शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘सूर्या’च्या पाइपलाइनसाठी १३१ एकर वनावर बुलडोझर; 'आरे'नंतर पुन्हा मोठी वृक्षतोड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:25 IST

वन्यप्रेमी विरुद्ध सरकार वाद पेटण्याची शक्यता

नारायण जाधवठाणे : मेट्रो ३ च्या कारशेडसाठी मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत असताना आता एमएमआरडीएच्या मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार महापालिकेसह २७ गावांची तहान भागविण्यासाठीच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील तब्बल १३१.५७ एकर जंगलांचा गळा घोटला जाणार आहे. यात १६ एकरहून अधिक जमीन संजय गांधी राष्ट्रीय कार्यक्षेत्रातील आहे. यामुळे आगामी काळात वन्यपे्रमी विरुद्ध एमएमआरडीए आणि सरकार असा संघर्ष पुन्हा एकदा उभा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवर बांधलेल्या धरणातून वसई-विरार महापलिकेसह परिसरातील २७ गावे आणि ठाणे जिल्ह्यांतील मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी एमएमआरडीएने अडीच हजार कोटी रुपये खर्र्चून पाणीपुरवठा हाती घेतला आहे. नगरविकास विभागाने अलीकडेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे अधिकार एमएमआरडीएला प्रदान केले आहेत. त्यानंतर आता शासनाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल १३१.५७ एकर वनजमीन या प्रकल्पांसाठी देण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात खारफुटीचाही समावेश आहे.

८० एकर राखीव तर ४२ एकर संरक्षित वनांचा जाणार बळीविशेष यात ७९.६८ एकर राखीव वनजमीन तर ४१.७४ संरक्षित वनांचा समावेश आहे. तर ९.३ एकर जमिनीवर खासगी वने आहेत. राखीव वनांमध्ये १६ एकराहून अधिक परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आहे.

मीरा-भाईंदर मनपाने वनपट्ट्यांना पोहोचली होती हानीमीरा-भाईंदर महापालिकेने यापूर्वीच पाइपलाइन टाकण्यासाठी संजय गांधी उद्यानातील संरक्षित वनपट्ट्यांवर अतिक्रमण केलेहोते. त्यामुळे ०.३९ हेक्टर जमिनीवरील वृक्षवेलींची नियमबाह्य कत्तल करून समांतर जलवाहिनी टाकल्याप्रकरणी मीरा-भाईंदरचे तत्कालीन आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबत येऊरच्या परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी एप्रिल २०१५ मध्ये अहवाल पाठवूनही ठाणे आणि बोरीवली येथील मुख्य वनसंरक्षकांनी त्याबाबत अद्यापही कारवाई केली नसल्याचे उघड झाले आहे.ही कामे करणारया वनजमिनीतून पाइपलाइनसह लगतचे रस्ते, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, बोगद्यांसह तत्सम कामे करण्यात येणार आहेत. यामुळे वनांमधून मोठ्या प्रमाणात दुर्मीळ वृक्षांची कत्तल होऊन अवजड वाहनांची वाहतूक वाढून वन्यजीवांना धोका पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडवरून ज्याप्रमाणे वाद पेटला तसा या कामादरम्यान पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकthaneठाणे