शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भाजपा मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही; बिहारमधील सत्तांतरावर देवेंद्र फडणवीसांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 07:11 IST

ठाण्यात ‘लोकमत’ ने अद्ययावत ऑफिस सुरू केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांसोबत ते बोलत होते.

ठाणे : भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही. बिहारमध्ये भाजपचे ७५ आणि जेडीयूचे ४२ सदस्य निवडून आल्यानंतरही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. महाराष्ट्रातही शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. ठाण्यात ‘लोकमत’ ने अद्ययावत ऑफिस सुरू केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांसोबत ते बोलत होते. शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सुशील मोदी यांच्या विधानाचे समर्थन फडणवीस यांनी केले.          

मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. त्याबाबत विचारले असता फडणवीस यांनी, प्रसारमाध्यमांनी आधीच खातेवाटप केले असून, तुम्ही केलेले खातेवाटप  सपशेल चुकीचे असल्याचे सांगितले. भाजपचे बिहारमधील नेते सुशील मोदी यांच्या विधानाचे त्यांनी समर्थन केले. भाजप मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही. मात्र जे मित्रपक्ष भाजपला धोका देतात, त्यांचे काय होते ते महाराष्ट्रात दिसले, असे विधान सुशील मोदी यांनी केले होते. फडणवीस यांनी सुशील मोदी यांच्या विधानाचे समर्थन केले.

बिहारमध्ये भाजपचे ७५ तर जेडीयूचे ४२ सदस्य निवडून आले. तरीही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले. बिहारमध्ये आज भाजपचे सरकार गेले असले तरी ते पुन्हा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवारांचे दुखणे वेगळे आहे. आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.  ज्यावेळी पवार यांनी पक्ष बदलला, त्यावेळी कायदेच नव्हते, कोणालाही कसाही पक्ष बदलता येत होता. आज कायदे तयार झालेले आहेत, त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागत आहे आणि एकनाथ शिंदे तेच करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील गजानन महाराज चौकात ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiharबिहारMaharashtraमहाराष्ट्र