शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

‘त्या’ उपनिरीक्षकांच्या नेमणुकीचा आदेश रद्द; जितेंद्र आव्हाड यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:45 IST

आपल्या गेल्या सात वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्यातील हजारो पोलिसांच्या पदोन्नती आणि बढत्या आता कायदेशीरीत्या होणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये कोणतीही परीक्षा न घेता थेट ६३६  उमेदवारांची नियुक्ती पोलीस उपनिरीक्षकपदावर होणार होती. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठा असंतोष होता. अखेर हा निर्णय औरंगाबाद उच्च न्यायालयानेही रद्द केला. 

  आपल्या गेल्या सात वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्यातील हजारो पोलिसांच्या पदोन्नती आणि बढत्या आता कायदेशीरीत्या होणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शेकडो उमेदवारांनी आव्हाड यांचे अभिनंदन केले.

२०१७ मध्ये ६३६  पोलिसांची थेट उपनिरीक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश तत्कालीन सरकारने काढला होता. या निर्णयाविरोधात तत्कालीन आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच विधानसभेत लक्ष्यवेधी मांडली होती. विशेष म्हणजे या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणानेही (मॅट) विरोध केला होता. 

याबाबत काही उमेदवारांनी न्यायालयात धावही घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही हा निर्णय नुकताच रद्द केला. या निर्णयाने आमचे समाधान झाले असून आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशा प्रतिक्रीया यावेळी आव्हाड यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत.

ग्रामीण भागातील उमेदवारांना होणार फायदाnहा निर्णय समजताच रविवारी शेकडो उमेदवारांनी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. nसरकारने पोलिसांची पदे वाढवावी. त्यामुळे मेहनती मुलांना न्याय मिळेल.nतसेच थेट भरती न होता एमपीएससीच्या माध्यमातून उमेदवारांना आधार घेऊनच भरती होईल. nबेकायदेशीर थेट बढती द्यावी असा चुकीचा पायंडा पडला असता, आता खऱ्या अर्थाने याचा फायदा गावखेड्यातील उमेदवारांना मिळणार असल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस