शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मेट्रो रेल्वेची कारशेड कोनमध्ये?बाजार समितीच्या विरोधामुळे झाला बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 05:45 IST

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेची कारशेड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यास बाजार समितीचा विरोध असल्याने त्यासाठी कोन गावानजीक असलेल्या जागेचा गांभीर्याने विचार सुरु आहे. मात्र त्यावर एमएमआरडीएचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.

- मुरलीधर भवारकल्याण : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेची कारशेड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यास बाजार समितीचा विरोध असल्याने त्यासाठी कोन गावानजीक असलेल्या जागेचा गांभीर्याने विचार सुरु आहे. मात्र त्यावर एमएमआरडीएचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.बाजार समितीच्या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याठिकाणी जवळच मेट्रोची कारशेड उभारण्याचा प्रस्ताव आला. मात्र मेट्रोसाठी जागा देण्यास किंवा आपल्या जागेच्या डोक्यावर मेट्रोचे स्थानक उभारू देण्यास बाजार समितीने विरोध केला. तसे झाले तर बाजार समितीचा विकास खोळंबण्याचा धोका आहे. एमएमआरडीएने बाजार समितीच्या पदाधिकाºयांना चर्चेसाठी बोलावले. परंतु काहीच निष्पन्न झाले नाही. कारशेडला होणारा विरोध पाहता एमएमआरडीएने पर्यायी जागचा शोध सुरु केला. कोन गावात एक १५ एकर जागा असून तेथे मेट्रो कारशेड उभारता येईल का, याची चाचपणी सुरु आहे. परंतु अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झाले नसल्याने त्याची माहिती देण्यास सूत्रांनी नकार दिला.माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर म्हणाले, सध्या अस्तित्वात असलेल्या भिवंडी-कल्याण- शीळ रोडच्या सहा पदरीकरणाच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. दुर्गाडी ते पत्री पूल या दरम्यान सहा पदरीकरणासाठी लगतच्या इमारतीवर हातोडा पडणार आहे. त्या मार्गावर एलिव्हेटेड मेट्रोे मार्ग टाकायचा ठरवला तरी त्यासाठी पोल कुठे व कसे उभे करणार हा प्रश्न आहे. मेट्रोचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही. एमएमआरडीए, राज्य रस्ते विकास महामंडळ व पालिकेत समन्वय नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाचा बोजवारा उडू शकतो.माजी शिवसेना नगरसेवक रवींद्र पाटील म्हणाले की, प्रस्तावित मेट्रो ही दुर्गाडी, सहजानंद चौक, शिवाजी चौक अशी न नेता. दुर्गाडी, खडकपाडा, बिर्ला रोड, भवानी चौक, सिंडीकेट आणि फुले चौकातून न्यावी, अशी मागणी २०१६ मध्ये या प्रकल्पास मान्यता मिळण्यापूर्वी केली होती. मागणी अगोदर केलेली असताना तिचा विचार न करता आता मेट्रोच्या मार्गाला मंजुरी मिळाल्याचे कारण एमएमआरडीएचे अधिकारी देत आहेत. पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर आपली नाराजी घातली आहे.स्थानके जोडण्याचा प्रयत्न- पालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत एरिया बेस डेव्हलपमेंटच्या कामाला प्राधान्य दिले आहे.त्यात कल्याण रेल्वे स्थानक, कल्याण बस डेपो आणि मेट्रोचे बाजार समिती येथील स्थानक हे एकमेकांशी जोडण्याचे निश्चित केले आहे.कल्याण सॅटीस प्रकल्पाचा वापर करून मेट्रो रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्याची मागणी सुरू आहे. तसे झाल्यास मेट्रो आणि रेल्वे जोडली जाईल.

टॅग्स :kalyanकल्याणMetroमेट्रो