शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनांच्या बळावर बुलेट ट्रेन रेटणार! मते जाणून घेण्यासाठी गावोगावी धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 05:29 IST

आॅगस्ट २०२२ पर्यंत ती सुरू करणे अशक्य असल्याचे निदर्शनास येताच आता नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने अनोखी शक्कल लढविली आहे.

- नारायण जाधवठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनकरिता जमीन संपादनास शेतकऱ्यांकडून होणारा तीव्र विरोध आहे. परिणामी, आॅगस्ट २०२२ पर्यंत ती सुरू करणे अशक्य असल्याचे निदर्शनास येताच आता नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने अनोखी शक्कल लढविली आहे. गावागावात जाऊन शिक्षण, आरोग्य, रस्ते, मैदाने, पिण्याच्या पाण्यासह इतर कोणत्या समस्या आहेत, कोणत्या सुविधा हव्यात हे जाणून घेत त्या पुरविण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. त्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील ७३ गावांतून झाली आहे. यानुसार नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची पथके या गावांत जाऊन गावकºयांचे म्हणणे ऐकून त्यांना भूसंपादनासाठी राजी करण्यात गुंतली आहेत.लोकांच्या समस्या जाणून घेताना त्यांच्याशी संवाद वाढवणे व भूसंपादनासाठी त्यांना राजी करणे हा कॉर्पोरेशनचा मुख्य हेतू आहे.मात्र, हा केवळ भूसंपादनापुरता विषय नसून बुलेट ट्रेन आल्यावर तिच्या मार्गातील सर्व गावांचा सर्वांगिण विकास कसा करता येईल, हा उदात्त हेतू यामागे असल्याचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने केवळ शेतकºयांना भूसंपादनासाठी राजी करण्यासाठी ही खेळी खेळत आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. बुलेट ट्रेन आल्यावर सामाजिक दायित्त्व म्हणून तिच्या मार्गातील गावांचा, तेथील गावकºयांचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याच जमिनीवरून ती जाणार आहे. यामुळे गावकºयांना रोजगारासह शिक्षण, आरोग्य, क्रीडा सुविधांसह रस्ते, समाजमंदिरे, पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. यामागे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचा कोणताही स्वार्थ नाही.भूसंपादन कायद्यानुसार या ७३ गावांतील गावकºयांना शासन नियमानुसार आहे, ती नुकसानभरपाई आणि मोबदला दिला जाईलच. परंतु, त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडूनच त्यांच्या गावात कोणत्या सुविधा हव्यात हे ऐकूण घेत असल्याचे धनंजय कुमार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार गुजरातसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन गावकºयांचे म्हणणे ऐकूण घेण्यात येत असून त्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील ७३ गावांपासून झाली असल्याचे ते म्हणाले.अवघी ०.९ हेक्टरच जमीन ताब्यातआतापर्यंत बुलेट ट्रेन जेथून सुरू होणार आहे, त्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील 0.9 हेक्टर जमीन वगळता राज्यातील एक इंचही जमीन संपादित करण्यात आलेली नाही.1400हेक्टर जमीन या प्रकल्पाकरिता लागणार10,000कोटी रुपयांचीनॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनकडून तरतूदबुलेट ट्रेनमुळे बाधित गावे192 गुजरात120 महाराष्ट्रमात्र, त्यासाठी दोन्ही राज्यांतील जी जमीन जाणार आहे, त्यातील बहुतेक जमीन सुपीक आहे. यामुळे शेतकºयांनी बाजारभावापेक्षा जास्तदर मागितला आहे. तो देण्यास सरकार तयार नसल्याने शेतकºयांचा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे.शेतकºयांसह शिवसेना-मनसे यासारख्या राजकीय पक्षांच्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्रात नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने ही शक्कल लढविल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी