शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
4
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
5
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
6
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
7
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
8
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
9
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
10
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
11
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
12
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
13
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
14
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
15
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
16
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
17
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
18
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
19
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
20
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीसाठी भाजपा शिवसेनेच्या कोर्टात? राजकारण तापले : थळेंचा राजीनामा पडणार पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामीण भागात राजकारण तापायला सुरूवात झाली आहे

पंढरीनाथ कुंभार भिवंडी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामीण भागात राजकारण तापायला सुरूवात झाली आहे, पण ज्यापद्धतीने गट-गणांची रचना बदलली आहे, ते पाहता ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. ग्रामीण भागातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्त्वाला शह द्यायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीने लढवावी, अशी भूमिका घेत भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.भाजपाच्या नेत्यांनीही या महायुतीला परवानगी द्यावी, यासाठी पाटील प्रयत्नशील आहेत. त्यातच शिवसेनेचे तालुकाप्रमुख विश्वास थळे यांनी राजीनामा दिल्याने ते भाजपाच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते.काही महिन्यांपूर्वी झालेल्या भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवेळी शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यासाठी खासदार पाटील यांनी तालुकाप्रमुख विश्वास थळे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यास सांगितले. परंतु निवडणूक कार्यक्रमाच्या अंतिम क्षणापर्यंत हा निर्णय झाला नाही. उलट ग्रामीण भागात राजकीय अफवांना ऊत आला आणि शिवसेना-भाजपाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले. परिणामी दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणास लागली. भाजपाला एकाकी पाडण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले. भाजपाची कोंडी होऊ द्यायची नसल्याने पाटील यांनी समयसूचकता दाखवत जि.प., पंचायत समिती निवडणुकीत महायुती करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे थळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी गेल्या ३० वर्षापेक्षा जास्त काळ पक्षाची बांधणी केली आहे. जि. प., पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केले आहे. ऐन निवडणुकीच्यापूर्वीच थळे यांनी राजीनामा दिल्याने निवडणुकीवर परिणाम होईल, अशी शिवसेनेत चर्चा आहे. तसेच या जागी कुणाची वर्णी लागणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.‘आधी गट-गट रचनेवर भर’शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्याशी महायुतीबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले,‘तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे गण यांची रचना बदललेली असल्याने त्यावर अनेक कार्यकर्त्यांनी हरकती दाखल केल्या आहेत. प्राथमिक स्तरावर या रचनेबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी आमचे प्रयत्नसुरू आहे. त्यानंतरचमहायुती व त्यामधील जागावाटपाबाबत निर्णय घेणे शक्य होणार आहे.’विकासकामांसाठी महायुती गरजेची-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीने ही निवडणूक लढवावी,असे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व निर्माण होऊन विकासकामे करता येतील. यासाठी आम्ही अनुकूल भूमिका घेतली असून त्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा,असे आवाहन केले आहे. याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.युती न करण्याची शिवसेनेची भूमिका कायम?राज्यात यापुढे कोठेही भाजपाशी युती करणार नसल्याची घोषणा शिवेसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी केली होती. तो निर्णय पक्षाने आजवर पाळला. भाजपापेक्षा त्यांनी काँग्रेसला प्राधान्य दिले. त्यामुळे आता जरी भाजपाने महायुतीसाठी पुढाकार घेतला असला तरी गट-गटांच्या रचनेचे कारण देत शिवसेनेने त्याला प्रतिसाद दिलेला नाही.मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने दिलेला युतीचा प्रस्ताव भाजपाने फेटाळल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपाशी युती न करण्यावर सेना कायम राहते का ते लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा