शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काँग्रेसची आघाडी?

By admin | Updated: May 29, 2017 06:10 IST

मीरा-भार्इंदरमध्ये मोठी गळती लागल्याने पालिका निवडणुकीत आघाडी करण्याची तयारी दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मोठी गळती लागल्याने पालिका निवडणुकीत आघाडी करण्याची तयारी दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. आघाडी झाल्यास महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याची ही दोन्ही काँग्रेसची पहिलीच वेळ असेल. आघाडी झाल्यास काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका बजावणार, हे निश्चित. दरम्यान, दोन्ही काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले आहेत. सध्याचे प्राबल्य असलेले प्रभाग व उमेदवारांची यादी तयार झाल्यावर त्यातून निवडून येण्याच्या क्षमतेप्रमाणे जागावाटप होण्याचे संकेत आहेत. महापालिकेची पहिली निवडणूक २००२ मध्ये झाली होती. त्यावेळी दोन्ही काँग्रेसमध्ये बहुतांश मैत्रीपूर्ण लढतच झाली होती. त्यानंतरही २००७ व २०१२ च्या पालिका निवडणुकीतही दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्या होत्या. पण, निवडणुकीनंतर मात्र २००७ मध्ये पहिल्या अडीच वर्षांसाठी झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीचा अपवाद वगळता दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी झाली होती. २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे २०, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु, राष्ट्रवादीचे स्थानिक सर्वेसर्वा माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा हे आता समर्थक नगरसेवक-पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आधीच राष्ट्रवादीचे डझनभर नगरसेवक शिवसेना व भाजपात गेले आहेत. जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारीही बाहेर पडले आहेत. त्यामुळे १५ वर्षे सत्तेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस शहरात नावाला उरली आहे. काँग्रेसची अवस्थाही शहरात वेगळी नाही. माजी आ. मुझफ्फर हुसेन यांच्याकडून डावलले जाणे वा कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत अनेक ज्येष्ठांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसच्या विद्यमान ९ नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा-सेनेत दाखल झाले. शहरात सध्या भाजपा विरुद्ध शिवसेना अशीच लढत रंगणार असल्याचे वातावरण आहे. त्यातच, ४ नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने दोन्ही काँग्रेसला येणारी पालिका निवडणूक फारच अवघड ठरणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही काँग्रेसला शहरात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आघाडीशिवाय पर्याय नाही.काँग्रेस आघाडीने मंजूर केलेली विकासाची कामेच आज शहरात सुरू आहेत. शहरातील सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्ट व दडपशाही कारभाराला नागरिक कंटाळले आहेत. शहरहितासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे. उमेदवारांची यादी आल्यानंतर जागावाटपाबाबत चर्चा करता येईल. - अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस शहर पुन्हा विकासाच्या प्रगतीपथावर न्यायचे असेल, तर दोन्ही काँग्रेसला आताच्या परिस्थितीत आघाडी करून निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय नाही. आमची काँग्रेससोबत आघाडीची बोलणी सुरू झाली असून दोन्ही पक्षांचे नेते योग्य निर्णय घेतील. - जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ स्तरावर अजून आघाडीबाबत चर्चा झालेली नाही. पण, स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवारांची यादी आल्यावर आघाडीबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल. - मुझफ्फर हुसेन, माजी आमदारच्काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. च्आघाडीसाठी सध्या ज्या पक्षाचा जास्त प्रभाव आहे, असे प्रभाग तसेच इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून त्यातील निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार ठरवून जागावाटपाचे सूत्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. च्४ नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने ही निवडणूक दोन्ही काँग्रेसला कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना आघाडीशिवाय पर्याय राहिलेला नाही.