शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

बिल्डरांनी जमिनी बळकावल्या, टीडीआरला कोणी विचारेना, घोडबंदर टॉवरच्या जंगलात आदिवासींची घुसमट

By अजित मांडके | Updated: September 14, 2023 07:28 IST

Thane News: घोडबंदर भागात १९९१ च्या कालावधीत आलेल्या अनेक बिल्डरांनी  ५-१० हजार रुपये एकर दराने शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी घेतल्या. त्या जमिनींना आता लाखोंचा भाव आला आहे.

- अजित मांडकेठाणे - घोडबंदर भागात १९९१ च्या कालावधीत आलेल्या अनेक बिल्डरांनी  ५-१० हजार रुपये एकर दराने शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी घेतल्या. त्या जमिनींना आता लाखोंचा भाव आला आहे; ज्या जागेवर असंख्य टॉवर्स उभे राहिले त्या आदिवासींना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.  

नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात पाणखंडा, ठक्कर पाडा, गोवणी पाडा, बामनाली पाडा, देवीचा पाडा, गायमुख कशेळी आदि प्रमुख आदिवासी पाडे आजही या भागात आहेत; पण काँक्रीटच्या जंगलात आक्रसून गेलेली. घोडबंदर परिसरातील फ्लॅट्सची किंमत लाखोंच्या घरात गेली. परंतु आदिवासींच्या नशिबी परवडच आहे. वाघबीळ, कासारवडवली, ओवळा, मोघरपाडा भागातील स्थानिकांच्या उरल्यासुरल्या जमिनी विकास प्रकल्पांसाठी घेतल्या जात आहेत. कोस्टलसाठी आता वाघबीळ आणि इतर भागातील भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या. त्या बदल्यात टीडीआर दिला जात आहे; पण तो टीडीआर घेण्यास एकही बिल्डर येत नाही, असे शेतकरी सांगतात. मेट्रोच्या कारशेडसाठी मोघरपाडा येथील २५० एकरच्या आसपास जमीन घेतली जाणार आहे. परंतु, त्याचा मोबदलाच अद्याप दिला नाही. शेतकऱ्यांनी वॉटरफ्रंटसाठी जागा दिली. त्या बदल्यात स्थानिकांना व्यवसायाची संधी दिली जाणार होती. ती जागा महिला बचत गटाला दिल्याने रहिवासी नाराज आहेत.

मुख्य समस्या- दोन पदरी रस्ते आठ पदरी झाले असले तरी या ठिकाणी वाहतुकीची समस्या आहे तशीच. - मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही.- वाघबीळ गावात नव्याने इमारती उभ्या राहिल्या. त्यांच्या ड्रेनेजचे पाणी जाण्यासाठी नाले केले; पण ते अपूर्ण असल्याने तुंबलेले पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत जाते.

ना पाणी, ना वीज, ना स्मशानभूमी - वाघबीळ, कासारवडली आणि मोघरपाडा आदी भागात तीन स्मशानभूमी आहेत. परंतु कासारवडली स्मशानभूमीत ना पाणी, ना वीज, ना इतर कोणत्याही सुविधा. - मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरण उपलब्ध होत नाही. - मोघरपाडा स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी सुरू केली. परंतु त्याच्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबला गळती लागली.

एखाद्या शेतकऱ्याने समजा २००० साली आपली जमीन विकली असेल, तर त्याला तेव्हाच्या बाजार दरानुसारच मोबदला दिलेला आहे. परंतु आता जर शेतकरी किंवा स्थानिक मोबदला कमी मिळाला, असे म्हणत असेल तर ते योग्य ठरणार नाही.- जितेंद्र मेहता, जेव्हीएम ग्रुप तथा अध्यक्ष, एमसीएचआय, ठाणे

बिल्डरांनी आमच्या जागा कवडीमोल भावाने खरेदी केल्या. कोस्टल रोडसाठी जागा घेतल्या जात आहेत. त्या बदल्यात टीडीआर दिला जात आहे. वास्तविक पाहता समृद्धी महामार्गाप्रमाणे आम्हाला मोबदला मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र टीडीआरला कोणी विचारत नाही. तो तसाच पडून आहे.- संतोष भोईर, भूमिपुत्र, वाघबीळपूर्वी शेती केली जात होती. परंतु आता शेती नावाला उरली आहे, आता केवळ लाल पटणीची (भाताचा प्रकार) शेती केली जाते. ती कुटुंबाच्या पोटाला जेमतेम पुरेशी आहे. वस्तीला चांगले पक्के रस्ते नाहीत, पाण्याची समस्या आहे, घोडबंदरचा विकास झाला; पण आम्ही तसेच राहिलो.- अमित भोईर, स्थानिक नागरिकमोघरपाड्यात स्मशानभूमीत एकाच वेळेस अधिक संख्येने मृतदेह आल्यास समस्या निर्माण होते. परंतु येणाऱ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी मोफत लाकडे पुरविण्याचे काम करीत आहे. त्यातून सेवा देण्याचा प्रयत्न आहे.    - राम ठाकूर, स्थानिक समाजसेवक

टॅग्स :thaneठाणे