शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

‘कोणार्क’कडे भाजपाची पाठ

By admin | Updated: May 16, 2017 00:12 IST

गोकुळनगरमध्ये राणीसती मैदानावर कोणार्क आघाडीच्या आठ उमेदवारांसाठी रविवारी रात्री झालेल्या सभेकडे भाजपा कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याने त्यांना ही युती

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : गोकुळनगरमध्ये राणीसती मैदानावर कोणार्क आघाडीच्या आठ उमेदवारांसाठी रविवारी रात्री झालेल्या सभेकडे भाजपा कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याने त्यांना ही युती मान्य नसल्याचे दिसून आले. या युतीसाठी आग्रह धरणारे खासदार कपिल पाटील एकटेच सभेला हजर होते. वाट पाहूनही गर्दी न जमल्याने अखेर जादूचे खेळ करून गर्दी जमवावी लागली आणि दोन तास उशिराने कशीबशी सभा सुरू झाली. या सभेला सभेत खासदारांसह माजी महापौर विलास पाटील, प्रतिभा पाटील, आमदार महेश चौघुले, कोणार्कचे आठ उमेदवार आणि जैन समाजातील प्रतिष्टीत नेते हजर होते. भंवरलाल जैन व गुलाबचंद जैन यांनी रस्त्यावरील मटणाची दुकाने आतील बाजुला स्थलांतरित करावी, ही मागणी लावून धरली. जैन धर्मगुरू आणि साध्वी शहरात येताना प्रत्येक मार्गावर त्यांना अशी दुकाने दिसतात. त्यामुळे ती स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी उचलून धरली. मात्र विलास पाटील यांनी ही दुकाने हटवण्याबाबत ठोस आश्वासन दिले नाही. जैन साधूंना गोकुळनगरमध्ये येतानाच्या मार्गावरील मटणाची दुकाने दिसू नयेत, म्हणून वंजारपट्टीवरील पुलाचा एक रॅम्प या मार्गावर उतरवल्याचे त्यांनी समाजाच्या निदर्शनास आणले. गोकुळनगरमध्ये पाणी नसल्याने टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो, हेही जैन यांनी लक्षात आणल्यावर नेत्यांनी त्याची कबुली दिली. चॅलेंज ग्राऊण्डवर खेळ संपल्यानंतर जाणाऱ्या प्रेक्षकांच्या गोंधळामुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याची मागणी यावेळी भाजपा आणि कोणार्कच्या नेत्यांकडे करण्यात आली. मात्र त्यावर कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही.काँग्रेसवल्यांची सोच गंदी असल्याने त्यांनी पुन्हा शहरात कत्तलखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला, भाजपा कार्यकर्ता आणि बजरंग दलाने तो प्रयत्न हाणून पाडला, अशी माहिती विलास पाटील यांनी दिली.कोणार्कचे निवडणूक चिन्ह असलेल्या टीव्हीचा उल्लेख करून भाजपा खासदार कपील पाटील यांनी मोदींचे दर्शन व्हावे, यासाठी टीव्ही चालू करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांसाठी मेट्रो सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि पक्षातर्फे दिल्या गेलेल्या इतर विकासकामांचा, आश्वासनांचा आढावा घेतला. महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी झाल्याने भिवंडीतही आता मटणाच्या दुकानांपासून कुणाला त्रास होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. कोणार्क आघाडीचा उमेदवार जिंकला, तरी तो आपलाच आहे, असे सांगत त्यांनी नाराज झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला.