शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेवर मोठा अपघात टळला, अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळ तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 11:59 IST

शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी अंबरनाथ-बदलापूर स्थानकाजवळ रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता.

डोंबिवली -  मध्य रेल्वे मार्गावर अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. रोजच होणा-या या खोळंब्यांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेतच झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना संपात व्यक्त केला आहे.

सकाळी 7.33 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी सुमारे तासाभराचा कालावधी लागला. कर्जतहून सकाळी 6.33 वाजता निघालेली लोकल बदलापूर-अंबरनाथ अप मार्गावर आल्यानंतर रेल्वे रुळ तु़टल्याचे लक्षात आले.  

यामुळे सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या काही काळ बदलापूर स्थानकावर खोळंबल्या व मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ठप्प झाली होती. या खोळंबामुळे बदलापूर ते कल्याणदरम्यानच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याचं कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचं काम सुरू केलं.  युद्धपातळीवर काम करत कर्मचा-यांनी बिघाड दुरुस्त केला. 

सुदैवानं रुळ तुटल्याचे वेळीच निदर्शनास आले. यामुळे मोठा अपघात टळल्याचे बोलले जात आहे. थंडीच्या दिवसात ट्रॅक फ्रॅक्चर होण्याच्या घटना घडतात. पण शुक्रवारची घटना भयंकर असून अशा पद्धतीनं ट्रॅक तुटणे ही धोक्याची घंटा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.  

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेAccidentअपघात