शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्या’च्या पाइपलाइनसाठी १३१ एकर वनावर बुलडोझर; 'आरे'नंतर पुन्हा मोठी वृक्षतोड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:25 IST

वन्यप्रेमी विरुद्ध सरकार वाद पेटण्याची शक्यता

नारायण जाधवठाणे : मेट्रो ३ च्या कारशेडसाठी मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत असताना आता एमएमआरडीएच्या मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार महापालिकेसह २७ गावांची तहान भागविण्यासाठीच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील तब्बल १३१.५७ एकर जंगलांचा गळा घोटला जाणार आहे. यात १६ एकरहून अधिक जमीन संजय गांधी राष्ट्रीय कार्यक्षेत्रातील आहे. यामुळे आगामी काळात वन्यपे्रमी विरुद्ध एमएमआरडीए आणि सरकार असा संघर्ष पुन्हा एकदा उभा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवर बांधलेल्या धरणातून वसई-विरार महापलिकेसह परिसरातील २७ गावे आणि ठाणे जिल्ह्यांतील मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी एमएमआरडीएने अडीच हजार कोटी रुपये खर्र्चून पाणीपुरवठा हाती घेतला आहे. नगरविकास विभागाने अलीकडेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे अधिकार एमएमआरडीएला प्रदान केले आहेत. त्यानंतर आता शासनाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल १३१.५७ एकर वनजमीन या प्रकल्पांसाठी देण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात खारफुटीचाही समावेश आहे.

८० एकर राखीव तर ४२ एकर संरक्षित वनांचा जाणार बळीविशेष यात ७९.६८ एकर राखीव वनजमीन तर ४१.७४ संरक्षित वनांचा समावेश आहे. तर ९.३ एकर जमिनीवर खासगी वने आहेत. राखीव वनांमध्ये १६ एकराहून अधिक परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आहे.

मीरा-भाईंदर मनपाने वनपट्ट्यांना पोहोचली होती हानीमीरा-भाईंदर महापालिकेने यापूर्वीच पाइपलाइन टाकण्यासाठी संजय गांधी उद्यानातील संरक्षित वनपट्ट्यांवर अतिक्रमण केलेहोते. त्यामुळे ०.३९ हेक्टर जमिनीवरील वृक्षवेलींची नियमबाह्य कत्तल करून समांतर जलवाहिनी टाकल्याप्रकरणी मीरा-भाईंदरचे तत्कालीन आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबत येऊरच्या परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी एप्रिल २०१५ मध्ये अहवाल पाठवूनही ठाणे आणि बोरीवली येथील मुख्य वनसंरक्षकांनी त्याबाबत अद्यापही कारवाई केली नसल्याचे उघड झाले आहे.ही कामे करणारया वनजमिनीतून पाइपलाइनसह लगतचे रस्ते, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, बोगद्यांसह तत्सम कामे करण्यात येणार आहेत. यामुळे वनांमधून मोठ्या प्रमाणात दुर्मीळ वृक्षांची कत्तल होऊन अवजड वाहनांची वाहतूक वाढून वन्यजीवांना धोका पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडवरून ज्याप्रमाणे वाद पेटला तसा या कामादरम्यान पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकthaneठाणे