण्यात आला होता. दररविवारी मानवी साखळी आंदोलन महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी छेडले जाणार आहे.खड्ड्यांच्या मुद्द्यांकडे जागरूक नागरिक संघटना वर्षभर आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधत आहे. एकीकडे बहुतांश रस्ते सुस्थितीत नसताना रस्त्यावरील एक खड्डा बुजवण्यासाठी २२ हजार रुपये खर्च केल्याचे महापालिका सांगत आहे. एक वर्ष होऊनही काहीच फरक पडत नसल्याने मानवी साखळी आंदोलन छेडण्यात आल्याचे संघटनेचे श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले. कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आजही निकाली निघालेला नाही. बाहेरील कचरा कल्याण पश्चिममध्ये आणला जात आहे. त्यालाही आमचा विरोध आहे. यासंदर्भात आंदोलन छेडूनही प्रशासनाने ठोस कृती केलेली नाही. कल्याणमधील आंदोलनात नागरिकांसह व्यापारी, डॉक्टर, साहित्यिक, इंजिनीअर, वकील, सैन्यातील अधिकारी आदी विविध क्षेत्रांतील व्यक्तींनीही सहभाग घेतला होता. कल्याणकरांना भेडसावत असलेल्या समस्या तातडीने सोडवा, अशी मागणी करण्यात आली.पुढच्या रविवारी डोंबिवली पूर्वेत आंदोलन१५ कोटी रुपये खर्चूनही रस्ते खड्डेमय राहिले आहेत. दुसरीकडे वारेमाप कर वसूल केला जात आहे. पण सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. यासाठी एखादे जनआंदोलन उभे राहिले पाहिजे, यातून समस्यांबाबत जनजागृतीही होणे आवश्यक आहे.आठवड्यातील दररविवारी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. पुढच्या रविवारी डोंबिवली पूर्वेत हे आंदोलन केले जाणार असल्याची माहितीही घाणेकर यांनी दिली.

टॅग्स :Potholeखड्डेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नdumpingकचरा