शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
2
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
3
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
4
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
5
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
6
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
7
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
8
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
9
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
10
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
11
2026 Prediction: ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
13
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
14
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
15
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
16
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
17
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
18
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
19
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
20
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात बुडालेल्या तिघापैकी दोघांचे मृतदेह मिळाले, तीन वर्षीय बालिकेचा शोध सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:34 IST

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे कळवा, वागळे इस्टेट आणि कोरम मॉल येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळया भागातून तिघेजण बुडाले. तिघांपैकी रजिना शेख (३२, रा. कळवा) आणि शाहीद शेख (२८, रा. रामनगर) या दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर नितिन कंपनीजवळील नाल्यात बुडालेल्या गौरी अशोक जयस्वाल या तीन वर्षीय ...

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे कळवा, वागळे इस्टेट आणि कोरम मॉल येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळया भागातून तिघेजण बुडाले. तिघांपैकी रजिना शेख (३२, रा. कळवा) आणि शाहीद शेख (२८, रा. रामनगर) या दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर नितिन कंपनीजवळील नाल्यात बुडालेल्या गौरी अशोक जयस्वाल या तीन वर्षीय मुलीचा अद्यापही शोध सुरुच असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.कळव्यातील शांतीनगर भागात राहणारी रजिना ही महिला दुपारी मुसळधार पावसात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नाल्यात बुडाली. पोहता न आल्यामुळे या पाण्यात बुडून तिचा मृत्यु झाला. रात्री उशिरा तिचा मृतदेह हाती लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. तर येऊरच्या मामा भाच्चे डोंगरावर काही कामानिमित्त गेलेला शाहीद डोंगरावरील पाण्यात पाय निसटल्यामुळे सटकला. तिथून तो वागळे इस्टेट मार्गावरील नाल्याने थेट चार ते पाच किलो मीटर लांब असलेल्या पाण्यात अग्निशमन दलाला मिळाला. तर आपल्या वडीलांच्या हातातून कोरम मॉल परिसरातून निसटलेली गौरी या मुलीचा दुपारपासून वागळे इस्टेट पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र रात्री १२ वाजेपर्यंतही तिचा शोध लागू शकला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

चिखलवाडीतून ३० रहिवाशांची सुटकानौपाडयातील भास्कर कॉलनी भागातील चिखलवाडी येथील एका इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पाणी शिरले होते. रात्री ७.३० ते १०.३० या दोन तासांमध्ये नौपाडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने महामार्गालगतच्या सेवा रस्त्यालगत असलेल्या इमारतीमधून १९ तर आतील इमारतीमधून ११ अशा ३० रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. या इमारतींमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, प्रकाश पाटील, हवालदार संजय चव्हाण, सुभाष पाटील, शब्बीर फरास आणि अनिल राठोड आदी त्याठिकाणी पोहचले. कोणतीही साधने हाताशी नसल्यामुळे चव्हाण आणि सुभाष पाटील या दोन पोलीस शिपायांनी तर पाण्यातून पोहून काही रहिवाशांची सुटका केली. काही वेळाने अग्निशमन दलाचे जवान तिथे आल्यानंतर त्यांनी बोटीच्या सहाय्याने याठिकाणी काही जणांची सुटका केली. एका इमारतीमधील मिश्रा कुटूंबातील दोघे भाऊ हे त्यांची पत्नी आणि चार मुलांसह अडकले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगूनही ते घराबाहेर पडायला तयार नव्हते. अखेर या आठ जणांनाही भर पाण्यातून जबरदस्तीने बाहेर काढल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार