शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

उल्हासनगर महापालिकेच्या तोडक कारवाईविरोधात भाजपा-रिपाइंचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 5:50 PM

महापालिका प्रशासनाच्या आश्वासनावर संतुष्ट, नागरिकांना दिलासा, उल्हासनगरात भाजप व रिपाइं मोर्चाचे गोलमैदानात विसर्जन 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेच्या आश्वासनानंतर भाजप-रिपाइं नेत्यांनी आयोजित केलेला मोर्चा गोल मैदानात विसर्जन केल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. धोकादायक ११६ इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिका करणार असून अन्य इमारतीच्या स्ट्रॅक्टरल ऑडिटसाठी १५ जनाचें सरंचनात्मक अभियंता पॅनेलची नियुक्ती करण्यात आले. तसेच विस्थापित होणाऱ्या नागरिकांची पर्यायी व्यवस्था केल्याची महिती महापौर लिलाबाई अशान यांनी दिली. 

उल्हासनगरात गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारत दुर्घटनेचा धसका महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी घेऊन सरसगट १० वर्ष जुन्या तब्बल १५०० जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याच्या नोटिसा पाठविल्या, तसेच महापालिकेने जाहीर केलेल्या अतिधोकादायक यादीतील इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू करून, काही इमारतीचे वीज व पाणी पुरवठा खंडित केला. याप्रकारने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. पाडकाम कारवाईत इमारती मधून बेघर व विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था महापालिकेकडे नसतांना, कोरोना काळात शेकडो नागरिकांना विस्थापित करण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारला गेला. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी व महापौर लिलाबाई अशान याप्रकरणी टीकेचे धनी बनले. महापालिकेच्या एकूनच कारवाईच्या निषेधार्थ भाजप-रिपाईने एकत्र येत शुक्रवारी गोलमैदान ते प्रांत कार्यालय दरम्यान मोर्चाची हाक दिल्याने महापालिकेला जाग आली. 

भाजप-रिपाईच्या मोर्चाच्या पाश्वभूमीवर महापौर लिलाबाई अशान, आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मदन सोंडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यानी गुरवारी बैठक घेवून अनेक निर्णय घेतले. ११६ धोकादायक इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिका करणार, अन्य इमारतीच्या स्ट्रॅक्टरल ऑडिट साठी एकून १५ सरंचनात्मक अभियंत्यांची पॅनल तयार करणे, धोकादायक इमारती मधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून भिवंडी येथील टाटा निमंत्रण येथील ५०० प्लॉट तात्पुरते स्वरूपात घेऊन तात्पुरता निवासी निवारा केंद्र उभारणे, शाळा, मंदिर, समाजमंदिर आदी ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. धोकादायक व अनधिकृत बांधकामे नियमाधिन करण्याची प्रक्रिया सुरू करणे. असे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

आयुक्तांना अतिविश्वास नडलाशहरातील इमारतीचा स्लॅब पडल्याच्या पाश्वभूमीवर आयुक्तांनी महापौर, उपमहापौर, आमदार, नगरसेवक यांच्यासोबत चर्चा न करता, १० वर्ष जुन्या १५०० पेक्षा जास्त जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याच्या नोटिसा दिल्या. तसेच सन १९९४ ते ९८ दरम्यानच्या इमारतीचे सर्वेक्षण करून ५०५ इमारतींना १४ दिवसात स्ट्रॅक्टरल ऑडिटचे आदेश दिले. तर काही इमारतीचे पाणी व वीज पुरवठा खंडित करून इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली. यामुळे नागरिकांसह राजकीय नेत्यांत रोष निर्माण झाला. आयुक्तांच्या अतिविश्वासामुळे ऐन कोरोना काळात शहरात ही परिस्थिती ओढविल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.