शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

पालेभाज्या विकत घेताय की आजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:48 IST

लोकलमधून प्रवास करताना बाहेर पाहिले की हिरव्यागार पालेभाज्यांची पिकं दिसतात. बघूनच खाव्याशा वाटणाऱ्या या पालेभाज्या पिकवण्यासाठी गटारातील घाण पाण्याचा वापर केला जातो.

लोकलमधून प्रवास करताना बाहेर पाहिले की हिरव्यागार पालेभाज्यांची पिकं दिसतात. बघूनच खाव्याशा वाटणाऱ्या या पालेभाज्या पिकवण्यासाठी गटारातील घाण पाण्याचा वापर केला जातो. यामुळे गंभीर आजार होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. ठाण्यासह मीरा-भार्इंदर महानगरपालिकेने अशा भाजीपाला उत्पादकांवर अलीकडेच कारवाईदेखील केली. तरीही हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर ठाणे तसेच अन्य शहरांतील परिस्थितीचा आढावा घेतला आहे ‘लोकमत’चे प्रतिनिधी पंकज रोडेकर, अनिकेत घमंडी, धीरज परब, पंकज पाटील, सदानंद नाईक यांनी.

दृढ आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे जास्तीत जास्त सेवन करण्याचा प्रयत्न बरेचजण आवर्जून करतात. मात्र या पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याची अस्वच्छ प्रक्रिया पाहिली की कुणाच्याही अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही. ठाण्यात अनेक ठिकाणी, विशेषत: रेल्वेमार्गाजवळ असलेल्या जागांवर चक्क गटाराचे पाणी वापरुन पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे भाजीबाजारातून आपण पालेभाज्या विकत घेतोय की कॅन्सरसारखे गंभीर आजार, हा प्रश्नच आहे.

रेल्वेमार्गाजवळच्या जागांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन त्या भाड्याने देते. जागा सुरक्षित राहावी यासाठी ती भाजीपाला उत्पादकांना भाड्याने दिली जाते. यातून रेल्वेला उत्पन्नही मिळते. यामुळे एक एकर जागा रेल्वेने भाड्याने दिल्या आहेत. मात्र भाजीपाला पिकविण्यासाठी विहीर नसल्याने येथे शेती करणारे गटाराच्या पाण्याचा सर्रास वापर करतात. पण या शेतकऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. मध्यंतरी, ठाणे महापालिकेने अशाप्रकारे भाजीपाल्यांच्या मळ्यांवर कारवाई केली. मात्र त्यानंतरही या परिस्थितीत सुधारणा झाली नसून, ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार बिनदिक्कत सुरुच आहेत.

हजारो रूपयात मिळते जागा भाड्यानेरेल्वेमार्गाजवळील जागा भाड्याने देताना, ती प्रामुख्याने रेल्वेच्या कर्मचाºयांना दिली जाते. मग, ती मंडळी त्यांच्या खात्रीतील व्यक्तींना देतात. या जागांवर कुणीही दावा करणार नाही ही यामागची संकल्पना आहे. एक एकर जागा ही रेल्वेच्या कर्मचाºयाला ८ हजाराला मिळते. त्यानंतर तो कर्मचारी ती जागा दुसºयाला १३ हजाराने भाड्याने देतो.भाज्या जातात प्रमुख मंडईतया मळ्यात प्रामुख्याने मुळा, पालक, चवळी आदी पाल्याभाज्यांचे पिक घेतले जाते. ही पिके घेण्याची कारणे प्रामुख्याने कुणीही चोरी करत नाही. या पिकांसाठी यापूर्वी खत म्हणून कापूस वापरला जात होता. मात्र, कापूस मिळत नसल्याने सेंद्रिय खत वापरणे सुरू केले आहे. येथील भाज्या प्रामुख्याने ठाणे, मुलुंड, दादर तसेच वाशीच्या मंडईत जातात.

विहीर नसल्याने वापरले जाते गटाराचे पाणीजागा लहान असल्याने तेथे विहीर नसते. त्यामुळे परिसरातून जाणाºया गटराच्या पाण्याचा वापर पिकांसाठी केला जातो. मात्र, ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर रेल्वे प्रशासनाने भाजीपाल्यासाठी विहिरीतील पाण्याचा वापर करा असे म्हटले आहे. त्यामुळे विहीर खेदण्याचे काम ठाण्यात तरी बºयाच ठिकाणी सुरू झाले आहे. या ठिकाणी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार येथील नागरिक दिसतात.

पालिकेने केली कारवाईपारसिकनगर, खारीगाव परिसरातील आतकोनेश्वर, मफतलाल कम्पाउंड येथे सांडपाण्यावर पिकवत असलेल्या भाज्यांच्या मळ्यांवर पालिकेने मध्यंतरी कारवाई केली. येथील माती व पाण्याचे नमुनेसांडपाण्यासह रसायनमिश्रित पाण्याचा वापर करून भाजीचे मळे फुलवले जातात. ही बाब अतिधोकादायक आहे. जसे गांजाच्या शेतीवर बंदी घातली आहे, तशी बंदी या भाज्यांच्या मळ्यांवर घालावी. या भाज्या खाल्ल्याने पोटाच्या आजारांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. जंतूमुळे डोक्यात गाठही तयार होते. ही बाब अत्यंत धोकादायक असून अशा भाज्या पिकवण्यापासून विक्रीवरही बंदी घालावी.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक,

ठाणे प्रदूषण विभागाने घेवून ते सदोष आढळल्यानंतर जेसीबीच्या मदतीने संपूर्ण मळे उखडून टाकण्याची कारवाई केली. समतानगर येथील अशाच मळ्यांवरही कारवाई केली आहे.