शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येते का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 06:39 IST

हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी विकत घेण्याची सक्ती केली तर?         

- मनीषा कोटेकर, ठाणे वाढदिवस असला, घरी पाहुणे आले किंवा मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा योग येतो. अशा वेळी काही हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी आणून दिले जाते. नेहमीचे शुद्ध पाणी देण्याची विनंती केली तर आमच्याकडे ग्राहकांना चांगल्या आरोग्यासाठी हेच पाणी दिले जाते, तुम्हालाही हेच पाणी घ्यावे लागेल, असा सल्ला दिला जातो. बिलात पाण्याचे पैसे आकारले जातात; पण ग्राहकांना बाटलीबंद पाण्याची सक्ती करणे बेकायदेशीर आहे. जेवणाबरोबरच शुद्ध पाणी देणे ही हॉटेल व्यावसायिकांची जबाबदारी आहे.

भारतात एक कायदा आहे, जो १८०० च्या उत्तरार्धात तयार झाला होता. या कायद्यानुसार हॉटेलमध्ये कोणीही मोफत पाणी मागू शकते आणि तिथले स्वच्छतागृहदेखील वापरू शकतात. ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आलेल्या या कायद्यात म्हटले आहे की, हॉटेल आणि लॉजमध्ये तो तुमचा ग्राहक असो किंवा नसो, तिथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वच्छतागृहांमध्ये प्रवेश द्यावा आणि ये-जा करणाऱ्यांना मोफत पाणी द्यावे. अनेक राज्ये आणि जिल्ह्यांनी सराय कायदा, १८६७ अंतर्गत हॉटेल्सची नोंदणी अनिवार्य केली आहे. पाणी पिण्याचा आणि हॉटेलमध्ये स्वच्छतागृह मोफत वापरण्याचा अधिकार सर्वांना आहे.

बाटलीबंद पाणी घेतल्याने हॉटेलचालकांचा चांगला धंदा होतो. त्यामुळे वेटरने बाटलीबंद पाणी घेण्याची सक्ती केली तर मालकाकडे तक्रार करता येते. त्यातूनही काहीच फरक नाही पडला तर पोलिस किंवा ग्राहक न्यायालयात दाद मागता येते.  

याबाबत ॲड. विकास बर्गे म्हणाले, हॉटेलमध्ये आल्यावर ग्राहकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे हॉटेल व्यावसायिकांचे कर्तव्य आहे. त्यांनी ग्राहकांना बाटलीबंद पाणी विकत घेण्याची जबरदस्ती केली तर ग्राहकांना ते स्पष्ट शब्दांत नाकारण्याचा अधिकार आहे. तरीही  खरेदी करण्यासाठी जबरदस्ती किंवा अट ठेवली तर ग्राहक न्यायालयात  कलम ४२ (२) व कलम ४७ अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसखाली तक्रार करता येईल; परंतु त्याबद्दलचा पुरावा असणे आवश्यक आहे. जेणेकरून कारवाई करणे सोपे होऊ शकेल.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी