शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

‘कोणार्क’कडे भाजपाची पाठ

By admin | Updated: May 16, 2017 00:12 IST

गोकुळनगरमध्ये राणीसती मैदानावर कोणार्क आघाडीच्या आठ उमेदवारांसाठी रविवारी रात्री झालेल्या सभेकडे भाजपा कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याने त्यांना ही युती

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : गोकुळनगरमध्ये राणीसती मैदानावर कोणार्क आघाडीच्या आठ उमेदवारांसाठी रविवारी रात्री झालेल्या सभेकडे भाजपा कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याने त्यांना ही युती मान्य नसल्याचे दिसून आले. या युतीसाठी आग्रह धरणारे खासदार कपिल पाटील एकटेच सभेला हजर होते. वाट पाहूनही गर्दी न जमल्याने अखेर जादूचे खेळ करून गर्दी जमवावी लागली आणि दोन तास उशिराने कशीबशी सभा सुरू झाली. या सभेला सभेत खासदारांसह माजी महापौर विलास पाटील, प्रतिभा पाटील, आमदार महेश चौघुले, कोणार्कचे आठ उमेदवार आणि जैन समाजातील प्रतिष्टीत नेते हजर होते. भंवरलाल जैन व गुलाबचंद जैन यांनी रस्त्यावरील मटणाची दुकाने आतील बाजुला स्थलांतरित करावी, ही मागणी लावून धरली. जैन धर्मगुरू आणि साध्वी शहरात येताना प्रत्येक मार्गावर त्यांना अशी दुकाने दिसतात. त्यामुळे ती स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी उचलून धरली. मात्र विलास पाटील यांनी ही दुकाने हटवण्याबाबत ठोस आश्वासन दिले नाही. जैन साधूंना गोकुळनगरमध्ये येतानाच्या मार्गावरील मटणाची दुकाने दिसू नयेत, म्हणून वंजारपट्टीवरील पुलाचा एक रॅम्प या मार्गावर उतरवल्याचे त्यांनी समाजाच्या निदर्शनास आणले. गोकुळनगरमध्ये पाणी नसल्याने टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो, हेही जैन यांनी लक्षात आणल्यावर नेत्यांनी त्याची कबुली दिली. चॅलेंज ग्राऊण्डवर खेळ संपल्यानंतर जाणाऱ्या प्रेक्षकांच्या गोंधळामुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याची मागणी यावेळी भाजपा आणि कोणार्कच्या नेत्यांकडे करण्यात आली. मात्र त्यावर कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही.काँग्रेसवल्यांची सोच गंदी असल्याने त्यांनी पुन्हा शहरात कत्तलखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला, भाजपा कार्यकर्ता आणि बजरंग दलाने तो प्रयत्न हाणून पाडला, अशी माहिती विलास पाटील यांनी दिली.कोणार्कचे निवडणूक चिन्ह असलेल्या टीव्हीचा उल्लेख करून भाजपा खासदार कपील पाटील यांनी मोदींचे दर्शन व्हावे, यासाठी टीव्ही चालू करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांसाठी मेट्रो सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि पक्षातर्फे दिल्या गेलेल्या इतर विकासकामांचा, आश्वासनांचा आढावा घेतला. महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी झाल्याने भिवंडीतही आता मटणाच्या दुकानांपासून कुणाला त्रास होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. कोणार्क आघाडीचा उमेदवार जिंकला, तरी तो आपलाच आहे, असे सांगत त्यांनी नाराज झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला.