शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बिल्डरांनी जमिनी बळकावल्या, टीडीआरला कोणी विचारेना, घोडबंदर टॉवरच्या जंगलात आदिवासींची घुसमट

By अजित मांडके | Updated: September 14, 2023 07:28 IST

Thane News: घोडबंदर भागात १९९१ च्या कालावधीत आलेल्या अनेक बिल्डरांनी  ५-१० हजार रुपये एकर दराने शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी घेतल्या. त्या जमिनींना आता लाखोंचा भाव आला आहे.

- अजित मांडकेठाणे - घोडबंदर भागात १९९१ च्या कालावधीत आलेल्या अनेक बिल्डरांनी  ५-१० हजार रुपये एकर दराने शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी घेतल्या. त्या जमिनींना आता लाखोंचा भाव आला आहे; ज्या जागेवर असंख्य टॉवर्स उभे राहिले त्या आदिवासींना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.  

नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात पाणखंडा, ठक्कर पाडा, गोवणी पाडा, बामनाली पाडा, देवीचा पाडा, गायमुख कशेळी आदि प्रमुख आदिवासी पाडे आजही या भागात आहेत; पण काँक्रीटच्या जंगलात आक्रसून गेलेली. घोडबंदर परिसरातील फ्लॅट्सची किंमत लाखोंच्या घरात गेली. परंतु आदिवासींच्या नशिबी परवडच आहे. वाघबीळ, कासारवडवली, ओवळा, मोघरपाडा भागातील स्थानिकांच्या उरल्यासुरल्या जमिनी विकास प्रकल्पांसाठी घेतल्या जात आहेत. कोस्टलसाठी आता वाघबीळ आणि इतर भागातील भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या. त्या बदल्यात टीडीआर दिला जात आहे; पण तो टीडीआर घेण्यास एकही बिल्डर येत नाही, असे शेतकरी सांगतात. मेट्रोच्या कारशेडसाठी मोघरपाडा येथील २५० एकरच्या आसपास जमीन घेतली जाणार आहे. परंतु, त्याचा मोबदलाच अद्याप दिला नाही. शेतकऱ्यांनी वॉटरफ्रंटसाठी जागा दिली. त्या बदल्यात स्थानिकांना व्यवसायाची संधी दिली जाणार होती. ती जागा महिला बचत गटाला दिल्याने रहिवासी नाराज आहेत.

मुख्य समस्या- दोन पदरी रस्ते आठ पदरी झाले असले तरी या ठिकाणी वाहतुकीची समस्या आहे तशीच. - मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही.- वाघबीळ गावात नव्याने इमारती उभ्या राहिल्या. त्यांच्या ड्रेनेजचे पाणी जाण्यासाठी नाले केले; पण ते अपूर्ण असल्याने तुंबलेले पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत जाते.

ना पाणी, ना वीज, ना स्मशानभूमी - वाघबीळ, कासारवडली आणि मोघरपाडा आदी भागात तीन स्मशानभूमी आहेत. परंतु कासारवडली स्मशानभूमीत ना पाणी, ना वीज, ना इतर कोणत्याही सुविधा. - मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरण उपलब्ध होत नाही. - मोघरपाडा स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी सुरू केली. परंतु त्याच्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबला गळती लागली.

एखाद्या शेतकऱ्याने समजा २००० साली आपली जमीन विकली असेल, तर त्याला तेव्हाच्या बाजार दरानुसारच मोबदला दिलेला आहे. परंतु आता जर शेतकरी किंवा स्थानिक मोबदला कमी मिळाला, असे म्हणत असेल तर ते योग्य ठरणार नाही.- जितेंद्र मेहता, जेव्हीएम ग्रुप तथा अध्यक्ष, एमसीएचआय, ठाणे

बिल्डरांनी आमच्या जागा कवडीमोल भावाने खरेदी केल्या. कोस्टल रोडसाठी जागा घेतल्या जात आहेत. त्या बदल्यात टीडीआर दिला जात आहे. वास्तविक पाहता समृद्धी महामार्गाप्रमाणे आम्हाला मोबदला मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र टीडीआरला कोणी विचारत नाही. तो तसाच पडून आहे.- संतोष भोईर, भूमिपुत्र, वाघबीळपूर्वी शेती केली जात होती. परंतु आता शेती नावाला उरली आहे, आता केवळ लाल पटणीची (भाताचा प्रकार) शेती केली जाते. ती कुटुंबाच्या पोटाला जेमतेम पुरेशी आहे. वस्तीला चांगले पक्के रस्ते नाहीत, पाण्याची समस्या आहे, घोडबंदरचा विकास झाला; पण आम्ही तसेच राहिलो.- अमित भोईर, स्थानिक नागरिकमोघरपाड्यात स्मशानभूमीत एकाच वेळेस अधिक संख्येने मृतदेह आल्यास समस्या निर्माण होते. परंतु येणाऱ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी मोफत लाकडे पुरविण्याचे काम करीत आहे. त्यातून सेवा देण्याचा प्रयत्न आहे.    - राम ठाकूर, स्थानिक समाजसेवक

टॅग्स :thaneठाणे