शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

शेतबांधावर खत योजनेचा बोजवारा, बियाणे, खते पोहोचलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 00:59 IST

शेतकरी शासनाची योजना न राबवता वैयक्तिक बी-बियाणे व खते घेत असल्याने कृषी विभागाची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.

वाडा : महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवण्याची अभिनव योजना अमलात आणली. मात्र, या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना या योजनेऐवजी कृषी सेवा केंद्रावरून बियाणे व खते आणणे सोयीचे वाटत असल्याने शेतकरी शासनाची योजना न राबवता वैयक्तिक बी-बियाणे व खते घेत असल्याने कृषी विभागाची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून बांधावर बियाणे, खते ही अभिनव योजना लागू केली. या योजनेंतर्गत गावातील १२ ते १५ शेतकºयांनी गट तयार करून या गटातील सहभागी शेतकºयांनी ज्याला जेवढे बियाणे, खते लागतात, त्याप्रमाणे मागणी करून पैसे जमा करून सर्व शेतकºयांनी एकदाच खते, बियाणे कृषी पर्यवेक्षकाच्या साहाय्याने खरेदी करायचे. त्यामुळे वाजवी दरात शेतकºयांना शेतीमाल मिळून वाहतूक खर्चाची बचत होते. या योजनेतून शेतकºयांना कुठलेच अनुदान मिळत नाही. तसेच, १२ ते १५ शेतकºयांना एकत्र आणून त्यांचा गट तयार करणे, त्यांची मागणी नोंदवणे, हे अवघड असल्याने शेतकरी ते न करता स्वत:च जाऊन कृषी सेवा केंद्रावरून बियाणे व खते खरेदी करताना दिसून येत आहेत.वाडा तालुक्यातील खरिवली, पालसई, आमगाव, केळठण, पाली, आंबिस्ते, गोºहे, चिंचघर, उज्जैनी, कुडूस, गुहीर, कोना, गारगाव, तिळसा, नेहरोली, परळी, मांडवा, खानिवली, मानिवली, वाडा आदी २० गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली असल्याचे केवळ कागदी घोडे रंगवण्याचे काम तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पेरण्या संपत आल्या तरी शेतकºयांच्या बांधावर बियाणे व खतांचा पत्ताच नाही. प्रत्येक शेतकºयाने बियाणे, खते आणून पेरण्या केल्याने या योजनेचा वाड्यात बोजवारा उडालेला आहे. या योजनेची अंमलबजावणी करणारे मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक हे शेतावर ढुंकूनही बघत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कुडूस मंडळात घोणसई, मेट, नारे, वडवली, कोंढले, दिनकरपाडा, मुसारणे, सापरोंडे, उसर, उचाट ही गावे येत असून या एकही गावात बांधावर बियाणे, खते मिळाली नसल्याचे अनेकांनी सांगितले.>मोहोट्याचापाडा गाव कुडूस मंडळात येत असून या गावात कृषी सहायकांनी शेतकºयांना याबाबतची माहिती न दिल्याने येथील शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत, असे शेतकरी भास्कर दुबेले यांनी सांगितले. तर, आघाडी सरकार बांधावर खते, ही योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचा अरोप भाजपचे नेते मंगेश पाटील यांनी केला आहे.>वाडा तालुक्यात या योजनेंतर्गत २१० क्विंटल बियाणे आणि ३९० टन खत बांधावर गेले आहे.- एल.के. राऊत, प्रभारी तालुका कृषी अधिकारी