शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येते का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 06:39 IST

हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी विकत घेण्याची सक्ती केली तर?         

- मनीषा कोटेकर, ठाणे वाढदिवस असला, घरी पाहुणे आले किंवा मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा योग येतो. अशा वेळी काही हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी आणून दिले जाते. नेहमीचे शुद्ध पाणी देण्याची विनंती केली तर आमच्याकडे ग्राहकांना चांगल्या आरोग्यासाठी हेच पाणी दिले जाते, तुम्हालाही हेच पाणी घ्यावे लागेल, असा सल्ला दिला जातो. बिलात पाण्याचे पैसे आकारले जातात; पण ग्राहकांना बाटलीबंद पाण्याची सक्ती करणे बेकायदेशीर आहे. जेवणाबरोबरच शुद्ध पाणी देणे ही हॉटेल व्यावसायिकांची जबाबदारी आहे.

भारतात एक कायदा आहे, जो १८०० च्या उत्तरार्धात तयार झाला होता. या कायद्यानुसार हॉटेलमध्ये कोणीही मोफत पाणी मागू शकते आणि तिथले स्वच्छतागृहदेखील वापरू शकतात. ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आलेल्या या कायद्यात म्हटले आहे की, हॉटेल आणि लॉजमध्ये तो तुमचा ग्राहक असो किंवा नसो, तिथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वच्छतागृहांमध्ये प्रवेश द्यावा आणि ये-जा करणाऱ्यांना मोफत पाणी द्यावे. अनेक राज्ये आणि जिल्ह्यांनी सराय कायदा, १८६७ अंतर्गत हॉटेल्सची नोंदणी अनिवार्य केली आहे. पाणी पिण्याचा आणि हॉटेलमध्ये स्वच्छतागृह मोफत वापरण्याचा अधिकार सर्वांना आहे.

बाटलीबंद पाणी घेतल्याने हॉटेलचालकांचा चांगला धंदा होतो. त्यामुळे वेटरने बाटलीबंद पाणी घेण्याची सक्ती केली तर मालकाकडे तक्रार करता येते. त्यातूनही काहीच फरक नाही पडला तर पोलिस किंवा ग्राहक न्यायालयात दाद मागता येते.  

याबाबत ॲड. विकास बर्गे म्हणाले, हॉटेलमध्ये आल्यावर ग्राहकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे हॉटेल व्यावसायिकांचे कर्तव्य आहे. त्यांनी ग्राहकांना बाटलीबंद पाणी विकत घेण्याची जबरदस्ती केली तर ग्राहकांना ते स्पष्ट शब्दांत नाकारण्याचा अधिकार आहे. तरीही  खरेदी करण्यासाठी जबरदस्ती किंवा अट ठेवली तर ग्राहक न्यायालयात  कलम ४२ (२) व कलम ४७ अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसखाली तक्रार करता येईल; परंतु त्याबद्दलचा पुरावा असणे आवश्यक आहे. जेणेकरून कारवाई करणे सोपे होऊ शकेल.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी