शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संभ्रमात टाकणारा पण अभ्यासांती संभ्रमित न करणारा अर्थसंकल्प - चंद्रशेखर टिळक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 12:21 IST

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रिय अर्थसंकल्प २०१८ वरील विश्लेषणात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

 डोंबिवली - टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रिय अर्थसंकल्प २०१८ वरील विश्लेषणात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सलग ३१ वर्षे अर्थसंकल्पिय विश्लेषण सादर करणारे ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. 

केंद्रिय अर्थसंकल्प २०१८ वेगवेगळ्या आणि नवनवीन कलांचा तसेच प्रत्येक क्षेत्रातील दोन वेगवेगळ्या परिस्थितींचा पुर्णपणाने संतुलन साधणारा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य चाकारमान्यांना फारसं काही देणारा अर्थसंकल्प नसला तरी देखील कृषीप्रधान देश अशी ओळख असणाऱ्या देशाच्या शेतकरी वर्गापासून ते शेतमालाच्या योग्य आणि प्रभावीपणे वितरण आणि विक्री करण्यासाठी समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्यासाठी खुप काही देणारा अर्थसंकल्प आहे. तसेच पारंपारिक  शेतीपासून क्लस्टर शेतीकडे वाटचाल करण्यासाठी सहकार्य करणारा अर्थसंकल्प आहे. शेती सारख्या मूलभूत उपजिवीकेच्या उद्योगापासून भारतीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी कसा फायदा होऊ शकतो हे देखील त्यांनी विषद केले. तसेच हा अर्थसंकल्प तरूण पिढीची मानसिकता, गरजा आणि वृत्ती विचारात घेऊन मांडला असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाचे अर्थकारण हे IPL auction सारखे झाले आहे . त्यात अर्थसंकल्पाला राहुल द्रविड किंवा अजिंक्य राहणेची भूमिका बजावावी लागते असेही टिळक म्हणालेअयुष्यमानभव या योजनेमुळे अरोग्य क्षेत्रात होणारे बदल , त्याचा शिक्षण , अर्थकारण , राजकारण , गुंतवणूक या क्षेत्रांवर होणारा पारीणाम याचे केलेले सविस्तर व खुमासदार वर्णन हा तर या भाषणाचा कळस होता .

करबाबत तरतूदींबद्दल बोलताना दिर्घ कालीन भांडवली नफ्यावर लागू झालेला कर हा काही अंशी अपेक्षितच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्याचा शेअर बाजाराचा उच्च निर्देशांक हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल नसल्याचेही त्यांनी सांगितले. दिर्घ कालीन भांडवली नफ्यावर लागू झालेला कर आणि ज्येष्ठ नागरीकांना दिलेली बॅंक ठेवींवरील व्याजातील सूट हे सूत्र शेअर बाजारातील पैसा बॅंकांकडे वळवून बॅंकाच्या विलीनीकरणासाठीची पुर्वतयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या कारकिर्दीचा आढावा घेतल्यास सगळे महत्त्वाचे आर्थिक निर्णय हे अर्थसंकल्पाबाहेर घेतले गेल्याचे आढळते आणि त्यामुळेच या अर्थसंकल्पाकडून अपेक्षित असणारा आर्थिक वर्षाच्या कालावधीतील बदल हा येणाऱ्या काही महिन्यात जाहीर करण्यात येईल असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पdombivaliडोंबिवली