शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कंत्राटदार लाडावलेले, मर्जीतील व्यक्तींसाठी जुनी निविदा केली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 05:50 IST

मार्केट घोटाळा : मर्जीतील व्यक्तींसाठी जुनी निविदा केली रद्द

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या बीओटीवरील तात्पुरत्या मार्केटचे कंत्राट देताना पालिकेने मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राट मिळणार नाही, म्हणून आधीची निविदा रद्द केली. त्या निविदेतील प्रतिस्पर्धी कंत्राटदारांची कागदपत्रे पाहून नव्याने निविदा काढताना त्यात वाढीव अटी घालून केवळ त्या मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राट मिळेल, अशी तजवीज पालिकेने केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. यातून स्पर्धा होऊ न देता पालिकेचे उत्पन्नही बुडण्याची शक्यता आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेतील बाजार शुल्कवसुली करणारे कंत्राटदार सत्ताधारी भाजपाच्या मर्जीतील असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. सत्ताधाऱ्यांचीही कंत्राटदारांना आर्थिक फायदा पोहोचवण्याची धडपड सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेतही भाजपाने कंत्राटदारांना मुदतवाढीसाठी आकारले जाणारे शुल्क माफ करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. विशेष म्हणजे खुद्द महापौर डिम्पल मेहता यांनीच नवीन निविदा काढू नका, म्हणून पत्र दिले होते.

शहर फेरीवालामुक्त करण्यासाठी पालिकेने तात्पुरते मार्केट बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर सुरू करण्याचे आराखडे तयार केले. त्यातही गेल्या वर्षी २६ मार्चला काढलेली बीओटीची निविदा विजय सोमानी या कंत्राटदारास दिली. त्याला ११ बीओटी मार्केटचे पाच वर्षांसाठी कंत्राट दिले. हाटकेश उद्योगनगर नाला, मॅक्सस मॉलमागील स्थानिक संस्थाकर कार्यालय, आशानगर, इंद्रलोक, सिल्व्हर पार्क, सेंट झेवियर्स शाळा यांचा समावेश आहे. त्यातील रामदेव पार्क व हाटकेश भागातील मार्केट सुरू झाली आहेत. आधीच्या ११ मार्केटचे कंत्राट सोमानी या कंत्राटदारास मिळाले असताना त्यानंतर पालिकेने निविदा सूचना प्रसिद्ध करून शांतीनगर आरजी जागा, सुभाषनगर, जेसल पार्क मलनि:सारण केंद्र, गोडदेव स्मशानभूमी नाला, नवघर, श्यामराव विठ्ठल बँक व सिल्व्हर सरिता येथे बीओटी तत्त्वावर मार्केट विकसित करण्याची निविदा काढली होती. परंतु, निविदेत स्पर्धा झाल्याने प्रशासनाने सत्ताधाºयांच्या मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राट मिळावे, म्हणून निविदाच रद्द केली.

पालिकेने डिसेंबरमध्ये निविदा प्रसिद्ध करून त्यात विशिष्ट ठिकाणे न देता पालिका वेळोवेळी निश्चित केलेल्या जागेवर बीओटीची मार्केट विकसित करण्यासाठी १० वर्षांच्या कालावधीसाठी निविदा काढली. ती काढताना आधी काढलेल्या निविदेतील अटी काढून मर्जीतील कंत्राटदारांना फायद्यासाठी अटी टाकण्यात आल्या. पूर्वीच्या निविदेत पाच अटी होत्या. नव्या निविदेत आठ अटी आहेत. बीओटीवरील मार्केट चालवण्याचा अनुभव बंधनकारक करून अन्य कंत्राटदारांचे मार्गच बंद केले आहेत.असे आहे बीओटी मार्केटपरिसरातील फेरीवाल्यांना या तात्पुरत्या मार्केटमध्ये सामावून घेताना कंत्राटदार हा छप्पर, कुंपण, कोबा, वीज, पाणी, स्वच्छतागृह, सुरक्षा पुरवणार आहे. त्या बदल्यात तो फेरीवाल्यांकडून किमान ८० रुपये रोज शुल्क वसूल करेल. पालिकेला वार्षिक नाममात्र भाडे देणार आहे.याची माहिती आपण घेतो. फाइल पाहून त्यात जर अनावश्यक बदल झाला असेल, तर सुधारणा करून घेऊ.- दीपक खांबित,कार्यकारी अभियंता 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे