शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

भाजपा मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही; बिहारमधील सत्तांतरावर देवेंद्र फडणवीसांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 07:11 IST

ठाण्यात ‘लोकमत’ ने अद्ययावत ऑफिस सुरू केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांसोबत ते बोलत होते.

ठाणे : भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही. बिहारमध्ये भाजपचे ७५ आणि जेडीयूचे ४२ सदस्य निवडून आल्यानंतरही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. महाराष्ट्रातही शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. ठाण्यात ‘लोकमत’ ने अद्ययावत ऑफिस सुरू केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांसोबत ते बोलत होते. शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सुशील मोदी यांच्या विधानाचे समर्थन फडणवीस यांनी केले.          

मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. त्याबाबत विचारले असता फडणवीस यांनी, प्रसारमाध्यमांनी आधीच खातेवाटप केले असून, तुम्ही केलेले खातेवाटप  सपशेल चुकीचे असल्याचे सांगितले. भाजपचे बिहारमधील नेते सुशील मोदी यांच्या विधानाचे त्यांनी समर्थन केले. भाजप मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही. मात्र जे मित्रपक्ष भाजपला धोका देतात, त्यांचे काय होते ते महाराष्ट्रात दिसले, असे विधान सुशील मोदी यांनी केले होते. फडणवीस यांनी सुशील मोदी यांच्या विधानाचे समर्थन केले.

बिहारमध्ये भाजपचे ७५ तर जेडीयूचे ४२ सदस्य निवडून आले. तरीही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले. बिहारमध्ये आज भाजपचे सरकार गेले असले तरी ते पुन्हा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवारांचे दुखणे वेगळे आहे. आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.  ज्यावेळी पवार यांनी पक्ष बदलला, त्यावेळी कायदेच नव्हते, कोणालाही कसाही पक्ष बदलता येत होता. आज कायदे तयार झालेले आहेत, त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागत आहे आणि एकनाथ शिंदे तेच करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील गजानन महाराज चौकात ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiharबिहारMaharashtraमहाराष्ट्र