शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

शेतबांधावर खत योजनेचा बोजवारा, बियाणे, खते पोहोचलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 00:59 IST

शेतकरी शासनाची योजना न राबवता वैयक्तिक बी-बियाणे व खते घेत असल्याने कृषी विभागाची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.

वाडा : महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवण्याची अभिनव योजना अमलात आणली. मात्र, या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना या योजनेऐवजी कृषी सेवा केंद्रावरून बियाणे व खते आणणे सोयीचे वाटत असल्याने शेतकरी शासनाची योजना न राबवता वैयक्तिक बी-बियाणे व खते घेत असल्याने कृषी विभागाची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून बांधावर बियाणे, खते ही अभिनव योजना लागू केली. या योजनेंतर्गत गावातील १२ ते १५ शेतकºयांनी गट तयार करून या गटातील सहभागी शेतकºयांनी ज्याला जेवढे बियाणे, खते लागतात, त्याप्रमाणे मागणी करून पैसे जमा करून सर्व शेतकºयांनी एकदाच खते, बियाणे कृषी पर्यवेक्षकाच्या साहाय्याने खरेदी करायचे. त्यामुळे वाजवी दरात शेतकºयांना शेतीमाल मिळून वाहतूक खर्चाची बचत होते. या योजनेतून शेतकºयांना कुठलेच अनुदान मिळत नाही. तसेच, १२ ते १५ शेतकºयांना एकत्र आणून त्यांचा गट तयार करणे, त्यांची मागणी नोंदवणे, हे अवघड असल्याने शेतकरी ते न करता स्वत:च जाऊन कृषी सेवा केंद्रावरून बियाणे व खते खरेदी करताना दिसून येत आहेत.वाडा तालुक्यातील खरिवली, पालसई, आमगाव, केळठण, पाली, आंबिस्ते, गोºहे, चिंचघर, उज्जैनी, कुडूस, गुहीर, कोना, गारगाव, तिळसा, नेहरोली, परळी, मांडवा, खानिवली, मानिवली, वाडा आदी २० गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली असल्याचे केवळ कागदी घोडे रंगवण्याचे काम तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पेरण्या संपत आल्या तरी शेतकºयांच्या बांधावर बियाणे व खतांचा पत्ताच नाही. प्रत्येक शेतकºयाने बियाणे, खते आणून पेरण्या केल्याने या योजनेचा वाड्यात बोजवारा उडालेला आहे. या योजनेची अंमलबजावणी करणारे मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक हे शेतावर ढुंकूनही बघत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कुडूस मंडळात घोणसई, मेट, नारे, वडवली, कोंढले, दिनकरपाडा, मुसारणे, सापरोंडे, उसर, उचाट ही गावे येत असून या एकही गावात बांधावर बियाणे, खते मिळाली नसल्याचे अनेकांनी सांगितले.>मोहोट्याचापाडा गाव कुडूस मंडळात येत असून या गावात कृषी सहायकांनी शेतकºयांना याबाबतची माहिती न दिल्याने येथील शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत, असे शेतकरी भास्कर दुबेले यांनी सांगितले. तर, आघाडी सरकार बांधावर खते, ही योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचा अरोप भाजपचे नेते मंगेश पाटील यांनी केला आहे.>वाडा तालुक्यात या योजनेंतर्गत २१० क्विंटल बियाणे आणि ३९० टन खत बांधावर गेले आहे.- एल.के. राऊत, प्रभारी तालुका कृषी अधिकारी