शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

पाण्यात बुडालेल्या तिघापैकी दोघांचे मृतदेह मिळाले, तीन वर्षीय बालिकेचा शोध सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:34 IST

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे कळवा, वागळे इस्टेट आणि कोरम मॉल येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळया भागातून तिघेजण बुडाले. तिघांपैकी रजिना शेख (३२, रा. कळवा) आणि शाहीद शेख (२८, रा. रामनगर) या दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर नितिन कंपनीजवळील नाल्यात बुडालेल्या गौरी अशोक जयस्वाल या तीन वर्षीय ...

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे कळवा, वागळे इस्टेट आणि कोरम मॉल येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळया भागातून तिघेजण बुडाले. तिघांपैकी रजिना शेख (३२, रा. कळवा) आणि शाहीद शेख (२८, रा. रामनगर) या दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर नितिन कंपनीजवळील नाल्यात बुडालेल्या गौरी अशोक जयस्वाल या तीन वर्षीय मुलीचा अद्यापही शोध सुरुच असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.कळव्यातील शांतीनगर भागात राहणारी रजिना ही महिला दुपारी मुसळधार पावसात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नाल्यात बुडाली. पोहता न आल्यामुळे या पाण्यात बुडून तिचा मृत्यु झाला. रात्री उशिरा तिचा मृतदेह हाती लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. तर येऊरच्या मामा भाच्चे डोंगरावर काही कामानिमित्त गेलेला शाहीद डोंगरावरील पाण्यात पाय निसटल्यामुळे सटकला. तिथून तो वागळे इस्टेट मार्गावरील नाल्याने थेट चार ते पाच किलो मीटर लांब असलेल्या पाण्यात अग्निशमन दलाला मिळाला. तर आपल्या वडीलांच्या हातातून कोरम मॉल परिसरातून निसटलेली गौरी या मुलीचा दुपारपासून वागळे इस्टेट पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र रात्री १२ वाजेपर्यंतही तिचा शोध लागू शकला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

चिखलवाडीतून ३० रहिवाशांची सुटकानौपाडयातील भास्कर कॉलनी भागातील चिखलवाडी येथील एका इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पाणी शिरले होते. रात्री ७.३० ते १०.३० या दोन तासांमध्ये नौपाडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने महामार्गालगतच्या सेवा रस्त्यालगत असलेल्या इमारतीमधून १९ तर आतील इमारतीमधून ११ अशा ३० रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. या इमारतींमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, प्रकाश पाटील, हवालदार संजय चव्हाण, सुभाष पाटील, शब्बीर फरास आणि अनिल राठोड आदी त्याठिकाणी पोहचले. कोणतीही साधने हाताशी नसल्यामुळे चव्हाण आणि सुभाष पाटील या दोन पोलीस शिपायांनी तर पाण्यातून पोहून काही रहिवाशांची सुटका केली. काही वेळाने अग्निशमन दलाचे जवान तिथे आल्यानंतर त्यांनी बोटीच्या सहाय्याने याठिकाणी काही जणांची सुटका केली. एका इमारतीमधील मिश्रा कुटूंबातील दोघे भाऊ हे त्यांची पत्नी आणि चार मुलांसह अडकले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगूनही ते घराबाहेर पडायला तयार नव्हते. अखेर या आठ जणांनाही भर पाण्यातून जबरदस्तीने बाहेर काढल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार