शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

पाण्यात बुडालेल्या तिघापैकी दोघांचे मृतदेह मिळाले, तीन वर्षीय बालिकेचा शोध सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:34 IST

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे कळवा, वागळे इस्टेट आणि कोरम मॉल येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळया भागातून तिघेजण बुडाले. तिघांपैकी रजिना शेख (३२, रा. कळवा) आणि शाहीद शेख (२८, रा. रामनगर) या दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर नितिन कंपनीजवळील नाल्यात बुडालेल्या गौरी अशोक जयस्वाल या तीन वर्षीय ...

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे कळवा, वागळे इस्टेट आणि कोरम मॉल येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळया भागातून तिघेजण बुडाले. तिघांपैकी रजिना शेख (३२, रा. कळवा) आणि शाहीद शेख (२८, रा. रामनगर) या दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर नितिन कंपनीजवळील नाल्यात बुडालेल्या गौरी अशोक जयस्वाल या तीन वर्षीय मुलीचा अद्यापही शोध सुरुच असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.कळव्यातील शांतीनगर भागात राहणारी रजिना ही महिला दुपारी मुसळधार पावसात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नाल्यात बुडाली. पोहता न आल्यामुळे या पाण्यात बुडून तिचा मृत्यु झाला. रात्री उशिरा तिचा मृतदेह हाती लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. तर येऊरच्या मामा भाच्चे डोंगरावर काही कामानिमित्त गेलेला शाहीद डोंगरावरील पाण्यात पाय निसटल्यामुळे सटकला. तिथून तो वागळे इस्टेट मार्गावरील नाल्याने थेट चार ते पाच किलो मीटर लांब असलेल्या पाण्यात अग्निशमन दलाला मिळाला. तर आपल्या वडीलांच्या हातातून कोरम मॉल परिसरातून निसटलेली गौरी या मुलीचा दुपारपासून वागळे इस्टेट पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र रात्री १२ वाजेपर्यंतही तिचा शोध लागू शकला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

चिखलवाडीतून ३० रहिवाशांची सुटकानौपाडयातील भास्कर कॉलनी भागातील चिखलवाडी येथील एका इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पाणी शिरले होते. रात्री ७.३० ते १०.३० या दोन तासांमध्ये नौपाडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने महामार्गालगतच्या सेवा रस्त्यालगत असलेल्या इमारतीमधून १९ तर आतील इमारतीमधून ११ अशा ३० रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. या इमारतींमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, प्रकाश पाटील, हवालदार संजय चव्हाण, सुभाष पाटील, शब्बीर फरास आणि अनिल राठोड आदी त्याठिकाणी पोहचले. कोणतीही साधने हाताशी नसल्यामुळे चव्हाण आणि सुभाष पाटील या दोन पोलीस शिपायांनी तर पाण्यातून पोहून काही रहिवाशांची सुटका केली. काही वेळाने अग्निशमन दलाचे जवान तिथे आल्यानंतर त्यांनी बोटीच्या सहाय्याने याठिकाणी काही जणांची सुटका केली. एका इमारतीमधील मिश्रा कुटूंबातील दोघे भाऊ हे त्यांची पत्नी आणि चार मुलांसह अडकले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगूनही ते घराबाहेर पडायला तयार नव्हते. अखेर या आठ जणांनाही भर पाण्यातून जबरदस्तीने बाहेर काढल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार