शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

आश्वासनांच्या बळावर बुलेट ट्रेन रेटणार! मते जाणून घेण्यासाठी गावोगावी धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 05:29 IST

आॅगस्ट २०२२ पर्यंत ती सुरू करणे अशक्य असल्याचे निदर्शनास येताच आता नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने अनोखी शक्कल लढविली आहे.

- नारायण जाधवठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनकरिता जमीन संपादनास शेतकऱ्यांकडून होणारा तीव्र विरोध आहे. परिणामी, आॅगस्ट २०२२ पर्यंत ती सुरू करणे अशक्य असल्याचे निदर्शनास येताच आता नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने अनोखी शक्कल लढविली आहे. गावागावात जाऊन शिक्षण, आरोग्य, रस्ते, मैदाने, पिण्याच्या पाण्यासह इतर कोणत्या समस्या आहेत, कोणत्या सुविधा हव्यात हे जाणून घेत त्या पुरविण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. त्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील ७३ गावांतून झाली आहे. यानुसार नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची पथके या गावांत जाऊन गावकºयांचे म्हणणे ऐकून त्यांना भूसंपादनासाठी राजी करण्यात गुंतली आहेत.लोकांच्या समस्या जाणून घेताना त्यांच्याशी संवाद वाढवणे व भूसंपादनासाठी त्यांना राजी करणे हा कॉर्पोरेशनचा मुख्य हेतू आहे.मात्र, हा केवळ भूसंपादनापुरता विषय नसून बुलेट ट्रेन आल्यावर तिच्या मार्गातील सर्व गावांचा सर्वांगिण विकास कसा करता येईल, हा उदात्त हेतू यामागे असल्याचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने केवळ शेतकºयांना भूसंपादनासाठी राजी करण्यासाठी ही खेळी खेळत आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. बुलेट ट्रेन आल्यावर सामाजिक दायित्त्व म्हणून तिच्या मार्गातील गावांचा, तेथील गावकºयांचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याच जमिनीवरून ती जाणार आहे. यामुळे गावकºयांना रोजगारासह शिक्षण, आरोग्य, क्रीडा सुविधांसह रस्ते, समाजमंदिरे, पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. यामागे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचा कोणताही स्वार्थ नाही.भूसंपादन कायद्यानुसार या ७३ गावांतील गावकºयांना शासन नियमानुसार आहे, ती नुकसानभरपाई आणि मोबदला दिला जाईलच. परंतु, त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडूनच त्यांच्या गावात कोणत्या सुविधा हव्यात हे ऐकूण घेत असल्याचे धनंजय कुमार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार गुजरातसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन गावकºयांचे म्हणणे ऐकूण घेण्यात येत असून त्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील ७३ गावांपासून झाली असल्याचे ते म्हणाले.अवघी ०.९ हेक्टरच जमीन ताब्यातआतापर्यंत बुलेट ट्रेन जेथून सुरू होणार आहे, त्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील 0.9 हेक्टर जमीन वगळता राज्यातील एक इंचही जमीन संपादित करण्यात आलेली नाही.1400हेक्टर जमीन या प्रकल्पाकरिता लागणार10,000कोटी रुपयांचीनॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनकडून तरतूदबुलेट ट्रेनमुळे बाधित गावे192 गुजरात120 महाराष्ट्रमात्र, त्यासाठी दोन्ही राज्यांतील जी जमीन जाणार आहे, त्यातील बहुतेक जमीन सुपीक आहे. यामुळे शेतकºयांनी बाजारभावापेक्षा जास्तदर मागितला आहे. तो देण्यास सरकार तयार नसल्याने शेतकºयांचा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे.शेतकºयांसह शिवसेना-मनसे यासारख्या राजकीय पक्षांच्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्रात नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने ही शक्कल लढविल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी