शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

महायुतीसाठी भाजपा शिवसेनेच्या कोर्टात? राजकारण तापले : थळेंचा राजीनामा पडणार पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामीण भागात राजकारण तापायला सुरूवात झाली आहे

पंढरीनाथ कुंभार भिवंडी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामीण भागात राजकारण तापायला सुरूवात झाली आहे, पण ज्यापद्धतीने गट-गणांची रचना बदलली आहे, ते पाहता ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. ग्रामीण भागातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्त्वाला शह द्यायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीने लढवावी, अशी भूमिका घेत भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.भाजपाच्या नेत्यांनीही या महायुतीला परवानगी द्यावी, यासाठी पाटील प्रयत्नशील आहेत. त्यातच शिवसेनेचे तालुकाप्रमुख विश्वास थळे यांनी राजीनामा दिल्याने ते भाजपाच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते.काही महिन्यांपूर्वी झालेल्या भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवेळी शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यासाठी खासदार पाटील यांनी तालुकाप्रमुख विश्वास थळे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यास सांगितले. परंतु निवडणूक कार्यक्रमाच्या अंतिम क्षणापर्यंत हा निर्णय झाला नाही. उलट ग्रामीण भागात राजकीय अफवांना ऊत आला आणि शिवसेना-भाजपाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले. परिणामी दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणास लागली. भाजपाला एकाकी पाडण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले. भाजपाची कोंडी होऊ द्यायची नसल्याने पाटील यांनी समयसूचकता दाखवत जि.प., पंचायत समिती निवडणुकीत महायुती करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे थळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी गेल्या ३० वर्षापेक्षा जास्त काळ पक्षाची बांधणी केली आहे. जि. प., पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केले आहे. ऐन निवडणुकीच्यापूर्वीच थळे यांनी राजीनामा दिल्याने निवडणुकीवर परिणाम होईल, अशी शिवसेनेत चर्चा आहे. तसेच या जागी कुणाची वर्णी लागणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.‘आधी गट-गट रचनेवर भर’शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्याशी महायुतीबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले,‘तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे गण यांची रचना बदललेली असल्याने त्यावर अनेक कार्यकर्त्यांनी हरकती दाखल केल्या आहेत. प्राथमिक स्तरावर या रचनेबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी आमचे प्रयत्नसुरू आहे. त्यानंतरचमहायुती व त्यामधील जागावाटपाबाबत निर्णय घेणे शक्य होणार आहे.’विकासकामांसाठी महायुती गरजेची-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीने ही निवडणूक लढवावी,असे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व निर्माण होऊन विकासकामे करता येतील. यासाठी आम्ही अनुकूल भूमिका घेतली असून त्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा,असे आवाहन केले आहे. याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.युती न करण्याची शिवसेनेची भूमिका कायम?राज्यात यापुढे कोठेही भाजपाशी युती करणार नसल्याची घोषणा शिवेसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी केली होती. तो निर्णय पक्षाने आजवर पाळला. भाजपापेक्षा त्यांनी काँग्रेसला प्राधान्य दिले. त्यामुळे आता जरी भाजपाने महायुतीसाठी पुढाकार घेतला असला तरी गट-गटांच्या रचनेचे कारण देत शिवसेनेने त्याला प्रतिसाद दिलेला नाही.मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने दिलेला युतीचा प्रस्ताव भाजपाने फेटाळल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपाशी युती न करण्यावर सेना कायम राहते का ते लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा