शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बेकायदेशीर करवाढ रद्द करा, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 20:08 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या करवाढीसह नवीन कर नागरिकांच्या माथी मारण्यात येऊ नये. ही करवाढ बेकायदेशीर असून ती त्वरीत मागे घेण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त बी. जी. पवार यांच्याकडे केली आहे.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या करवाढीसह नवीन कर नागरिकांच्या माथी मारण्यात येऊ नये. ही करवाढ बेकायदेशीर असून ती त्वरीत मागे घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त बी. जी. पवार यांच्याकडे केली आहे. करवाढ रद्द करा अन्यथा नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नवनियुक्त आयुक्तांनी पदभार स्वीकारल्याने त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सरनाईक शनिवारी ( 17 फेब्रुवारी ) पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या माथी भरमसाठ करवाढीचा बोजा टाकण्यात येत असल्याबाबत आयुक्तांशी चर्चा केली.

त्यांनी भाजपाने एकहाती सत्ता स्थापन केल्यापासून ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे कारभार सुरू केल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. या करवाढीला तत्कालिन स्थायी सभेने बहुमताच्या जोरावर मान्यता दिल्याने नागरिकांत रोष निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. मालमत्ता करात सुमारे ५० टक्के दरवाढीसह २ व १० रुपये दरवाढ प्रती १ हजार लीटरप्रमाणे अनुक्रमे निवासी व व्यावसायिक पाणीपट्टीत केली आहे. नव्याने प्रत्येकी ८ टक्के घनकचरा शुल्क व मलप्रवाह लाभ कर, ५ टक्के पाणीपुरवठा लाभ कर येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत भाजपा बहुमताच्या जोरावर लागू करण्यास अंतिम मान्यता देणार आहे.

नागरिकांवर ऐन महागाईच्या काळात अतिरिक्त व भरमसाठ करवाढीचा बोजा पडणार असल्याने त्यांचा आर्थिक ताळेबंद कोलमडून पडणार असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी देखील सत्ताधारी भाजपाने नाले बांधकामाच्या निविदेसह परिवहन सेवेच्या निविदेत बेकायदेशीर निर्णय घेतल्याने शहराचा विकास निकृष्टतेकडे झुकत असल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले. अशा कारभारामुळे शहरातील विकासाला खिळ बसू लागल्याचा आरोप त्यांनी करत भाजपाच्या या एकतर्फी कारभारामुळे नागरिकांवर लादण्यात येणा-या करवाढीचा प्रस्ताव येत्या महासभेतील पटलावर न आणता तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. मात्र तसे न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

मनसेचाही आंदोलनाचा इशारा

मीरा-भाईंदरचा सुधारित विकास आराखडा जाहीर होण्यापूर्वीच सर्वत्र त्याची पाने प्रसारित झाले असून संबधीत अधिका-यांवर कारवाई करावी. तसेच येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत भाजपाकडून विविध करवाढीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार आहे. सर्वसामान्य मीरा-भार्इंदरकरांच्या डोक्यावर या करवाढीचा बोजा असह्य होणार असल्याने  नियोजित करवाढ त्वरीत रद्द करण्यात यावी, अन्यथा महासभेच्याच दिवशी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे मीरा-भाईंदर शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी पालिकेला दिला आहे.

त्याचे निवेदन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना देण्यात आले असुन त्यावेळी शहर सचिव नरेंद्र पाटोळे, उपशहर अध्यक्ष हेमंत सावंत, शशी मेंडन, दिनेश कनावजे, विभागीय चिटणीस प्रमोद देठे, विभाग अध्यक्ष सचिन पोपळे, आनंद हिंदलेकर, अमोल राणे, विजय फर्नांडिस, सचिन मिश्रा, उपविभाग प्रकाश शेलार, मनीष कामटेकर, शेखर गजरे, संदीप चव्हाण, मनविसेचे पदाधिकारी  रॉबर्ट डिसोझा आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना