शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतबांधावर खत योजनेचा बोजवारा, बियाणे, खते पोहोचलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 00:59 IST

शेतकरी शासनाची योजना न राबवता वैयक्तिक बी-बियाणे व खते घेत असल्याने कृषी विभागाची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.

वाडा : महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवण्याची अभिनव योजना अमलात आणली. मात्र, या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना या योजनेऐवजी कृषी सेवा केंद्रावरून बियाणे व खते आणणे सोयीचे वाटत असल्याने शेतकरी शासनाची योजना न राबवता वैयक्तिक बी-बियाणे व खते घेत असल्याने कृषी विभागाची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून बांधावर बियाणे, खते ही अभिनव योजना लागू केली. या योजनेंतर्गत गावातील १२ ते १५ शेतकºयांनी गट तयार करून या गटातील सहभागी शेतकºयांनी ज्याला जेवढे बियाणे, खते लागतात, त्याप्रमाणे मागणी करून पैसे जमा करून सर्व शेतकºयांनी एकदाच खते, बियाणे कृषी पर्यवेक्षकाच्या साहाय्याने खरेदी करायचे. त्यामुळे वाजवी दरात शेतकºयांना शेतीमाल मिळून वाहतूक खर्चाची बचत होते. या योजनेतून शेतकºयांना कुठलेच अनुदान मिळत नाही. तसेच, १२ ते १५ शेतकºयांना एकत्र आणून त्यांचा गट तयार करणे, त्यांची मागणी नोंदवणे, हे अवघड असल्याने शेतकरी ते न करता स्वत:च जाऊन कृषी सेवा केंद्रावरून बियाणे व खते खरेदी करताना दिसून येत आहेत.वाडा तालुक्यातील खरिवली, पालसई, आमगाव, केळठण, पाली, आंबिस्ते, गोºहे, चिंचघर, उज्जैनी, कुडूस, गुहीर, कोना, गारगाव, तिळसा, नेहरोली, परळी, मांडवा, खानिवली, मानिवली, वाडा आदी २० गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली असल्याचे केवळ कागदी घोडे रंगवण्याचे काम तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पेरण्या संपत आल्या तरी शेतकºयांच्या बांधावर बियाणे व खतांचा पत्ताच नाही. प्रत्येक शेतकºयाने बियाणे, खते आणून पेरण्या केल्याने या योजनेचा वाड्यात बोजवारा उडालेला आहे. या योजनेची अंमलबजावणी करणारे मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक हे शेतावर ढुंकूनही बघत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कुडूस मंडळात घोणसई, मेट, नारे, वडवली, कोंढले, दिनकरपाडा, मुसारणे, सापरोंडे, उसर, उचाट ही गावे येत असून या एकही गावात बांधावर बियाणे, खते मिळाली नसल्याचे अनेकांनी सांगितले.>मोहोट्याचापाडा गाव कुडूस मंडळात येत असून या गावात कृषी सहायकांनी शेतकºयांना याबाबतची माहिती न दिल्याने येथील शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत, असे शेतकरी भास्कर दुबेले यांनी सांगितले. तर, आघाडी सरकार बांधावर खते, ही योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचा अरोप भाजपचे नेते मंगेश पाटील यांनी केला आहे.>वाडा तालुक्यात या योजनेंतर्गत २१० क्विंटल बियाणे आणि ३९० टन खत बांधावर गेले आहे.- एल.के. राऊत, प्रभारी तालुका कृषी अधिकारी