शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मध्य रेल्वेवर मोठा अपघात टळला, अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळ तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 11:59 IST

शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी अंबरनाथ-बदलापूर स्थानकाजवळ रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता.

डोंबिवली -  मध्य रेल्वे मार्गावर अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. रोजच होणा-या या खोळंब्यांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेतच झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना संपात व्यक्त केला आहे.

सकाळी 7.33 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी सुमारे तासाभराचा कालावधी लागला. कर्जतहून सकाळी 6.33 वाजता निघालेली लोकल बदलापूर-अंबरनाथ अप मार्गावर आल्यानंतर रेल्वे रुळ तु़टल्याचे लक्षात आले.  

यामुळे सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या काही काळ बदलापूर स्थानकावर खोळंबल्या व मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ठप्प झाली होती. या खोळंबामुळे बदलापूर ते कल्याणदरम्यानच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याचं कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचं काम सुरू केलं.  युद्धपातळीवर काम करत कर्मचा-यांनी बिघाड दुरुस्त केला. 

सुदैवानं रुळ तुटल्याचे वेळीच निदर्शनास आले. यामुळे मोठा अपघात टळल्याचे बोलले जात आहे. थंडीच्या दिवसात ट्रॅक फ्रॅक्चर होण्याच्या घटना घडतात. पण शुक्रवारची घटना भयंकर असून अशा पद्धतीनं ट्रॅक तुटणे ही धोक्याची घंटा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.  

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेAccidentअपघात