शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोपर रेल्वे स्थानकात तातडीने संरक्षक भिंत बांधा - रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 14:09 IST

मध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना म्हात्रेनगरमधील पाच रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. याआधीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देमध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना म्हात्रेनगरमधील पाच रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. कोपर स्थानकात संरक्षक भिंत बांधा असे आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.एखाद्याचा जीव जातो याची दखल घेत चव्हाण यांनी तातडीने मध्य रेल्वेच्या डिआरएम एस.के.जैन यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या दुर्घटनांबाबत चर्चा केली.

डोंबिवली - मध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना म्हात्रेनगरमधील पाच रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. याआधीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी गर्दीमुळे कोपर स्थानकादरम्यानच जलद मार्गावर लोकलमधून पडून एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रवाशांच्या जीवापेक्षा रेल्वे प्रशासनाला आणखी काय महत्त्वाचे आहे? असा सवाल करत तिकिटांच्या माध्यमातून होणारी लाखो रूपयांची उलाढाल प्रवाशांमुळेच होते, हे लक्षात घ्या आणि तात्काळ कोपर स्थानकात संरक्षक भिंत बांधा असे आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. त्यानुसार डिआरएम एस.के.जैन यांनी लवकरच तेथे त्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे आश्वस्थ केले.

रविवारी दोन महिला आणि एक चिमुरडा, त्या आधी चार महिन्यांपूर्वी पावसकर ज्येष्ठ दाम्पत्य आदींचा रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला होता. हे पाचही म्हात्रेनगरमधील रहिवासी होते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून नगरसेवक विषू पेडणेकर यांनी दोन दिवसांपासून कोपर स्थानकामध्ये जनजागृती अभियान सुरू केले होते. पण त्यातच बुधवारीही आणखी एका युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. त्यामुळे अपघातांची संख्या कमी होत नसल्याने पेडणेकर यांनी तातडीने राज्यमंत्री चव्हाण यांची भेट घेत अपघातांबाबत सांगितले. तसेच २०१२ पासून संरक्षक भिंतीची मागणी करूनही रेल्वे प्रशासन मात्र त्यावर काहीही कार्यवाही करत नसल्याने अपघात थांबू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

एखाद्याचा जीव जातो याची दखल घेत चव्हाण यांनी तातडीने मध्य रेल्वेच्या डिआरएम एस.के.जैन यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या दुर्घटनांबाबत चर्चा केली. तसेच तातडीने संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश दिले. शर्मा यांनीही तातडीने तीन अभियंते  अधिकाऱ्यांना बुधवारीच कोपर रेल्वे स्थानकात पाठवले आणि वस्तूस्थितीचा अहवाल मागवला. त्यानूसार पाहणी अहवालानंतर तातडीने कोपर स्थानकात आवश्यक असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तातडीच्या तत्वावर तीन दिवसांत त्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्र्यांना आश्वासन देण्यात आले आहे. पेडणेकर यांनी त्यासंदर्भात पाठपुरावा करावा आणि जर काही अडचणी असल्यास तातडीने संपर्क साधावा, इथल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने ही समस्या न सोडवल्यास तात्काळ रेल्वे बोर्ड, आणि केंद्रीय रेल्वेमंत्रालयाशी संपर्क साधण्याचा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे. या स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे, भविष्याचा वेध घेत त्या पूलाची तसेच एस्कलेटरची सुविधा देखील या ठिकाणी देण्यात यावी त्या मागणीचाही तात्काळ विचार व्हावा अशी चर्चाही राज्यमंत्री चव्हाण यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत केली.

टॅग्स :railwayरेल्वेlocalलोकल