शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

‘कोणार्क’कडे भाजपाची पाठ

By admin | Updated: May 16, 2017 00:12 IST

गोकुळनगरमध्ये राणीसती मैदानावर कोणार्क आघाडीच्या आठ उमेदवारांसाठी रविवारी रात्री झालेल्या सभेकडे भाजपा कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याने त्यांना ही युती

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : गोकुळनगरमध्ये राणीसती मैदानावर कोणार्क आघाडीच्या आठ उमेदवारांसाठी रविवारी रात्री झालेल्या सभेकडे भाजपा कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याने त्यांना ही युती मान्य नसल्याचे दिसून आले. या युतीसाठी आग्रह धरणारे खासदार कपिल पाटील एकटेच सभेला हजर होते. वाट पाहूनही गर्दी न जमल्याने अखेर जादूचे खेळ करून गर्दी जमवावी लागली आणि दोन तास उशिराने कशीबशी सभा सुरू झाली. या सभेला सभेत खासदारांसह माजी महापौर विलास पाटील, प्रतिभा पाटील, आमदार महेश चौघुले, कोणार्कचे आठ उमेदवार आणि जैन समाजातील प्रतिष्टीत नेते हजर होते. भंवरलाल जैन व गुलाबचंद जैन यांनी रस्त्यावरील मटणाची दुकाने आतील बाजुला स्थलांतरित करावी, ही मागणी लावून धरली. जैन धर्मगुरू आणि साध्वी शहरात येताना प्रत्येक मार्गावर त्यांना अशी दुकाने दिसतात. त्यामुळे ती स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी उचलून धरली. मात्र विलास पाटील यांनी ही दुकाने हटवण्याबाबत ठोस आश्वासन दिले नाही. जैन साधूंना गोकुळनगरमध्ये येतानाच्या मार्गावरील मटणाची दुकाने दिसू नयेत, म्हणून वंजारपट्टीवरील पुलाचा एक रॅम्प या मार्गावर उतरवल्याचे त्यांनी समाजाच्या निदर्शनास आणले. गोकुळनगरमध्ये पाणी नसल्याने टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो, हेही जैन यांनी लक्षात आणल्यावर नेत्यांनी त्याची कबुली दिली. चॅलेंज ग्राऊण्डवर खेळ संपल्यानंतर जाणाऱ्या प्रेक्षकांच्या गोंधळामुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याची मागणी यावेळी भाजपा आणि कोणार्कच्या नेत्यांकडे करण्यात आली. मात्र त्यावर कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही.काँग्रेसवल्यांची सोच गंदी असल्याने त्यांनी पुन्हा शहरात कत्तलखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला, भाजपा कार्यकर्ता आणि बजरंग दलाने तो प्रयत्न हाणून पाडला, अशी माहिती विलास पाटील यांनी दिली.कोणार्कचे निवडणूक चिन्ह असलेल्या टीव्हीचा उल्लेख करून भाजपा खासदार कपील पाटील यांनी मोदींचे दर्शन व्हावे, यासाठी टीव्ही चालू करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांसाठी मेट्रो सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि पक्षातर्फे दिल्या गेलेल्या इतर विकासकामांचा, आश्वासनांचा आढावा घेतला. महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी झाल्याने भिवंडीतही आता मटणाच्या दुकानांपासून कुणाला त्रास होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. कोणार्क आघाडीचा उमेदवार जिंकला, तरी तो आपलाच आहे, असे सांगत त्यांनी नाराज झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला.