शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

#VidhanSabha2019: भाजपाच्या कार्यक्रमात रंगले मानापमान नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:22 IST

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या कार्यक्रमात मानापमान नाट्य रंगले.

ठाणे : जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या कार्यक्रमात मानापमान नाट्य रंगले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील आठ खुर्च्यांवर मान्यवर आधीच स्थानापन्न झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईकांनी तेथून काढता पाय घेतला, तर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पायऱ्यांवरच बैठक मारली.रविवारी संध्याकाळी ५ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी गडकरी रंगायतनचे सभागृह भरगच्च भरले होते. त्यामुळे बहुतांश कार्यकर्ते सभागृहाच्या पॅसेजमध्येच उभे होते. या दरम्यान व्यासपीठावर नड्डा यांच्यासमवेत खासदार विनय सहस्रबुद्धे, खा. कपिल पाटील, भाजपचे राष्ट्रीय संघटक भूपेंद्र यादव, सहसंघटक व्ही. सतीश, आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आणि भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले आदी उपस्थित होते. किरीट सोमय्या हे व्यासपीठावर स्थान मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे श्रोत्यांच्या पहिल्या रांगेत बसले नाहीत. बराच वेळ व्यासपीठाजवळ फिरत होते, पण नड्डा आल्यानंतरही त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले नाही. त्यामुळे त्यांची पहिल्या रांगेतील खुर्चीही गेली. नाइलाजास्तव त्यांनी पायऱ्यांवरच बैठक मांडली.दरम्यान, काही वेळातच गणेश नाईक तिथे आले, पण व्यासपीठ आधीच भरलेले असल्यामुळे ते खालीच उभे राहिले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमप्रसंगी या दोघांची नावे शेवटी घेण्यात आली. मात्र, सोमय्या आणि नाईक व्यासपीठावर गेले नाहीत. एकूणच प्रकार पाहून नाईकांनी लगेच कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला. नाईक यांचा आज वाढदिवस होता. त्यामुळे ते पुढील कार्यक्रमासाठी गेल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. मात्र, वाढदिवसाच्या कार्यक्रमाची गडबड असली, तर ते कार्यक्रमस्थळी आलेच नसते, अशी चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली होती.नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, त्यांचा राग एवढा अनावर झाला होता की, ते या कार्यक्रमासही उपस्थित न राहता थेट नवी मुंबईला रवाना झाल्याचे समजते. माजी खासदार संजीव नाईक यांच्यावरही अन्यत्र उभे राहण्याची वेळ आली.हारतुºयांची अपेक्षा नाही - गणेश नाईकरविवारी माझा वाढदिवस होता. त्यामुळे कार्यक्रमांची गडबड होती. गडकरी रंगायतनमध्ये माझा अपमान झाला नाही. तीन दिवसांपूर्वीच मी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पक्षाकडून आपणास मोठ्या मानाची किंवा हारतुºयांची अपेक्षा नसल्याचे गणेश नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपली भाजपवर कोणतीही नाराजी नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.>अन्याय दूर झाला - नड्डा३७० कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील एससी, एसटी प्रवर्गांतील उमेदवारांसह गुजर व बरकलवाल समाजाला आता कोणत्याही निवडणुकीसाठी उभे राहता येणार आहे. तेथील लोकांवर होत असलेला अन्याय हे कलम रद्द केल्यामुळे दूर झाल्याचे जे. पी. नड्डा यांनी यावेळी सांगितले. हे कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरचा होणारा विकास, तेथील जनतेला होणारे फायदे आदी मुद्द्यांवर नड्डा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक