शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

बेकायदेशीर करवाढ रद्द करा, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 20:08 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या करवाढीसह नवीन कर नागरिकांच्या माथी मारण्यात येऊ नये. ही करवाढ बेकायदेशीर असून ती त्वरीत मागे घेण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त बी. जी. पवार यांच्याकडे केली आहे.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या करवाढीसह नवीन कर नागरिकांच्या माथी मारण्यात येऊ नये. ही करवाढ बेकायदेशीर असून ती त्वरीत मागे घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त बी. जी. पवार यांच्याकडे केली आहे. करवाढ रद्द करा अन्यथा नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नवनियुक्त आयुक्तांनी पदभार स्वीकारल्याने त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सरनाईक शनिवारी ( 17 फेब्रुवारी ) पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या माथी भरमसाठ करवाढीचा बोजा टाकण्यात येत असल्याबाबत आयुक्तांशी चर्चा केली.

त्यांनी भाजपाने एकहाती सत्ता स्थापन केल्यापासून ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे कारभार सुरू केल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. या करवाढीला तत्कालिन स्थायी सभेने बहुमताच्या जोरावर मान्यता दिल्याने नागरिकांत रोष निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. मालमत्ता करात सुमारे ५० टक्के दरवाढीसह २ व १० रुपये दरवाढ प्रती १ हजार लीटरप्रमाणे अनुक्रमे निवासी व व्यावसायिक पाणीपट्टीत केली आहे. नव्याने प्रत्येकी ८ टक्के घनकचरा शुल्क व मलप्रवाह लाभ कर, ५ टक्के पाणीपुरवठा लाभ कर येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत भाजपा बहुमताच्या जोरावर लागू करण्यास अंतिम मान्यता देणार आहे.

नागरिकांवर ऐन महागाईच्या काळात अतिरिक्त व भरमसाठ करवाढीचा बोजा पडणार असल्याने त्यांचा आर्थिक ताळेबंद कोलमडून पडणार असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी देखील सत्ताधारी भाजपाने नाले बांधकामाच्या निविदेसह परिवहन सेवेच्या निविदेत बेकायदेशीर निर्णय घेतल्याने शहराचा विकास निकृष्टतेकडे झुकत असल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले. अशा कारभारामुळे शहरातील विकासाला खिळ बसू लागल्याचा आरोप त्यांनी करत भाजपाच्या या एकतर्फी कारभारामुळे नागरिकांवर लादण्यात येणा-या करवाढीचा प्रस्ताव येत्या महासभेतील पटलावर न आणता तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. मात्र तसे न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

मनसेचाही आंदोलनाचा इशारा

मीरा-भाईंदरचा सुधारित विकास आराखडा जाहीर होण्यापूर्वीच सर्वत्र त्याची पाने प्रसारित झाले असून संबधीत अधिका-यांवर कारवाई करावी. तसेच येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत भाजपाकडून विविध करवाढीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार आहे. सर्वसामान्य मीरा-भार्इंदरकरांच्या डोक्यावर या करवाढीचा बोजा असह्य होणार असल्याने  नियोजित करवाढ त्वरीत रद्द करण्यात यावी, अन्यथा महासभेच्याच दिवशी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे मीरा-भाईंदर शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी पालिकेला दिला आहे.

त्याचे निवेदन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना देण्यात आले असुन त्यावेळी शहर सचिव नरेंद्र पाटोळे, उपशहर अध्यक्ष हेमंत सावंत, शशी मेंडन, दिनेश कनावजे, विभागीय चिटणीस प्रमोद देठे, विभाग अध्यक्ष सचिन पोपळे, आनंद हिंदलेकर, अमोल राणे, विजय फर्नांडिस, सचिन मिश्रा, उपविभाग प्रकाश शेलार, मनीष कामटेकर, शेखर गजरे, संदीप चव्हाण, मनविसेचे पदाधिकारी  रॉबर्ट डिसोझा आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना