शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भिवंडीत बापाची हत्या करणा-या मुलास भार्इंदरमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:41 IST

बापाचे व मुलाचे शेतीच्या कामावरून भांडण झाले होते. दोघांत झालेले भांडण विकोपाला जाऊन फरशीने धर्मा धिंडाच्या पाठीत देखील वार केले.

ठळक मुद्देधर्मा याने मुलगा सुरेश यांस घराबाहेर हाकलून दिले. त्यामधून बापाची हत्या मुलाने केली

भिवंडी : फरशीच्या वाराने बापाची हत्या करणा-या मुलास पोलिसांनी मंगळवार रोजी भार्इंदर उत्तन येथील होडीवर पकडले. बापाचे व मुलाचे शेतीच्या कामावरून भांडण झाले होते, त्यामधून बापाची हत्या मुलाने केली होती. तालुक्यातील पाये गावात मृत धर्मा शंकर धिंडा (७०) हा आपल्या भाताच्या खळ्यावर मळणीचे करीत होता. त्यावेळी तेथे बसलेला मुलगा सुरेश यांस मळणीच्या कामात मदत करण्यास सांगितले. परंतु त्याने बापाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. याचा राग मनात धरून धर्मा याने मुलगा सुरेश यांस घराबाहेर हाकलून दिले. यावरून दोघांत झालेले भांडण विकोपाला जाऊन सुरेश याने तेथे असलेली फरशी धर्माच्या डोक्यात फेकून मारली. तसेच त्याच फरशीने धर्माच्या पाठीत देखील वार केले. फरशीच्या माराने धर्मा गंभीररीत्या जखमी होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सुरेश धिंडा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पाये गावात घडलेल्या घटनेनंतर सुरेश धिंडा याने पाये गावातील घटना स्थळावरून पळ काढला. तो वसईमार्गे थेट भार्इंदर येथील उत्तन-पाली येथे गेला. आपणांस कोणीही ओळखू नये म्हणून त्याने होडीवर खलाशाचे काम सुरू केले. याची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्यास पकडले.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीCrimeगुन्हा