शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्या’च्या पाइपलाइनसाठी १३१ एकर वनावर बुलडोझर; 'आरे'नंतर पुन्हा मोठी वृक्षतोड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:25 IST

वन्यप्रेमी विरुद्ध सरकार वाद पेटण्याची शक्यता

नारायण जाधवठाणे : मेट्रो ३ च्या कारशेडसाठी मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत असताना आता एमएमआरडीएच्या मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार महापालिकेसह २७ गावांची तहान भागविण्यासाठीच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील तब्बल १३१.५७ एकर जंगलांचा गळा घोटला जाणार आहे. यात १६ एकरहून अधिक जमीन संजय गांधी राष्ट्रीय कार्यक्षेत्रातील आहे. यामुळे आगामी काळात वन्यपे्रमी विरुद्ध एमएमआरडीए आणि सरकार असा संघर्ष पुन्हा एकदा उभा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवर बांधलेल्या धरणातून वसई-विरार महापलिकेसह परिसरातील २७ गावे आणि ठाणे जिल्ह्यांतील मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी एमएमआरडीएने अडीच हजार कोटी रुपये खर्र्चून पाणीपुरवठा हाती घेतला आहे. नगरविकास विभागाने अलीकडेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे अधिकार एमएमआरडीएला प्रदान केले आहेत. त्यानंतर आता शासनाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल १३१.५७ एकर वनजमीन या प्रकल्पांसाठी देण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात खारफुटीचाही समावेश आहे.

८० एकर राखीव तर ४२ एकर संरक्षित वनांचा जाणार बळीविशेष यात ७९.६८ एकर राखीव वनजमीन तर ४१.७४ संरक्षित वनांचा समावेश आहे. तर ९.३ एकर जमिनीवर खासगी वने आहेत. राखीव वनांमध्ये १६ एकराहून अधिक परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आहे.

मीरा-भाईंदर मनपाने वनपट्ट्यांना पोहोचली होती हानीमीरा-भाईंदर महापालिकेने यापूर्वीच पाइपलाइन टाकण्यासाठी संजय गांधी उद्यानातील संरक्षित वनपट्ट्यांवर अतिक्रमण केलेहोते. त्यामुळे ०.३९ हेक्टर जमिनीवरील वृक्षवेलींची नियमबाह्य कत्तल करून समांतर जलवाहिनी टाकल्याप्रकरणी मीरा-भाईंदरचे तत्कालीन आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबत येऊरच्या परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी एप्रिल २०१५ मध्ये अहवाल पाठवूनही ठाणे आणि बोरीवली येथील मुख्य वनसंरक्षकांनी त्याबाबत अद्यापही कारवाई केली नसल्याचे उघड झाले आहे.ही कामे करणारया वनजमिनीतून पाइपलाइनसह लगतचे रस्ते, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, बोगद्यांसह तत्सम कामे करण्यात येणार आहेत. यामुळे वनांमधून मोठ्या प्रमाणात दुर्मीळ वृक्षांची कत्तल होऊन अवजड वाहनांची वाहतूक वाढून वन्यजीवांना धोका पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडवरून ज्याप्रमाणे वाद पेटला तसा या कामादरम्यान पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकthaneठाणे