शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भाजपाच्या मनमानी कारभारामुळे ते नाराज माजी मंडळ अध्यक्ष सेना प्रवेशासाठी आतुर- आ. प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 18:04 IST

भाईंदर - मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रिया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरुन हकालपट्टी केली आहे.

राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रिया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरुन हकालपट्टी केली आहे. भाजपाच्या या मनमानी कारभारामुळे नाराज झालेले ते माजी मंडळ अध्यक्ष आपल्या संपर्कात असुन ते सेनेतील प्रवेशासाठी आतुर झाल्याचा दावा सरनाईक यांनी लोकमतकडे व्यक्त केला आहे.भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या सल्ल्याचा आधार घेत कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरु केला आहे. पालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी इतर पक्षातील पदाधिका-यांना पदांचे व उमेदवारीचे गाजर दाखवून निष्ठावंतांची गळचेपी सुरु केली आहे. एकहाती सत्तेचा दुरुपयोग भाजपाकडून होत असून आपल्या शब्दालाच हुकूमी पत्ता ठरवून स्थानिक नेतृत्वाचा मनमानी कारभार चालला आहे. शहरातील विकासाला चालना देणारा विरोधकांचा ठराव बहुमताच्या जोरावर सत्ताधारी अमान्य करीत असुन प्रशासनाच्या मान्यतेलाही मातीमोल ठरवू लागले आहेत. प्रशासन देखील बेकायदेशीर व मनमानी कारभार चालविणा-या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करीत आहेत. हेच दबावतंत्र भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने गटबाजीच्या नावाखाली अवलंबविण्यास सुरुवात केली आहे. पालिका निवडणुकीत निष्ठावंतांनी जीवाचे रान केले. परंतु त्यांना पराभूत करुन समर्थकांच्या विजयासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप पक्षांतर्गत होऊ लागला आहे. अशातच त्या निष्ठावंतांना पक्षाच्या मुख्यप्रवाहातुनच बाजुला सारण्याची प्रक्रीया स्थानिक नेतृत्वाने केल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. ओखीप्रमाणेच नमो नमो चे वादळ संपुष्टात येऊ लागले आहे. ओखीने अनेकांचे नुकसान केले तर नमो च्या वादळाने देशातील सर्वांचेच नुकसान केले आहे. त्याची परफेड यंदाच्या जिल्हापरिषदांच्या निवडणुकीत मतदारांनी करण्यास सुरुवात केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सत्तेचा माज आलेल्या भाजपापासुन मंडळ अध्यक्षपदावरुन पायउतार करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिकाम्या झालेल्या मंडळ अध्यक्षपदावर मर्जीतील व सांगकाम्याप्रमाणे कारभार करणाय््राांची वर्णी लावण्यात आल्याने त्या नाराज माजी मंडळ अध्यक्षांनी आपल्याशी संपर्क साधुन शिवसेनेत प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यामुळे लवकरच भाजपातील त्या नाराजांचा सेनेत अधिकृत प्रवेश होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.