शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोपर रेल्वे स्थानकात तातडीने संरक्षक भिंत बांधा - रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 14:09 IST

मध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना म्हात्रेनगरमधील पाच रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. याआधीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देमध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना म्हात्रेनगरमधील पाच रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. कोपर स्थानकात संरक्षक भिंत बांधा असे आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.एखाद्याचा जीव जातो याची दखल घेत चव्हाण यांनी तातडीने मध्य रेल्वेच्या डिआरएम एस.के.जैन यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या दुर्घटनांबाबत चर्चा केली.

डोंबिवली - मध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना म्हात्रेनगरमधील पाच रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. याआधीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी गर्दीमुळे कोपर स्थानकादरम्यानच जलद मार्गावर लोकलमधून पडून एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रवाशांच्या जीवापेक्षा रेल्वे प्रशासनाला आणखी काय महत्त्वाचे आहे? असा सवाल करत तिकिटांच्या माध्यमातून होणारी लाखो रूपयांची उलाढाल प्रवाशांमुळेच होते, हे लक्षात घ्या आणि तात्काळ कोपर स्थानकात संरक्षक भिंत बांधा असे आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. त्यानुसार डिआरएम एस.के.जैन यांनी लवकरच तेथे त्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे आश्वस्थ केले.

रविवारी दोन महिला आणि एक चिमुरडा, त्या आधी चार महिन्यांपूर्वी पावसकर ज्येष्ठ दाम्पत्य आदींचा रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला होता. हे पाचही म्हात्रेनगरमधील रहिवासी होते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून नगरसेवक विषू पेडणेकर यांनी दोन दिवसांपासून कोपर स्थानकामध्ये जनजागृती अभियान सुरू केले होते. पण त्यातच बुधवारीही आणखी एका युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. त्यामुळे अपघातांची संख्या कमी होत नसल्याने पेडणेकर यांनी तातडीने राज्यमंत्री चव्हाण यांची भेट घेत अपघातांबाबत सांगितले. तसेच २०१२ पासून संरक्षक भिंतीची मागणी करूनही रेल्वे प्रशासन मात्र त्यावर काहीही कार्यवाही करत नसल्याने अपघात थांबू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

एखाद्याचा जीव जातो याची दखल घेत चव्हाण यांनी तातडीने मध्य रेल्वेच्या डिआरएम एस.के.जैन यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या दुर्घटनांबाबत चर्चा केली. तसेच तातडीने संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश दिले. शर्मा यांनीही तातडीने तीन अभियंते  अधिकाऱ्यांना बुधवारीच कोपर रेल्वे स्थानकात पाठवले आणि वस्तूस्थितीचा अहवाल मागवला. त्यानूसार पाहणी अहवालानंतर तातडीने कोपर स्थानकात आवश्यक असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तातडीच्या तत्वावर तीन दिवसांत त्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्र्यांना आश्वासन देण्यात आले आहे. पेडणेकर यांनी त्यासंदर्भात पाठपुरावा करावा आणि जर काही अडचणी असल्यास तातडीने संपर्क साधावा, इथल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने ही समस्या न सोडवल्यास तात्काळ रेल्वे बोर्ड, आणि केंद्रीय रेल्वेमंत्रालयाशी संपर्क साधण्याचा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे. या स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे, भविष्याचा वेध घेत त्या पूलाची तसेच एस्कलेटरची सुविधा देखील या ठिकाणी देण्यात यावी त्या मागणीचाही तात्काळ विचार व्हावा अशी चर्चाही राज्यमंत्री चव्हाण यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत केली.

टॅग्स :railwayरेल्वेlocalलोकल